Saturday, 4 February 2017

स्पर्श

*स्पर्श*

कधी कधी बोलून दाखवू शकत नाही अशा भावना डोळ्यातून आणि स्पर्शातून व्यक्त करता येतात.  प्रत्येक स्पर्शाची एक वेगळी भाषा असते. ती भाषा त्या त्या वेळी आपण सगळे ह अनुभवत असतो. जन्म ते शेवट या प्रवासात निरनिराळ्या स्पर्शाची आपल्याला अनुभुती येते. सगळ्याच चांगल्या वाईट.

बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या आईचा झालेला  त्या बाळाचा पहिला स्पर्श, त्या स्पर्शा इतकादुसरा सुखद,सुंदर आणि अप्रतिम स्पर्श या जगात नाही. सगळ्यांच्या आयुष्यातला पहिला अनुभव. बाळाच्या कोमल स्पर्शाने आईला झालेली मातृत्वाची जाणीव ,आणि त्या चिमुरड्या जीवाला जगात आल्यावर मिळालेला पहिला आधार. त्यानंतर वडिलांनी बाळाला हातात घेतल्यावर आपल्यावरच्या जबाबदऱ्यांची जाणीव झालेला तो स्पर्श.

आपण एखादी चांगली गोष्ट केल्यावर आजी, आजोबा, आई ,बाबा किंवा घरातील कुठल्याही वडीलधाऱ्या व्यक्तींनी मायेने फिरावलेला हात, आपल्याला अजून काहीतरी नवीन करण्याची जिद्द देऊन जातो. आपण जेव्हा खूप मोठे होतो, आणि त्यावेळी काहीतरी चांगले घडल्यावर किंवा खूप एकटं वाटत असताना आपल्याला शब्दांच्या आधारापेक्षा  गरज असते ती त्या मायेच्या स्पर्शाची. आपण एकटे असताना , खूप संकटात असताना आपल्या जवळच्या व्यक्तीने प्रेमाने पाठीवर ठेवलेला हात आपल्याला भक्कम आधाराची जाणीव करून देतो. आणि आपण एकटे असताना  त्या स्पर्शाची उणीव आपल्याला बऱ्याच वेळा जाणवते.

उमलत्या वयात झालेला पहिल्या प्रेमाचा स्पर्श , नेहमीच प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. त्या काळात चुकून झालेला स्पर्श ही तन आणि मन दोहोंवर मोरपीस फिरवून जाते. गर्दीत प्रियकरचा हात घट्ट पकडताना, घाबरल्यावर त्याला बिलागताना प्रेयसीला त्याच्या त्या उबदार स्पर्शात सुरक्षिततेची जाणीव होते. शब्दांपेक्षा प्रियकर प्रेयसी स्पर्शाने एकेमएकांशी जास्त बोलतात. लग्नानंतर आपल्या जोडीदाराचा पहिला स्पर्श आपल्याला आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन जातो. 

म्हातारपणी मुलांनी किंवा नातवंडांनी आधारासाठी पुढे केलेला हात , आपल्याला सगळे कष्ट त्रास विसरायला लावतो. विचारात असताना त्या म्हाताऱ्या हातांवर हात ठेवून "कशाला आता कसला विचार करायचा आता मस्त जगायचं" असे म्हटलं तर त्याचं म्हातारपण हि सुखकर असल्याची जाणीव होईल आणि चेहऱ्यावरचे गोड हसू जगण्याची ताकत. तसेच आपल्या वडीलधाऱ्या व्यतीचा तो सुरकुत्या पडलेला हात डोक्यावरून फिरला की अंगात नवचैतन्य संचारते.  त्या सुरकुत्यांमधून त्यांनी पाहिलेल्या व झेललेल्या सर्व चढउतारांनी आलेली ताकत ते आपल्याला बहाल करतात जणू.

ज्या व्यक्तींना बोलता येत नाही , दिसत नाही अशा व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूप चांगले असते असे म्हणतात. नुसत् स्पर्शून ते सगळे ओळखू शकतात.  तसेच प्रत्येक स्त्रीला हि एक स्पर्श ओळखण्याचे एक वेगळे ज्ञान देवाने दिले आहे.  तिला व्यक्तीच्या स्पर्शातूनच काय तर नजरेच्या स्पर्शातून ही  जाणवते कि समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे. त्यामुळेच तिला मृदू हृदया सोबत एक रणरागिनींचे हृदय ही दिले आहे. वेळ पडली तर ते ही रूप ती घेऊ शकते.

कोणी रागावल्यावर , रुसल्यावर त्या व्यक्तीला प्रेमाने जवळ घेतल्यावर त्या व्यक्तीचा राग रुसवा कुठल्या कुठे पळून जातो. आपण जेव्हा आजारी माणसाला पाहायला जातो तेव्हा निघताना त्या रुग्णाच्या हातावर हात ठेवून *काळजी घे*  म्हटलं की त्या व्यक्तीला किती बरे वाटतं हे त्या व्यतीचा पाणावलेल्या डोळयांच्या कडा सांगून जातात.


जीवनात हरलेल्या माणसाला प्रेमाचे चार शब्द आणि मायेने पाठीवरून फिरवलेला हात जगण्याची नवी उमेद नक्कीच देऊन जातो. आणि म्हणूनच एखाद्याच्या एकटेपणाच्या वेळी, दुःखाच्या वेळी नुसते शाब्दिक सांत्वन न करता त्या व्यक्तीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला तर त्याचे अर्धे टेन्शन निघून जाईल.

म्हणूनच कदाचित म्हणतात ना *Keep in Touch*


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️









12 comments:

  1. Very true... The touch has many coloured,..... Many time we underestimate it's importance, as we grow up....
    As child, we all have experienced swetness of touch from our dear once.. but we tend to leave it behind as we move ahead in life..

    ReplyDelete
  2. perfect.... khupp sunder ...sparsh fakt ek shabd navhe....sparsh ek bhavnaa...tyat dadlelyaa anek bhavbandhachya...pratyek sparsh vegveglyaa tarhene anubhuti denara... tu khupp chaan mandliyess ya lekhat... beautiful lekh Milan

    ReplyDelete