ती नुकतीच वयात आलेली , तो हि आसपास तितकाच एक दोन वर्षाचा फरक. पहिल्यांदा रस्त्यात त्याला पाठमोरे पहिले आणि त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीच्या ती प्रेमात पडली. एकदा बरेच सामान घेऊन ती येत होती इतक्यात मागून आवाज आला " Excuse me " हे तुमचे आहे का? , "बापरे!! हा तर त्याचाच आवाज. ती झर्रकन मागे फिरली आणि त्याच्या हातातली पिशवी घेतली. तिचा आवाजही फुटत नव्हता कसे बसे त्याचे आभार मानून ती भरभर पुढे गेली. त्याला असे अचानक समोर पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. अगदीच मदनाचा पुतळा नसला तरी पहिल्यांदा पाहिल्यावर कुणीही प्रेमात पडावे असा नक्कीच होता. ती पहिल्यांदाच आणि पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडली. नंतर कधी रस्त्यात कधी एखाद्या कार्यक्रमात त्यांची भेट होत होती. त्याला एकदा पाहता यावे म्हणून तिची सतत धडपड असायची, तो मात्र या पासून अगदीच अलिप्त होता. आधी नुसतेच हसणे, मग बोलणे आणि मग हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. एकमेकांचे नंबर घेतले गेले. मग कधी मेसेज कधी फोन त्यांच्यातले संवाद वाढू लागले. आणि एक दिवस आता एका भेटूच अशा निर्णयावर पोचले. दोन दिवस आधी पासूनच तिच्या हृदयाची धडधड वाढली होती, काय होईल , तो काय बोलेल या विचाराने तिला झोपही लागली नाही. त्याच्या मनात नक्की काय होते हे त्याचे त्यालाच ठाऊक नेहमी प्रमाणे ती " प्रश्नचिन्हा " तच होती. भेटीचा दिवस उजाडला कधी स्वप्नातही विचार केला न्हवता ती गोष्ट प्रत्यक्षात घडत होती. "तो" "तिच्या सोबत असणार होता पूर्ण दिवस. दिवसभर दोघे खूप भटकले, खूप गप्पा झाल्या , जेवणही झाले. मोठ्या मुश्किलीने "ती" आपल्या भावनांना बांध घालत होती, कारण तो अगदी शांत होता समुद्रासारखा , मनात खोलवर असणारी खळबळ चेहऱ्यावर दिसू देत नव्हता.पण शेवटी त्याच्याच संयम सुटला त्याने आपल्या भावना मोकळ्या केल्या. तिला कळतच नव्हते की नक्की काय करावे , हसावे कि रडावे. तो आपला आहे हि जाणीव खूप सुखकर होती पण त्याहि पेक्षा त्याला गमावण्याची भीती जास्त होती. पण दोघेही खुश होते. मग हळू हळू सवांद वाढले . फोन , मेसेजेस जास्त होऊ लागले. तिला त्याच्या शिवाय दुसरे काही सुचत नव्हते, थोड्या फार फरकाने त्याचे हि तसेच होते. त्यांच्या भेटी हि वाढल्या आणि एका बेसावध क्षणी ते दोघे एक झाले. हवीहवीशी वाटणारी पण तरीही नकॊ असणारी गोष्ट घडली होती. पण नियतीच्या मनात बहुदा हेच होते. आता ती त्याच्या जास्त जवळ गेली होती आणि तो थोडासा लांब. त्याला कुठलेही बंधन नको होते, असे कुणात गुंतून पडणं त्याला नको होते. हळू हळू त्याने तिला टाळायला सुरवात केली , त्यांच्यातले संवाद कमी झाले. तिने कितीही भेटायचं हट्ट केला तरी तो काही ना काही कारण काढून टाळता होता. मेसेजस ला रिप्लाय येत नव्हता. फोन ची नुसती वाजणारी रिंग ऐकून तिच्या डोळ्यात पाणी दाटत असे. कधी तरी जनरल बोलणे होत होते. नक्की काय झाले होते त्याचे काम करियर जास्त महत्वाचे होते ? कि त्याच्या आयुष्यात दुसरे कुणी आले होते? ती परत एकदा "प्रश्नचिन्हात" गेली होती. तिचे त्याच्या वरचे प्रेम काही केल्या कमी होत नव्हते. "तो" तिच्यासाठी सर्वकाही होता. त्याच्या गुणदोषांसकट तिने त्याला स्वीकारले होते.पण त्याचे असे अचानक पाठ फिरवणे तिच्या पचनी पडत नव्हते . एकट्यात रडून रडून ती तिचे दुःख सगळ्यांपासून लपवून ठेवत होती. त्याचे असे सतत दुर्लक्ष करणे तिला सहन होत न्हवते , शेवटी मनावर दगड ठेवून तिने ठरवले कि आपणही त्याच्या आयुष्यात ढवळा ढवळ करायाची नाही.आपले प्रेम आपल्या पुरता मर्यादित ठेवायचे. कळत होते कि त्याच्याशिवाय राहणे शक्य नाही तरी तिने फक्त "त्याच्या " साठी स्वतःला बदलायचे ठरवले. एक पाऊल ती मागे गेली. त्याने दिलेल्या सुंदर आठवणींवर ती जगत होती. त्याच्याबद्दल तिच्या मनात काही अढी नव्हती कि राग नव्हता , "तो" "ती" चे पहिले आणि शेवटचे प्रेम होता, जे काही होते ते अगदी मनापासून होते. पण मनातून ती सतत त्याची वाट पाहत होती. आपल्या फोनवर कधीतरी त्याचे नाव फ्लॅश होईल या वेड्या आशेवर सतत तिचे लक्ष फोन कडे असायचे. रिंग वाजली कि कुठेतरी आशेचा किरण दिसायचा पण तिच्या पदरी फक्त निराशाच होती. तो कधी तिला समजू शकला नाही. कुठलेही कारण न देता तो तिला दुरावला होता. शेवटी तिला पडलेले सगळे प्रश्न , त्याच्या बद्दल वाटणारे प्रेम , सगळ्या गोड आठवणी आपल्या सोबत घेऊन ती लांब निघून गेली ........ कायमची. आता कधीतरी त्याचे नाव फ्लॅश होईल तिच्या मोबाईल वर पण ती नुसती वाजणारी रिंग ऐकून कदाचित त्याच्या हि डोळ्यात पाणी येईल अगदी "ती" च्या यायचे तसेच....................
Nice story ....beautifull title...perfectly meaningful with story.... Good start for Story writing..Carry on
ReplyDelete"To" kharach kadhi aamjun gheil ka "Ti" chya bhavna?? very touching......
ReplyDeletekadachit......... pan geleli vel parat nahi na yet.
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteMast Tai..
DeleteMastch
ReplyDeleteVery well written. Its feel like story happening around us. Good Keep it up.
ReplyDeleteMilan ,
ReplyDeleteSagle jan aaplya wyathaa kathaa mhanun wachtaat aani parat aaplya udyogala lagtaat.Aaplya manachi ghalmel tyanna samajtech asa nahi...... hee hakikat asel tar khup wyathit karnari aahe..... kalpanik asel tar tuza kautuk karayla hawa.... mast!
It's just a story.
DeleteNice Story..Keep it up.!
ReplyDeleteNice Story..Keep it up.!
ReplyDeleteVery touching.. and sad story...
ReplyDeleteReally seems true... Nicely written, really!!
One small old fashioned advice:
Never get too close to anybody.. before marriage...
Chan lihles. Ajun ase chan lekh lihit ja ani sarv article ch ek book publish hou de hich sadicha.
ReplyDeleteThank you for your wishes. Nakkich prayatna karen ajun chan lihinyacha.
ReplyDeleteफार छान
ReplyDeletekhup chan pan ase real madye suddha ghadte kevha kevha ka nahi mantlya goshti samjun ghete to .sodun jari gela tari tyane tham pan je ahe te sagun jave nahi ka tila, ka bare ase manat sagle khel chalun tevle ahe ti ajun vat baghete ahe na ......pan ha lekh vachun jo koni tasa vagle asel tar nakki sudharel tyachi chuk....nice tai.
ReplyDelete