काल सुशांत सिंग च्या बातमीनंतर इतक्या पोस्ट आल्या, एकटे राहू नका, कुणाशी तरी बोला, मोकळे व्हा....अगदी १००% खरे आहे. पण काही गोष्टी अशा घडतात की आपण त्या कुणाला पटकन नाही सांगू शकत.कुठेतरी ही भीतीही असते याच गोष्टींचा आधार घेऊन समोरच्या व्यक्तीने कधी पुढे आपल्याला दुखावलं तर....त्यामुळं नाही मोकळं होता येत.
जेव्हा आपल्याला कुणी विश्वासाने काही सांगितलं तर ते आपल्यापर्यंत ठेवण्याची आपलीही तयारी हवी. समोरच्या व्यक्तीला हा विश्वास हवा की मी सांगितलेल्या गोष्टींचा दुरूपयोग होणार नाही.
तर काही वेळा असेही होते की आपण चांगले काहीतरी करायला जातो आणि समोरच्या व्यक्तीला ते त्याच्या बाजूने नसल्यामुळं चूक वाटते. हा अनुभव ही प्रत्येकाने घेतला असेल.
काल हे सगळे वाचताना एक मराठी सिनेमा आठवला लॉस्ट अँड फाउंड. त्यात एकटे वाटणाऱ्या व्यक्ती सोबत २४ तास घालावायचे अशी संकल्पना एक ग्रुप राबवत असतो. खूप वेगळी कल्पना असे असायला हवे कुठेतरी. आज प्रत्येकाला गरज आहे अशा आधाराची.
माझ्या डॉक्टर बीना वागळे ने टाकले आहे की कधी वाटले तर माझ्याशी बोला निःसंकोचपणे असे टाकणारी मी पाहिलेली पहिलीच व्यक्ती .....तेच मला ही सांगावेसे वाटते....
(उगाच टाईमपास म्हणून नाही... जर खरंच कुणी नसेल व्यक्त व्हायला तेव्हा)
बोलून मन हलकं होते आणि साठवून फक्त ओझे होते😊
No comments:
Post a Comment