*सल्ला*
सगळ्यात सोप्पी , फुकट आणि सगळ्यात जास्त जी गोष्ट आपण दुसऱ्याला देतो ती म्हणजे "सल्ला". खूप सोपं असते दुसर्यांना सल्ले देणे. मोठी माणसे तर सतत लहानांना काही ना काही उपदेश देत असतात जसा तो त्यांचा जन्मसिध्द हक्कच आहे. पण त्यापैकी किती वेळा त्याची खरंच गरज असते याचा कुणी विचार करत नाही.
कुणी आजारी पडले कि प्रत्येकजण आपापल्या अनुभवाप्रमाणे पेशंट ला सल्ले देत असते. औषधे तर इतकी सांगितली जातात की विचारता सोय नाही. कधी कधी तर कुणीतरी असे काहीतरी अनुभव सांगतात कि ती व्यक्ती बिचारी अजूनच घाबरून जाते. अर्थात सगळे सांगतात ते काळजी पोटीच असते पण कुठली गोष्ट कुठे आणि कधी बोलायची याचा हि विचार करायला हवा ना.
हल्ली सोशल मीडिया मुळे या सल्ल्याचे पीकच आलेय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उपदेशपर ३०-४० मेसेजेस तरी दिवसाला असतातच. प्रत्येकजण काही ना काही , कुणाला ना कुणाला अप्रत्यक्षपणे सल्ले देतच असतात. नक्की कोण बिघडले आहे आणि कोण कुणाला सुधारायचा प्रयत्न करत आहे हेच कळत नाही कधी कधी. ग्रुप वर टीका करणारे, अर्वाच्य शब्दात आपली मत मांडणारे लोकही दुसऱ्यांनी रचलेले उपदेशपर मेसेज पटापट पाठवतात. पण पाठवायच्या आधी एकदाही कुणी हा विचार करते का, कि माझ्या आयुष्यात मी कितीसा या गोष्टी अंमलात आणतोय.
दुसऱ्याला सल्ला देणे हि खूप सोपी गोष्ट आहे. पण समोरची व्यक्ती कुठल्या बिकट परिस्थितीतून जात आहे याची आपल्याला कल्पनाही नसते कधीतरी. सल्ला देताना आपण त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करत नाही, तर आपल्याला काय वाटते हे त्या व्यक्तीला आपण पटवून देत असतो. समोरच्याचे दुःख हे नेहमी आपल्याला कमीच वाटते, आणि तेच डोक्यात ठेवून बऱ्याचदा सल्ले दिले जातात. पण जेव्हा कुणीतरी समोरून , अगदी स्वतःहून आपल्याकडे सल्ला मागते ना तेव्हा आपण खूप विचार करतो. आपण सांगितलेल्या गोष्टीमुळे, परिस्तिथी काय होऊ शकते याचा आपण दहा वेळा विचार करतो. कठीण प्रसंगी आपल्या जवळच्या व्यक्तींनी दिलेले पाठबळ, त्यांनी दिलेला सल्ला आपल्याला खूप मोठा आधार देऊन जातो.
सगळ्यात जास्त गम्मत असते ती लग्नाच्या वेळी, लग्नाआधी हि प्रत्येकजण उपवर मुलामुलींना भरपूर सल्ले देतात, आणि लग्नात त्यांच्या आई बाबाना , बिचारे आधीच भांबावलेले असतात त्यात १०० लोकांच्या वेगवेगळ्या सल्ल्याने ते अजूनच गोंधळून जातात. लग्नानंतरही नवरा बायकोला प्रत्येकाचे वेगवेगळे सल्ले आयुष्यभर ऐकावेच लागतात. तसेच असते घर घ्यायच्या वेळी. दहा डोकी दहा सल्ले. सगळ्यांचे ऐकून आपण इतके गोंधळून जातो की आपल्याला नक्की काय वाटतंय हे विसरूनच जातो.
काही वेळा तर आपण एखाद्याला काही समजावत असतो तेव्हा समोरची व्यक्ती अगदी मनापासून ते ऐकत आहे आहे आणि आपले सगळे त्या व्यक्तीला पटले आहे असे वाटते आपल्याला. पण नंतर उशिरा कधीतरी आपल्याला कळते कि आपण फक्त बोलत होतो आणि समोरची व्यक्ती फक्त ऐकत होती. आपण सांगितलेली एकही गोष्ट त्या व्यक्ती ने आचरली नाही. तर कधी तरी एखाद्या व्यक्ती ने सांगितलेल्या छोट्या छोटया गोष्टीवर आपण विचार करतो. कुणीही कितीही सल्ले दिले तरी त्यातून काय घ्यायचे आणि काय नाही हे आपणच ठरवायचे असते. आपली प्रवृत्ती हि अशीच आहे ना कि जे लोक आपल्याला आवडतात त्यांचे चुकीचे सल्ले हि कधीतरी आपण सकारात्मक घेतो आणि नावडतीचे मीठ अळणी तसे आपल्याला आपल्या नावडत्या लोकांचे सल्ले हि नकोशे वाटतात.
एखाद्यावेळी कुणीतरी दिलेला अनमोल सल्ला आपले आयुष्य बदलून टाकतो. चुकीच्या वाटेवर जाणारी पावले सावरायला मदत करतात. ऐकावे जनांचे करावे मनाचे असे असले तरीही वाल्याकोळ्याला नारदांनी दिलेला उचित सल्ला त्याने ऐकला म्हणून वाल्याचा "वाल्मिकी" झाला हे ही लक्षात ठेवायला हवे.
सौ. मिलन राणे - सप्रे🖋️
सगळ्यात सोप्पी , फुकट आणि सगळ्यात जास्त जी गोष्ट आपण दुसऱ्याला देतो ती म्हणजे "सल्ला". खूप सोपं असते दुसर्यांना सल्ले देणे. मोठी माणसे तर सतत लहानांना काही ना काही उपदेश देत असतात जसा तो त्यांचा जन्मसिध्द हक्कच आहे. पण त्यापैकी किती वेळा त्याची खरंच गरज असते याचा कुणी विचार करत नाही.
कुणी आजारी पडले कि प्रत्येकजण आपापल्या अनुभवाप्रमाणे पेशंट ला सल्ले देत असते. औषधे तर इतकी सांगितली जातात की विचारता सोय नाही. कधी कधी तर कुणीतरी असे काहीतरी अनुभव सांगतात कि ती व्यक्ती बिचारी अजूनच घाबरून जाते. अर्थात सगळे सांगतात ते काळजी पोटीच असते पण कुठली गोष्ट कुठे आणि कधी बोलायची याचा हि विचार करायला हवा ना.
हल्ली सोशल मीडिया मुळे या सल्ल्याचे पीकच आलेय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उपदेशपर ३०-४० मेसेजेस तरी दिवसाला असतातच. प्रत्येकजण काही ना काही , कुणाला ना कुणाला अप्रत्यक्षपणे सल्ले देतच असतात. नक्की कोण बिघडले आहे आणि कोण कुणाला सुधारायचा प्रयत्न करत आहे हेच कळत नाही कधी कधी. ग्रुप वर टीका करणारे, अर्वाच्य शब्दात आपली मत मांडणारे लोकही दुसऱ्यांनी रचलेले उपदेशपर मेसेज पटापट पाठवतात. पण पाठवायच्या आधी एकदाही कुणी हा विचार करते का, कि माझ्या आयुष्यात मी कितीसा या गोष्टी अंमलात आणतोय.
दुसऱ्याला सल्ला देणे हि खूप सोपी गोष्ट आहे. पण समोरची व्यक्ती कुठल्या बिकट परिस्थितीतून जात आहे याची आपल्याला कल्पनाही नसते कधीतरी. सल्ला देताना आपण त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करत नाही, तर आपल्याला काय वाटते हे त्या व्यक्तीला आपण पटवून देत असतो. समोरच्याचे दुःख हे नेहमी आपल्याला कमीच वाटते, आणि तेच डोक्यात ठेवून बऱ्याचदा सल्ले दिले जातात. पण जेव्हा कुणीतरी समोरून , अगदी स्वतःहून आपल्याकडे सल्ला मागते ना तेव्हा आपण खूप विचार करतो. आपण सांगितलेल्या गोष्टीमुळे, परिस्तिथी काय होऊ शकते याचा आपण दहा वेळा विचार करतो. कठीण प्रसंगी आपल्या जवळच्या व्यक्तींनी दिलेले पाठबळ, त्यांनी दिलेला सल्ला आपल्याला खूप मोठा आधार देऊन जातो.
सगळ्यात जास्त गम्मत असते ती लग्नाच्या वेळी, लग्नाआधी हि प्रत्येकजण उपवर मुलामुलींना भरपूर सल्ले देतात, आणि लग्नात त्यांच्या आई बाबाना , बिचारे आधीच भांबावलेले असतात त्यात १०० लोकांच्या वेगवेगळ्या सल्ल्याने ते अजूनच गोंधळून जातात. लग्नानंतरही नवरा बायकोला प्रत्येकाचे वेगवेगळे सल्ले आयुष्यभर ऐकावेच लागतात. तसेच असते घर घ्यायच्या वेळी. दहा डोकी दहा सल्ले. सगळ्यांचे ऐकून आपण इतके गोंधळून जातो की आपल्याला नक्की काय वाटतंय हे विसरूनच जातो.
काही वेळा तर आपण एखाद्याला काही समजावत असतो तेव्हा समोरची व्यक्ती अगदी मनापासून ते ऐकत आहे आहे आणि आपले सगळे त्या व्यक्तीला पटले आहे असे वाटते आपल्याला. पण नंतर उशिरा कधीतरी आपल्याला कळते कि आपण फक्त बोलत होतो आणि समोरची व्यक्ती फक्त ऐकत होती. आपण सांगितलेली एकही गोष्ट त्या व्यक्ती ने आचरली नाही. तर कधी तरी एखाद्या व्यक्ती ने सांगितलेल्या छोट्या छोटया गोष्टीवर आपण विचार करतो. कुणीही कितीही सल्ले दिले तरी त्यातून काय घ्यायचे आणि काय नाही हे आपणच ठरवायचे असते. आपली प्रवृत्ती हि अशीच आहे ना कि जे लोक आपल्याला आवडतात त्यांचे चुकीचे सल्ले हि कधीतरी आपण सकारात्मक घेतो आणि नावडतीचे मीठ अळणी तसे आपल्याला आपल्या नावडत्या लोकांचे सल्ले हि नकोशे वाटतात.
एखाद्यावेळी कुणीतरी दिलेला अनमोल सल्ला आपले आयुष्य बदलून टाकतो. चुकीच्या वाटेवर जाणारी पावले सावरायला मदत करतात. ऐकावे जनांचे करावे मनाचे असे असले तरीही वाल्याकोळ्याला नारदांनी दिलेला उचित सल्ला त्याने ऐकला म्हणून वाल्याचा "वाल्मिकी" झाला हे ही लक्षात ठेवायला हवे.
सौ. मिलन राणे - सप्रे🖋️
मस्त लिहिले आहेस मिलन.... सर्वात सोपी आणि फुकट देण्याची गोष्ट म्हणजे सल्ला ..... आणि तो देणार्यांमध्ये ९०% लोक हे ...लोक संगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण ...असेच असतात
ReplyDeleteKhup chan Milan. Tuze vishay ekdam saral sadhe astat ani manala sparshun jatat. Keep it up !!
ReplyDeleteखुप छान मिलन न मागता आपल्याला बरेच फुकटचे सल्ले देणारे भेटत असतात
ReplyDeleteKhup chan :)
ReplyDeleteLife madhali survat mahatwachi goshta mhanje Dallas pan to pratek vyaktivar avlabun asto ani to jyachya tyacha prashan konala kasa tyacha ani Kuni kasa ghyachya ������
ReplyDeleteRatna
Some typo mistake correct word salla not dalla & dyacha not tyacha����
Deletemast sundar.....कुणीही कितीही सल्ले दिले तरी त्यातून काय घ्यायचे आणि काय नाही हे आपणच ठरवायचे असते.perfect lihile ahe. tai
ReplyDelete