Thursday, 16 March 2017

आठवण

आपले आयुष्य म्हणजे काय तर चांगल्या वाईट आठवणींचा प्रवास. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर , प्रत्येक दिवस आपल्याला नवीन आठवण देऊन जातो. बालपणीच्या आठवणी ह्या खूप सुखद असतात. लहानपणीच्या आठवणीत आपले आई बाबा घराचे सगळेच रमून जातात. लहानपणीच्या खोड्या आठवून मग आपलेच आपल्याला हसू येते. कधीतरी कोणाचा तरी खाल्लेला मार , केलेली दंगामस्ती , चोरून खाल्लेल्या चिंचा बोरे, आपल्याला मिळालेले पहिले बक्षीस, पहिली शाबासकी . काही वेळा आपण केलेल्या शुल्लक चुका आठवल्या कि वाटते किती मूर्ख होतो आपण. शाळा , कॉलेज मध्ये मित्र मैत्रिणीबरोबर केलेली मजा. शिक्षकांना दिलेला त्रास. एखाद्याच्या नावाने केलेली चिडवा चिडव किंवा एखाद्याचे झालेले भांडण. सगळ्याच आठवणी गोड असतात .  मग वयात आल्यावर  झालेले पहिले प्रेम ,पहिली मैत्री,  पहिला स्पर्श  सगळ्याच गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो. शाळा कॉलेज ऑफिस मित्र मैत्रिणी सगळ्याच ठिकाणी आपल्या काही आठवणी असतात. खूप वर्षांनी जेव्हा एखाद्या स्नेहसंमेलनाला सगळे जमले कि अशा आठवणींना उजाळा दिला जातो. आणि मग पोटभर हसून डोळ्यात पाणी येत. आणि या स्नेहसंमेलनाच्या निम्मिताने आणखी आठवणी जोडल्या जातात , जुन्या आठवणींसोबत.
मोठे झालो , कमवायला लागलो कि मग पहिला पगार,  पहिले ऑफिस, सगळेच साठवण करून ठेवण्या सारखे. अगदी पहिली ट्रेन आणि त्यात झालेल्या मैत्रीचा हि एक वेगळा आठवणींचा कप्पा असतो प्रत्येकाच्या हृदयात. प्रेमात पडलेल्याना तर आठवणींचा साठाच तयार करता येतो. अगदी पहिल्या भेटी पासून ते पहिल्या ब्रेकअप पर्यंत सगळ्याच आठवणी. आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीनी अंगावर मोरपीस फिरवल्यासारखे वाटते.  आयुष्यात आपण पहिल्यांदा म्हणून ज्या ज्या गोष्टी करतो त्यांच्या आठवणी खूप नाजूकपणे जपून ठेवतो आपण.अगदी आपल्या पहिल्या आजारपणाची आठवण हि जपून ठेवतो .  बाई साठी तिचे पहिले गरोदरपण या सारखी दुसरी गोड आठवण नाही.
कधीतरी निवांत बसलेले असताना एखादे गाणे कानावर येते आणि मग त्या गाण्याबरोबर बऱ्याच आठवणी डोळ्यासमोरून जातात. कित्येक वेळा एखादा सिनेमा पाहताना म्हणा किंवा दुसऱ्यांच्या गप्पा हि ऐकताना आपल्याला आपले काहीतरी आठवायला लागते. आणि मग आपण एकटेच मनातल्या मनात हसत राहतो. 
सगळ्यात मजा येते ती जुने फोटो पाहताना. आता काय प्रत्येक क्षण तुम्ही मोबाईल च्या कॅमेऱ्यात बंद करू शकता. पण पूर्वी फोटोचे अल्बम होते. लग्नाचे म्हणा किंवा  बारशाचे म्हणा किंवा अगदी आपल्या वाढदिवसाचे. ते जुने अल्बम पहिले कि हसून हसून वाट लागते. कोण कसे दिसायचे या पासून ते कुणी आता कुठे आहे या पर्यंत सगळ्या आठवणी निघतात. त्या वेळी डिलिट चा पर्याय नसल्यामुळे कधी कधी  चमत्कारिक फोटो निघत. ते पाहताना तर गम्मतच येते. ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते असेल त्याला ओशाळल्यासारखे होते आणि मग अशाच घडलेल्या गमती जमती चे किस्से सांगितले जातात. 
 आठवण जितकी चांगली तितकी वाईट.  सगळ्यात वाईट असते ती आपल्याला सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण . मग त्या कायमच्या असोत  किंवा गैरसमजामुळे लांब झालेल्या असो. जाणारी व्यक्ती निघून जाते आपण मात्र त्या व्यक्तीच्या आठवणीत गुरफटून राहतो. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेशी त्या व्यक्तीच्या आठवणींचा संदर्भ लावायचा प्रयत्न करतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करतो. मन कासावीस होते पण विसरायचा प्रयत्न करूनही न विसरता येणाऱ्या आठवणी असतात   जोडलेल्या. त्या व्यक्तीच्या आठवणीने दर वेळी आपले डोळे पाणावतात. असे म्हणतात कि आपण जी गोष्ट जास्त विसरायचा प्रयत्न करतो ती तितक्याच तीव्रतेने आपल्याला आठवते. आणि मग कुणीतरी पाठीत भाला मारावा तश्या त्या आठवणींच्या जखमा भळभळत राहतात.
हल्लीच्या काळातल्या विभक्त कुटुंबामुळे सगळ्यानांच फक्त जुन्या आठवणींवर जगावे लागते. मुले कुठेतरी परदेशी आणि आई वडील एकटेच. अशा वेळी दोन्ही कडे या आठवणीच एकमेकांना सोबत देतात.

एकटेपणात आपल्याला हक्काने कुणी साथ देते तर त्या आपल्या आठवणी, अशा आठवणींच्या कट्ट्यावर एकदा बसलो  ना कि तासनतास कसे निघून जातात ते कळतच नाही. या जुन्या नव्या आठवणींचे पोते उघडून बसलो  कि त्यातून किती वर्षांपूर्वीच्या आणि किती प्रकारच्या वस्तू निघतील हे सांगणे कठीणच. आठवण कशीही असो चांगली किंवा वाईट कुठल्याही कारणाने आलेली आठवण डोळ्यात पाणी नक्कीच आणते. 
आणि ह्या आठवणींची गम्मत माहित आहे? या कधीच म्हाताऱ्या होत नाहीत. त्या सतत ताज्या आणि टवटवीत असतात. 


 

12 comments:

  1. Mast Milan. Vachun athvnichy flash back madhe gelo :)

    ReplyDelete
  2. One more nicely write up dear. The last two lines are superb.
    Mala vatate tyamulech tu kayam athvani sarkhi tavtavit ani fresh asets. Keep it up!!

    ReplyDelete
  3. Really touchy .... and emotional artical ..... nuste vachtanach pratyek shabdanusar kititari athvani dolya samorun gelya...khupp sunder lihileyss

    ReplyDelete
  4. Aaplya junya athavanina ujala dila Milan txs for this blog and realy tears coming from eyes dear������

    Ratna

    ReplyDelete
  5. Very true, kadhi kadhi vatat aathavani mulech aapan jagato

    ReplyDelete
  6. Milan .... Actually changalya aathavani ek prakarchya aaplyasathi assets asatat.. Superb��


    Vinda

    ReplyDelete
  7. Kup sundar.Baryach athanvni aahet je aplyana kahi prasnagatna, ganyatna dadlelya astat. Te gane, prasnag, thikan ale ki lagech athavtat

    ReplyDelete
  8. सगळ्यात वाईट असते ती आपल्याला सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण . मग त्या कायमच्या असोत किंवा गैरसमजामुळे लांब झालेल्या असो. HEY EKDAM BROBER AHE TAI...

    ReplyDelete