Saturday, 28 January 2017

काही व्यक्ती अशा हि ​.........

             कधी कधी आपल्याला खूप एकटे एकटे वाटते , आपल्या माणसांनाही आपल्याशी बोलायला वेळ नसतो. सगळेच खूप बिझी बिझी. तेव्हा प्रश्न पडतो आपणच एकटे रिकाम टेकाडे आहोत कि काय? सगळे चांगले गुण असूनही नाकर्ते असल्या सारखे वाटते. खरेच आहे पण आताच्या युगात नुसते भावनिक असून चालत नाही, तर व्यवहारी हि असावे लागते. सगळ्या भावना बाजूला ठेवून फक्त काम आणि पैसे या दोनच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. या शर्यतीच्या जगात कुणी कुणाचे नसते, फावल्या वेळात मन रामवायला प्रत्येकाला काहीतरी हवे असते. त्यात मानसिक गुंतवणूक नको असते. या हल्लीच्या शर्यतीच्या युगात फक्त व्यवहारी माणसांचाच निभाव लागू शकतो. 
                 पण तरीही या जगात आहेत काही व्यक्ती ज्या फक्त मनाने विचार करतात, जी आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाशी इमोशनली बांधली जातात. कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता नाती जोडतात. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतात,ज्यांना प्रत्येक क्षणाच्या आठवणी जपायला आवडते, आपल्या माणसांसोबत वेळ घालवायला आवडते, खूप बोलायला हि आवडते आणि खळखळून हसायला हि आवडते. मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता आपले मत सांगायला आवडते, समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला आवडते, माणसे जोडायला आवडतात , आपल्या माणसांवर छोट्या छोट्या गोष्टींवर रुसायला आवडते आणि रुसलेल्यानची समजूत काढायला हि आवडते. 

              कधी कधी त्याची हि अपेक्षा असते कि आपण रुसलो रागावलो तर समोरच्या व्यक्तीने आपलीही समजूत काढावी. कुणीतरी म्हणावे कि " खूप काम होते पण फ़क्त तुझ्यासाठी सगळे बाजूला ठेवले" , कुणाच्या तरी इतके जवळ असावे कि त्या व्यक्तीने आपल्याशी सगळे शेअर करावे. 
                  
           पण असे कधीच होत नाही जी व्यक्ती भावनिक तीच जास्त दुखावली जाते,कारण त्या व्यक्तीच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात, ज्या पैशानं पूर्ण होणाऱ्या नसतात तर मायेने पूर्ण होणाऱ्या असतात. ज्या या व्यस्त आणि स्पर्धा युगात पूर्ण होणे कठीण. अशा व्यक्तींना दुखावण्या पेक्षा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. खरंच जर अशी कोण व्यक्ती असेल तर एकदा तरी त्या व्यक्ती साठी वेळ काढून तिच्या साठी आणि तिच्या सारखे जागून पहा. तुमच्या साठी सतत हरणाऱ्या व्यक्ती ला एकदा जिंकायची संधी द्या. कदाचित त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हालाही जगण्याचा वेगळा मार्ग दाखवून देईल. 

15 comments:

  1. Milan manala sparshun janare agadi sopya bhashet lihle ahes.Very good.

    ReplyDelete
  2. Very good. Being extreme emotional and being very aloof, both are causes of displeasure in life.
    Very good thought...

    ReplyDelete
  3. ekdam barobar .....bhavnik vyaktich khup dukhavali jate. nice....

    ReplyDelete
  4. Sunder milan... One more fresshh writeup added... Carry on.. Good going

    ReplyDelete
  5. khup sundar lihile ahe same mi ashich ahe bhavnik khup dukh hote jar samorch manus aplya manavirudh vagla ki tumcha lekh vachtana ase vatle ki mazyabaddalch lihile ahe khup chan

    ReplyDelete