मी आणि
आसावरी अगदी शिशु वर्गापासुंच्या एकत्र .मला पाचवी नंतर १९८८ मध्ये आम्ही
शिफ्ट झालो. त्यामुळे मला चेंबूरची आमची शाळा सोडून विरारला शाळेत जावे
लागले. त्यावेळी फोन, सोशल नेट वर्कींग साईट्स नसल्यामुळे आम्हला
एकमेकींशी संवांद नाही साधता आला. आठवण तर भरपूर यायची दोघीनाही. पण २०१३
मध्ये आमच्या शाळेच्या साईट वर मला राजेश गावडे चा नंबर मिळाला, आणि मग
त्याच्याकडून आसावरी चा. तब्बल २३ वर्षानंतर आम्ही एकमेकिंशी फोनवर बोललो.
असे वाटले जसे आत्ताच कधीतरी मी शाळा सोडली. तिच्याशी बोलल्यावर जवळ जवळ
अर्धा तास मी रडत होते. सगळा भूतकाळ डोल्यासारोम उभा रहिल. मला तिने ५ वि
मध्ये असताना गायलेले " केशवा माधवा" गाणे अजूनही आठवतेय. आणि तिला मी
पाचवीत असताना पहिल्याच दिवशी तिने मारले म्हणून बाईन कडे केलेली तक्रार
आठवतेय. शाळा सुटल्यावर आम्ही अगदी हातात हात घालून बाहेर पडायचो आणि "
किस्मत अपनी खूल गयी" ह्या गाण्यावर मान डोलवत आणि दोन वेण्या हलवत बाहेर
पडायचो. अगदी एकमेकिंना दिसेनास्या होईपर्यंत टाटा करत राहायचो. एकदा
बोलल्या नंतर आम्ही दर ३-४ महिन्यातून एकदा तरी भेटतोच . योगायोग असा कि
आम्हला दोघीनाही एक एक मुलगी आणि दोघींची नावे " अ" पासून सुरु होतात.
खंत एकच आहे कि तिने गाणे सोडले , पण आता ती एक उत्तम निवेदिका अहे.
खरच बालपणी ची मैत्री किती शुध्द आणि सच्ची असते. इतक्या वर्षाच्या ग्याप नंतर हि आमची मैत्री तशीच आहे जशी आम्ही शाळेत असता
ना होती निखळ, एकमेकींवर निस्सीम प्रेम आणि विश्वास.
khup sundar maitri ahe tumchi mastch
ReplyDelete