Wednesday, 25 January 2017

टिम १९९२

​​१९९० मध्ये आम्ही विरार ला राहायला आलो आणि अ .व. स्मारक विद्यामंदिर मध्ये प्रवेश घेतला  .​
एक वर्ष मागच्या वर्गात काढल्यावर दहावीत मला "ब" वर्ग मिळाला. तसे पाहायला गेलो तर एकच वर्ष जेमतेम . पण त्या वर्षभरात सगळ्यांनी मला ग्रुप मध्ये सामावून घेतले. शाळेनंतर सर्वजण वेगवेगळ्या कॉलेज ला गेल्यामुळे कुणाची भेट अशी होत न्हवती. २१ डिसेंबर २००८ मध्ये आम्ही मुली मुले एकत्र असे पहिल्यांदा भेटलो. शाळेत असताना 'अ' वर्ग फक्त मुलांचा असल्यामुळे 'अ' आणि 'ब' वर्गांमध्ये अगदी खुन्नस होती. त्यामुळे संवाद व्हायला जरा वेळ लागला. पण त्यानंतर दर वर्षी आम्ही २-३ वेळा भेटतोच. १८ जानेवारी २०१४ ला आम्ही सगळ्या म्हणजे अगदी बालवर्गापासूनच्या जवळ जवळ ४५ शिक्षकांना बोलवून शाळेच्या पटांगणातच एक स्नेहसंमेलन केले. 
मी,मंदार,मितेश,रत्ना,शीतल,मृणाल,बंटी,मुक्ता ​,आनंद,अमित,दीपाली ,वैभवी, स्वप्ना ,​स्मिता, दुर्गेश, शैलेश, दीपक, योगेश , विंदा ,आणि असे बरेच जण, आम्ही सर्व जण एक टीम बनून काम करतो. आम्ही आमच्या टीम चे नाव हि ठेवलेय " टीम १९९२". आमची टीम नुसती मजा मस्ती करत नाही तर आम्ही काही चांगली कामे करण्याचाही प्रयत्न करतो. २०१० पासून आतापर्यंत आम्ही आमच्या शाळेत, काही वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शेतकरी संघटना , अशा काही ठिकाणी देणग्या दिल्या आहेत. तसेच ह्या सगळ्यात प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत असतो. काही परदेशी असणाऱ्या मित्र मैत्रिणींचा ह्या देणग्या देण्यात बराच मोठा हातभार लागतो. शाळेत एकमेकांशी अजिबात ना बोलणारे , खुन्नस ठेवणारे आता मोकळेपणाने बोलायला लागलेत. शाळेत मस्तीखोर वाटणारी मुले आता खूप काळजी करणारी , मुलींना समजून घेणारी झालीत. कुठेही गेटटूगेदर असले तरी आम्हाला त्या स्थळापर्यंत आणून घरी परत सोडायची जबाबदारी ते आनंदाने घेतात. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा अगदी आमचे सध्याचे वय विसरून अगदी शाळेच्या सहलीला करावी तशी धमाल करतो. आपल्या शाळकरी मित्र मैत्रिणींबरोबर प्रत्येक जण आपले त्रास, टेन्शन विसरून एन्जॉय करतो. 

शाळेत असतानाचे भेदभाव विसरून आता आमच्यात झालेली मैत्री अशीच घट्ट राहू दे  आणि मौजमजेसोबत आमच्याकडून ह्या  पुढेही समाजाची सेवा घडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 


6 comments: