एका वेगळ्या वाटेवर
एअरपोर्ट ची वेटिंग रूम, फ्लाईट ला अजून वेळ होता. सगळेच प्रवासी इथे तिथे रेंगाळत होते. ती हि एका खुर्ची वर आपला लॅपटॉप उघडून बसली होती. कुठल्यातरी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करणारी असावी. छोटे केस, डोळ्याला महागडा चष्मा, फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि काळ्या रंगांचे बूट. काम करता करता तिला कंटाळा आला बहुतेक तिने जरा आळस दिल्यासारखे केले. चष्मा काढून पुसला,आणि आजू बाजूला पाहायला लागली. तिथे बसलेल्या एका आई आणि मुलीकडे ती बराच वेळ निरखून बघत होती.
मग हळूच डोळे मिटून नकारार्थी मान हलवली. थोडीशी मागे टेकली आणि हाताची घडी घालून विचार करायला लागली. तिची मुलगी अन्विता आता दहावीत गेली होती. गेल्या १०-१२ वर्षात एकटीने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून ती थकली होती. तिने डोळे मिटले आणि सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळला . अगदी तिच्या शिक्षणापासून. त्या दोघी बहिणी अर्चना आणि अश्विनी.अर्चना मोठी आणि हि अश्विनी धाकटी . स्वभावाला तितक्याच उलट. अर्चना अबोल, हुशार, अति अभ्यासू आणि अश्विनी बोलकी , हुशार, अभ्यास जेवढ्यास तेवढा पण तरीही पहिल्या पाचात येणे तिने कधी सोडले नाही. वडील सरकारी कर्मचारी त्यामुळे घराची परिस्थिती हि चांगली. अर्चना ला सी. ए व्हायचे होते म्हणून ती कॉमर्स ला गेली. हिला इंजिनीअर व्हायचे होते.
बारावीनंतर स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर स्कॉलरशिप मिळवून ती हट्टाने इंजिनीअरिंग ला गेली. आणि त्याच हट्टाने आणि जिद्दीने इंजिनीयर ही झाली. तिच्या हुशारीच्या बळावर तिला एका चांगल्या कंपनीत नोकरीहीमिळाली. ऑफिसच काम ती अगदी इमानेइतबारे करत होती. तिचे ते वयच होते मजा मस्ती करण्याचे त्यामुळे ऑफिसच्या पार्ट्या, पिकनिक सगळे ती एन्जॉय करत होती. काही गोष्टी तिच्या आईला खटकत होत्या पण अश्विनी तशी कुणाचे ऐकणारी नव्हती. तिला जे बरोबर वाटेल पटेल तेच ती करत असे. याच दरम्यान तिची ओळख झाली माधवशी. माधव तिच्या प्रेमात पडला होता , त्याने तिला रीतसर लग्नासाठी हि विचारले होते. पण तिची मनाची तयारी नव्हती. घरी अर्चनाच्या लग्नाची गडबड सुरू झालीच होती . अर्चनाला तिच्या मनासारखा नवरा मिळत नव्हता त्यात २ वर्ष गेली आणि मग अर्चनाचे लग्न ठरले. तिच्या अनुभावरून शहाणे होऊन अश्विनी ने माधव शी लग्न करायचे ठरवले. खरे तर आंतरजातीय विवाह म्हणून आधी कुणाला मान्य नव्हते पण अश्विनीच्या आणि माधवच्या निर्णयापुढे कुणाचे काही चालले नाही . आतापर्यंत अश्विनी चे आयुष्य अगदी सरळ रेषेत सुरु होते पण या लग्नानंतर तिच्या आयुष्यात खूप वेगवेगळी वळणे आली ज्याचा कुणीच कधीच विचार केला नव्हता.
लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस खूपच छान होते. निदान वर वर तरी सगळे छान वाटत होते. तिला जमेल तशी ती घरात मदत करत होती. लग्नानंतरची सुट्टी संपली आणि दोघांनी ऑफिस ला जायला सुरवात केली आता मात्र तिची तारांबळ उडत असे. माधव आणि ती एकाच ऑफिस मध्ये असल्याने दोघे एकत्र निघत. पण घरातले सगळं आटपून निघायला उशीर होत असे. सुरवातीला तिच्यासाठी थांबणारा माधव आता आधी निघायला लागला. लोकल चा प्रवास , घराची कामे अश्विनी थकून जात असे. पहिला महिनाभर तिला काही नको करणारी सासू आता काही करत नसे.
लग्नानंतर तीनच महिन्यात अश्विनी ला येणाऱ्या बाळाची चाहूल लागली . बापरे!!! हे काय होऊन बसले होते. दोघांचीही मनाची तयारी नव्हती. माधव तर जबाबदारी साठी तयारच नव्हता. पण आशिवनी ला बाळाचा असा जीव घेणे तिला पटत नव्हते. तिने ते बाळ वाढवण्याचा निर्णय घेतला. रोजचा प्रवास , घराची कामे, गर्भारपण सगळे सांभाळताना अश्विनी ची खूप वाईट अवस्था झाली. खूप अशक्त झाली होती. माधव तिला डॉक्टर काय नेणे आणणे करत होता पण त्याच्या मनात अजूनही होते कि हे बाळ अश्विनीने ठेऊ नये. त्याच्या मनाची तयारी नव्हती मुलाची जबाबदारी . पण घरात तिला आराम नव्हता. आता सहा महिने उलटले अश्विनी खूप अशक्त झाली होती डॉक्टरांनी तिला धावपळ कमी करायला सांगितली. म्हणून तिने आईकडे राहण्याचा निर्णय घेतला.
माधव अधून मधून तिला येऊन भेटून जात असे. अश्विनी ने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी म्हटल्यावर आधीच नाराज असलेला माधव अजून नाराज झाला. तिथे सासरीही जास्त काही कुणाला आनंद झालेला दिसला नाही. तिच्या आईला दोन्ही मुलीच म्हणून हिला मुलगी असा टोमणा हि मारून झाला. महिनाभर आई कडे राहून पुन्हा सासरी जाणे तिला जड झाले होते. पण पर्याय नव्हतया. त्याच दरम्यान माधव ची बदली बँगलोर झाली. अश्विनी ला कळेना काय सुरु आहे हे ? एका मागून एक समस्या तिच्या समोर येत होत्या. अजून तिची १ महिना सुट्टी शिल्लक होती. त्या दरम्यान तिने ऑफिस मध्ये प्रयत्न करून स्वतःचींहि बदली बँगलोर करून घेतली. आता त्या तिघांचा त्रिकोणी संसार सुरु झाला. मुलीची पाळणाघरात सोय करून तिने ऑफिसला जाणे सुरु केले. मन तुटत होते पण पर्याय नव्हता. पण या सहा महिन्याच्या दुराव्यात तिला माधव चे बदलेले वागणे खटकत होते.
अन्विता मोठी होऊ लागली. अश्विनी ऑफिस च्या कामासाठी बाहेर गेली कि अश्विनीची आई अन्विता साठी येऊन राहत असे. माधव हि जास्त वेळ ऑफिस मधेच असे. माधव चे असे जास्त वेळ बाहेर राहणे, सतत मोबाईल वर असणे आई ला हि खटकत असे. अश्विनीला तिने बोलूनही दाखवले होते पण अश्विनीने दुर्लक्ष केले होते. आता अन्विता शाळेत जाऊ लागली होती. अश्विनी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी नीट पार पाडत होती. कधीतरी माधव शनिवार रविवार अन्विताला स्वतःहून बाहेर फिरायला नेत असे. एक दिवस अन्विता येताना रडत घरी आली , ती कुठेतरी पडली होती आणि तिला बऱ्यापैकी लागले होते. माधव च्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. खूप खोदून खोदून विचारल्यावर अन्विता ने सांगितले पप्पा मीरा मावशीबरोबर बोलत होते, ती नेहमी भेटते आम्हाला. अश्विनी ने रागाने माधव कडे पहिले तो मान घालून उभा होता. अश्विनीचे विचार चक्र सुरु झाले. माधवची बदललेली वागणूक , मीरा ची जवळची मैत्रीण म्हणून करून दिलेली ओळख, तिचे सतत घरी येणे जाणे, माधव चे सतत फोनवर असणे. तिचा पारा चढला पण त्यावेळी शांत राहिली. अन्विता ला घेऊन बेडरूम मध्ये गेली. त्यादिवशी कोणीच कुणाशी काही बोलले नाही. दोन तीन दिवस असेच शांततेत गेले. आणि एक दिवस अश्विनीने अन्विता शाळेत गेल्यावर जाब विचारला आणि आश्चर्य म्हणजे माधव ने काही आढेवेढे ना घेता कबूल केले कि त्याचे मीरा वर प्रेम आहे. पुढचे वाक्य जास्त धक्कदायक होते त्याला अश्विनीपासून घटस्फोट हवा होता. अश्विनी हतबल होऊन तिथेच बसली. काय करावे सुचेना पण अशी हार मानणारी ती नव्हती. त्यानंतर बऱ्याच वेळा सगळ्यांनी समजावून बघितले पण माधव ऐकायला तयार नव्हता. शेवटी घटस्फोटाची केस उभी राहिली त्यात ३-४ वर्ष गेली , अश्विनी आई कडे येऊन राहिली होती. शेवटच्या दिवशी जेव्हा कोर्टात विचारले गेली मुलीच्या कस्टडी विषयी माधवने चक्क अन्विताचे पालकत्व हि नाकारले. सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता. अश्विनीची आपला संसार टिकवायची शेवटची आशा हि मालवली होती.
खूप विचित्र अवस्थेतून अश्विनी जात होती . मुलीची जबाबदारी, नोकरी, प्रेमविवाह करून झालेला घटस्फोट, लोकांमध्ये होणारी चर्चा सगळेच. लग्नापर्यंत सरळ धोपट असणारे तिचे आयुष्य अचानक अगदी गुंतागुंतीचे झाले होते. पण कशानेही हार मानेल ती अश्विनी कुठली. आईबाबांसोबत राहायचे म्हणून तिने मोठे घर घेतले. माधवसोबत झालेल्या भांडणानंतर तिने परत मुंबई ला बदली घेतली होती. तेव्हा पासूनच तिच्या डोक्यात होते कि स्वतःचे काहीतरी सुरु करायचे, सतत स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवायचे . आणि हळू हळू त्या दिशेने तिने तयारी करायाला हि सुरवात केली होती. तिने स्वतःचा ज्ञानाचा उपयोग व्हावा या दृष्टीने स्वतःचे छोटे क्लासेस सुरु केले. २-४ बाहेरचे शिक्षकही ठेवले. त्यातच एक शिक्षिका होती पल्लवी. पल्लवी अत्यंत हुशार मुलगी. आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होती ३ वर्षात तिने ४ नोकऱ्या केल्या होत्या. घरातून लग्नासाठी मागे लागले असले तरी तिला स्वतःला एम बी ए करायचे होते. म्हणून ती पार्ट टाइम नोकरी करत होती. तिची मुलाखत घेतानाच अश्विनीला तिच्यातले वेगळेपण जाणवले होते. ती स्वतःला तिच्यात पाहत होती. अश्विनी नसली कि पल्लवी सगळं व्यवहार बघत असे. दोघींचे विचार बरेच सारखे असल्यामुळे दोघी सतत एकत्र असत. त्यांच्यामध्ये वेगळेच नातं तयार झाले होते.
अश्विनीच्या घटस्पोटाच्या धक्क्याने आई खचली होती आणि एक दिवस अचानक ती झोपेतच गेली. सगळे नीट होत असताना परत एकदा अश्विनीला मोठा धक्का. त्यावेळी वयाने बरीच लहान असून पल्लवीने अश्विनी ला आधार दिला. अन्विता, बाबा , क्लास तिन्ही गोष्टी ती सांभाळत होती. त्यामुळे त्याही परिस्थितीत अश्विनीला ऑफिसमध्ये लक्ष देता येत होते. या घटनेने त्या दोघी अजून जवळ आल्या. न बोलता सांगता दोघीना लक्षात आले होते कि त्यांच्यात मैत्रीपेक्षा एक वेगळे नाते तयार झाले आहे. लोकांच्या दृष्टिने हे कदाचित चुकीचे होते पण दोघीनाही त्याची पर्वा नव्हती. पल्लवीच्या घरी हि या विषयावरून वाद होत असत पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. प्रश्न होता तो बाबांना आणि मुख्य अन्विताला समजावण्याचा. दोघी जेव्हा कधी या विषयवार बोलत तेव्हा त्यांना सतत अन्विताच्या प्रतिक्रियेचा विचार येत असे. अश्विनी आडून आडून अन्विताला तिच्या आणि पल्लवीच्या नात्याची कल्पना देत असे. अन्विताही आजच्या काळातली मुलगी असल्यामुळे तिला काही गोष्टी काळात होत्या पण त्या आपल्या घरात घडाव्या हे तिला पचायला जड जात होते. पण कधी कधी ती आईच्या सगळ्या मनस्थितीचाही विचार करत असे. पल्लवी तिला आवडत होती. पण तरीही... . अश्विनीला जे काही करायचे होते ते अन्विताच्या परवानगीने. यावेळी ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर पडताना तिने खूप विचार केला. अन्विताच्या दहावी पर्यंत थांबून मग तिला , आणि पल्लवीला कुठेतरी बाहेर फिरायला नेऊन अन्विताला सगळ्यागोष्टींची कल्पना द्यायची आणि कायमचे पल्लवी सोबत राहायचे अर्थात अन्विताला घेऊन.
तिचे मन भूतकाळात फिरत असतानाच विमानाच्या घोषणेने ती भानावर आली. डोळ्यात आलेले पाणी हलकेच टिपले. लॅपटॉप बंद करून बॅग मध्ये ठेवला. कुणालातरी फोन लावला ..... पल्लवी मी तयार आहे कायमची तुझ्यासोबत राहायला पण अजून एका वर्षानंतर ... अन्विताला मी सांगेन समजावून इतके म्हणून फोन ठेवला आणि गालातल्या गालात हसत काउंटर च्या दिशेने चालायला लागली.
लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस खूपच छान होते. निदान वर वर तरी सगळे छान वाटत होते. तिला जमेल तशी ती घरात मदत करत होती. लग्नानंतरची सुट्टी संपली आणि दोघांनी ऑफिस ला जायला सुरवात केली आता मात्र तिची तारांबळ उडत असे. माधव आणि ती एकाच ऑफिस मध्ये असल्याने दोघे एकत्र निघत. पण घरातले सगळं आटपून निघायला उशीर होत असे. सुरवातीला तिच्यासाठी थांबणारा माधव आता आधी निघायला लागला. लोकल चा प्रवास , घराची कामे अश्विनी थकून जात असे. पहिला महिनाभर तिला काही नको करणारी सासू आता काही करत नसे.
लग्नानंतर तीनच महिन्यात अश्विनी ला येणाऱ्या बाळाची चाहूल लागली . बापरे!!! हे काय होऊन बसले होते. दोघांचीही मनाची तयारी नव्हती. माधव तर जबाबदारी साठी तयारच नव्हता. पण आशिवनी ला बाळाचा असा जीव घेणे तिला पटत नव्हते. तिने ते बाळ वाढवण्याचा निर्णय घेतला. रोजचा प्रवास , घराची कामे, गर्भारपण सगळे सांभाळताना अश्विनी ची खूप वाईट अवस्था झाली. खूप अशक्त झाली होती. माधव तिला डॉक्टर काय नेणे आणणे करत होता पण त्याच्या मनात अजूनही होते कि हे बाळ अश्विनीने ठेऊ नये. त्याच्या मनाची तयारी नव्हती मुलाची जबाबदारी . पण घरात तिला आराम नव्हता. आता सहा महिने उलटले अश्विनी खूप अशक्त झाली होती डॉक्टरांनी तिला धावपळ कमी करायला सांगितली. म्हणून तिने आईकडे राहण्याचा निर्णय घेतला.
माधव अधून मधून तिला येऊन भेटून जात असे. अश्विनी ने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी म्हटल्यावर आधीच नाराज असलेला माधव अजून नाराज झाला. तिथे सासरीही जास्त काही कुणाला आनंद झालेला दिसला नाही. तिच्या आईला दोन्ही मुलीच म्हणून हिला मुलगी असा टोमणा हि मारून झाला. महिनाभर आई कडे राहून पुन्हा सासरी जाणे तिला जड झाले होते. पण पर्याय नव्हतया. त्याच दरम्यान माधव ची बदली बँगलोर झाली. अश्विनी ला कळेना काय सुरु आहे हे ? एका मागून एक समस्या तिच्या समोर येत होत्या. अजून तिची १ महिना सुट्टी शिल्लक होती. त्या दरम्यान तिने ऑफिस मध्ये प्रयत्न करून स्वतःचींहि बदली बँगलोर करून घेतली. आता त्या तिघांचा त्रिकोणी संसार सुरु झाला. मुलीची पाळणाघरात सोय करून तिने ऑफिसला जाणे सुरु केले. मन तुटत होते पण पर्याय नव्हता. पण या सहा महिन्याच्या दुराव्यात तिला माधव चे बदलेले वागणे खटकत होते.
अन्विता मोठी होऊ लागली. अश्विनी ऑफिस च्या कामासाठी बाहेर गेली कि अश्विनीची आई अन्विता साठी येऊन राहत असे. माधव हि जास्त वेळ ऑफिस मधेच असे. माधव चे असे जास्त वेळ बाहेर राहणे, सतत मोबाईल वर असणे आई ला हि खटकत असे. अश्विनीला तिने बोलूनही दाखवले होते पण अश्विनीने दुर्लक्ष केले होते. आता अन्विता शाळेत जाऊ लागली होती. अश्विनी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी नीट पार पाडत होती. कधीतरी माधव शनिवार रविवार अन्विताला स्वतःहून बाहेर फिरायला नेत असे. एक दिवस अन्विता येताना रडत घरी आली , ती कुठेतरी पडली होती आणि तिला बऱ्यापैकी लागले होते. माधव च्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. खूप खोदून खोदून विचारल्यावर अन्विता ने सांगितले पप्पा मीरा मावशीबरोबर बोलत होते, ती नेहमी भेटते आम्हाला. अश्विनी ने रागाने माधव कडे पहिले तो मान घालून उभा होता. अश्विनीचे विचार चक्र सुरु झाले. माधवची बदललेली वागणूक , मीरा ची जवळची मैत्रीण म्हणून करून दिलेली ओळख, तिचे सतत घरी येणे जाणे, माधव चे सतत फोनवर असणे. तिचा पारा चढला पण त्यावेळी शांत राहिली. अन्विता ला घेऊन बेडरूम मध्ये गेली. त्यादिवशी कोणीच कुणाशी काही बोलले नाही. दोन तीन दिवस असेच शांततेत गेले. आणि एक दिवस अश्विनीने अन्विता शाळेत गेल्यावर जाब विचारला आणि आश्चर्य म्हणजे माधव ने काही आढेवेढे ना घेता कबूल केले कि त्याचे मीरा वर प्रेम आहे. पुढचे वाक्य जास्त धक्कदायक होते त्याला अश्विनीपासून घटस्फोट हवा होता. अश्विनी हतबल होऊन तिथेच बसली. काय करावे सुचेना पण अशी हार मानणारी ती नव्हती. त्यानंतर बऱ्याच वेळा सगळ्यांनी समजावून बघितले पण माधव ऐकायला तयार नव्हता. शेवटी घटस्फोटाची केस उभी राहिली त्यात ३-४ वर्ष गेली , अश्विनी आई कडे येऊन राहिली होती. शेवटच्या दिवशी जेव्हा कोर्टात विचारले गेली मुलीच्या कस्टडी विषयी माधवने चक्क अन्विताचे पालकत्व हि नाकारले. सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता. अश्विनीची आपला संसार टिकवायची शेवटची आशा हि मालवली होती.
खूप विचित्र अवस्थेतून अश्विनी जात होती . मुलीची जबाबदारी, नोकरी, प्रेमविवाह करून झालेला घटस्फोट, लोकांमध्ये होणारी चर्चा सगळेच. लग्नापर्यंत सरळ धोपट असणारे तिचे आयुष्य अचानक अगदी गुंतागुंतीचे झाले होते. पण कशानेही हार मानेल ती अश्विनी कुठली. आईबाबांसोबत राहायचे म्हणून तिने मोठे घर घेतले. माधवसोबत झालेल्या भांडणानंतर तिने परत मुंबई ला बदली घेतली होती. तेव्हा पासूनच तिच्या डोक्यात होते कि स्वतःचे काहीतरी सुरु करायचे, सतत स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवायचे . आणि हळू हळू त्या दिशेने तिने तयारी करायाला हि सुरवात केली होती. तिने स्वतःचा ज्ञानाचा उपयोग व्हावा या दृष्टीने स्वतःचे छोटे क्लासेस सुरु केले. २-४ बाहेरचे शिक्षकही ठेवले. त्यातच एक शिक्षिका होती पल्लवी. पल्लवी अत्यंत हुशार मुलगी. आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होती ३ वर्षात तिने ४ नोकऱ्या केल्या होत्या. घरातून लग्नासाठी मागे लागले असले तरी तिला स्वतःला एम बी ए करायचे होते. म्हणून ती पार्ट टाइम नोकरी करत होती. तिची मुलाखत घेतानाच अश्विनीला तिच्यातले वेगळेपण जाणवले होते. ती स्वतःला तिच्यात पाहत होती. अश्विनी नसली कि पल्लवी सगळं व्यवहार बघत असे. दोघींचे विचार बरेच सारखे असल्यामुळे दोघी सतत एकत्र असत. त्यांच्यामध्ये वेगळेच नातं तयार झाले होते.
अश्विनीच्या घटस्पोटाच्या धक्क्याने आई खचली होती आणि एक दिवस अचानक ती झोपेतच गेली. सगळे नीट होत असताना परत एकदा अश्विनीला मोठा धक्का. त्यावेळी वयाने बरीच लहान असून पल्लवीने अश्विनी ला आधार दिला. अन्विता, बाबा , क्लास तिन्ही गोष्टी ती सांभाळत होती. त्यामुळे त्याही परिस्थितीत अश्विनीला ऑफिसमध्ये लक्ष देता येत होते. या घटनेने त्या दोघी अजून जवळ आल्या. न बोलता सांगता दोघीना लक्षात आले होते कि त्यांच्यात मैत्रीपेक्षा एक वेगळे नाते तयार झाले आहे. लोकांच्या दृष्टिने हे कदाचित चुकीचे होते पण दोघीनाही त्याची पर्वा नव्हती. पल्लवीच्या घरी हि या विषयावरून वाद होत असत पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. प्रश्न होता तो बाबांना आणि मुख्य अन्विताला समजावण्याचा. दोघी जेव्हा कधी या विषयवार बोलत तेव्हा त्यांना सतत अन्विताच्या प्रतिक्रियेचा विचार येत असे. अश्विनी आडून आडून अन्विताला तिच्या आणि पल्लवीच्या नात्याची कल्पना देत असे. अन्विताही आजच्या काळातली मुलगी असल्यामुळे तिला काही गोष्टी काळात होत्या पण त्या आपल्या घरात घडाव्या हे तिला पचायला जड जात होते. पण कधी कधी ती आईच्या सगळ्या मनस्थितीचाही विचार करत असे. पल्लवी तिला आवडत होती. पण तरीही... . अश्विनीला जे काही करायचे होते ते अन्विताच्या परवानगीने. यावेळी ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर पडताना तिने खूप विचार केला. अन्विताच्या दहावी पर्यंत थांबून मग तिला , आणि पल्लवीला कुठेतरी बाहेर फिरायला नेऊन अन्विताला सगळ्यागोष्टींची कल्पना द्यायची आणि कायमचे पल्लवी सोबत राहायचे अर्थात अन्विताला घेऊन.
तिचे मन भूतकाळात फिरत असतानाच विमानाच्या घोषणेने ती भानावर आली. डोळ्यात आलेले पाणी हलकेच टिपले. लॅपटॉप बंद करून बॅग मध्ये ठेवला. कुणालातरी फोन लावला ..... पल्लवी मी तयार आहे कायमची तुझ्यासोबत राहायला पण अजून एका वर्षानंतर ... अन्विताला मी सांगेन समजावून इतके म्हणून फोन ठेवला आणि गालातल्या गालात हसत काउंटर च्या दिशेने चालायला लागली.
सौ. मिलन राणे - सप्रे🖋️
खूप छान लिहिले आहे मिलन,, मस्तच
ReplyDelete