आपल्या सगळ्यांच्या काही सुप्त इच्छा असतात ज्या आपण बोलून दाखवत नाही. अशाच एका सुप्त इच्छेवर सुचलेली गोष्ट.....
आटपाट नगर होते. त्या नगरात सर्वसामान्य स्त्री होती. नवरा , बायको आणि एक गोंडस मुलगा असे ते तिघांचे छोटेखानी कुटुंब. नवरा कामावर आणि मुलगा शाळेत गेल्यावर सगळी घरची कामे आटपून टीव्ही पाहणे हा तिचा आवडता छंद. मराठी मालिका म्हणजे तिच्या अगदी आवडीच्या. जर वेळेत नाही भाग पाहता आला तर दुसऱ्या दिवशी रिपीट पाहायचे , पण मालिका चुकवायची नाही. एक दिवस अशीच मालिका पाहताना तिला तो दिसला ...अरे हा तर तोच जुन्या मालिकेत काम करणारा. इतकी वर्षे कुठं गायबच झाला होता. मध्ये एक नाटक केले होते वाटते याने. तिला तो त्या भूमिकेत हि आवडला होता . ही चंदेरी दुनिया जशी सगळ्यांना भूल घालते तशी तिला ही आकर्षण होते. कोणीतरी आपल्या ही जवळचे असावे या दुनियेत , किंवा आपणही कधीतरी याचा छोटासा भाग व्हायला हवे असे नेहमीच वाटायचे तिला.
एक दिवस अचानक एका सोशल साईट वर तिला तो दिसला , त्याला तिने फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली. दोन दिवसांनी त्याने ती स्वीकारली. या आभासी जगतात तो तिचा मित्र झाला होता. त्याच्यासाठी ती त्याच्या १००० मैत्रीणींपैकी एक होती. त्याच्या गावी ही नसेल कुणीतरी अशी मैत्रीण आहे. तिला खूप भारी वाटतं होते.
त्याला कधी कुठे मालिकेत, नाटकात पहिले कि ती त्याला मेसेज करत असे, कधीतरी कुठल्या तरी सणाला हि ती त्याला शुभेच्छा देत असे. नवल म्हणजे तो हि कधीतरी त्या मेसेज ला उत्तर देत असे. मग एक दिवस त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला तिला जायचे होते म्हणून तिने त्याच्या कडे प्रयोगानंतर भेटायची परवानगी मागितली. खूप आढेवेढे घेऊन त्याने हा ये म्हणून परवानगी दिली. ती खूप खुश झाली. एका ऑनलाईन सेलेब्रिटी मित्राला ती ऑफलाईन भेटणार होती. तिच्यासाठी तर तो तिच्या स्वप्नातला राजकुमार होता. नाटकात त्याच्या प्रवेशाला तिच्या काळजाचा ठोका चुकला. काहीतरी वेगळेच वाटत होते तिला. नाटक संपल्यावर लगेच ती त्याला भेटायला पळाली.त्याला भेटायचे म्हणून घाईघाईत तिने त्याच्यासाठी पत्र लिहिले होते. त्याने जेव्हा तिला नावाने ओळखले खूप खुश झाली ती तिच्या अपेक्षेच्या पलीकडचे होते हे सगळे. तो प्रत्यक्षात खूपच छान दिसत होता. तिला त्याच्याकडे नुसते पाहत राहावेसे वाटत होते. तिने निघता निघता त्याला ते पत्र दिले. अरे कशाला हे ? म्हणत त्याने ते घेतले. त्याच्या सोबत दोन फोटो काढून ती निघाली. त्याला समोर बोलू शकली नाही पण तिथून निघाल्यावर तिने त्याला मेसेज केला खूप सुंदर दिसतोस तू.
दुसऱ्या दिवशी त्याचा रिप्लाय आला थँक्स चा . त्या दिवसानंतर हळू हळू त्यांचे बोलणे वाढले. ती रोज त्याला गुड मॉर्निंग , गुड नाईट चा मेसेज करत होती. त्याला जमेल तसा तो हि बोलत होता तिच्याशी. तिला नवल वाटायचे का बरे बोलतो हा आपल्याशी? तिने विचारले पण त्याने कधी सांगितले नाही. तिला खूप उत्सुकता होतीच त्याच्या क्षेत्राविषयी त्यामुळे ती सतत त्याला काही ना काही प्रश्न विचारात असे. कधी तो उत्तर देत असे तर कधी टाळत असे. एक दिवस तिने काहीतरी विचारले आणि तो इतका चिडला कि बोलणे बंद केले. तिला खूप वाईट वाटले या गोष्टीचे. पण तिने त्याला रोज मेसेज करणे काही सोडले नाही. ८-१० दिवसांनी परत त्याने बोलायला सुरवात केली. या दिवसात ती हजारवेळा तरी त्याला सॉरी म्हणाली असेल. पण तरीही उत्तर नाही.
ती त्याच्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक करत होती. तो कधी टीव्ही वर दिसला की त्याला फोटो काढून पाठवायची. तो ही तिने केलेल्या कौतुकाचा स्वीकार करत होता. अधून मधून विचारायचा बरे होतेय ना काम माझे? ती आपली मनापासून उत्तर देई. त्याने कसेही काम केले तरी तिला आवडणारच होते. पण तरीही तिला जर नाही आवडले तर स्पष्ट सांगत होती. कधीतरी तो तिला अशी एखादी गोष्ट सांगायचा की तिला प्रश्न पडत असे आपल्याला का बरे सांगितलं असेल हे?
एक गोष्ट घडली होती त्याच्याशी बोलायला लागल्यापासून तिचा आत्मविश्वास वाढला होता.ती स्वतःवर प्रेम करायला शिकली होती. नीटनेटकं राहणे, छान दिसणे , स्वतःकडे लक्ष देणे तिला हवेहवेसे वाटू लागले होते. त्याने केलेल्या तिच्या स्तुती ने ती भारावून जायची. तिच्यासाठी तो खूप जवळचा होता. इतका जवळचा कि देवासमोर प्रार्थनेसाठी हात जोडले कि त्याच्यासाठी हि प्रार्थना करत असे. तिच्या जवळच्या लोकांसाठी वाटणारी तगमग तिला त्याचसाठी हि वाटत होती. त्यांच्या या वाढत्या संभाषणामुळे तिला त्याला भेटावेसे वाटत होते . त्याही बाबतीत तो फक्त तिला आश्वासने देऊन टाळत होता. त्याची कारणे खरी खोटी तिला कळत नव्हते. पण तिची इच्छा काही कमी होत नव्हती. शेवटी कंटाळून तिने ती इच्छा मनात दाबून टाकली. त्याच्या सोईप्रमाणे तो तिच्याशी बोलत होता आणि ती हि आपल्या सगळ्या इच्छा मनात ठेवून स्वतःच्या आनंदासाठी बोलत राहिली. एका सर्वसामान्य गृहिणीला एक सेलेब्रिटी मित्र लाभला होता हेच एक मोठे समाधान होते तिच्यासाठी.
पण एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती कि मैत्री किती मनापासून असली तरी दोन्ही बाजू समान असायला हव्यात, नाहीतर ती मैत्री फक्त आभासी मैत्री असते. अशीच असते का हि मैत्री फक्त जवळ असताना जाणवणारी? मनाने तुम्ही कितीही आपले म्हटले तरी जोपर्यंत दोन्ही बाजूने स्वीकारली जात नाही तो पर्यंत एक पुसट रेषा कायम जाणीव करून देते परकेपणाची ( दोघांमध्ये असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेच्या अंतराची). या सामान्य मैत्रिणीच्या मैत्रीची जाणीव होईल का त्याला ? तिच्यासाठी तो या चंदेरी दुनियेतील पहिला आणि शेवटचा मित्र होता. त्यांची ऑनलाईन मैत्री तशीच कायम राहिली पण त्याबरोबरच तिचा एक प्रश्न मात्र कायम अनुत्तरीत राहिला "कधी भेटायचे आपण?"
कसे सुचतात असे छान छान विषय लिहायला तुला ??.. एक चांगल्या लेखिकेचे गुण आहेत हे ... वास्तविक आणि आभासी विश्वाची छान सांगड घातलीयेस ...हा लेख बर्याच जणांच्या मनाचा ठाव घेईल ... आणि प्रत्येकाचा एक भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून जाईल यात शंका नाही !! great Milan for adding another beautiful piece of writing...keep it up !
ReplyDeleteमिलन ताई, खूप सुंदर लिहिते तू,खूप छान मांडता येतात तुला शब्द, अगदीतुझे ब्लॉग वाचता वाचता हरवुन जायला होत, पुढे काय पुढे काय अशी आतुरता मनात वाटते, खुप छान, लिहीत राहा, थांबू नकोस......
ReplyDeleteThanks a lot dear 😘😘
DeleteVery well written Milan. Keep it up.
ReplyDeleteMast
ReplyDeleteछान आहे पण अजून लिहू शकता
ReplyDeleteधन्यवाद काका🙏🏻
Deleteयापेक्षा जास्त नाही सुचलं.. सुचले पुढे कधीं तर तुम्हाला पाठवीन.
छान लिहिले आहेच. 'ती'ला एकदा भेटावं असं वाटलं. Keep writing.
ReplyDelete...सतेजा राजवाडे.
ती किंवा तो आपल्या सगळ्यांनमध्ये असतो....हे आकर्षण थोड्या फार प्रमाणत सगळ्यांमध्ये असते. काही व्यक्त होतात काही नाही. माधुरी, अमिताभ असेच किती जणांचे "तो" असतील
DeleteMilan tu hya lekhatun Maitri cha ek pailu sunder ritine ulagadun dhakavlas.
ReplyDeleteKhup Chan....
ReplyDeleteवास्तविक आणि आभासी विश्वाची छान सांगड घातलीयेस.. hey ekdam perfect bolle bhushan mastch .......
ReplyDelete