प्रिय मैत्रीण ,
खरंतर पत्र लिहिण्याची काही गरज नाही आणि आताच्या मेसेजच्या जमान्यात अगदी आऊटडेटेड तरीही पत्र ते पत्र टाइप करण्यापेक्षा लिहून जास्त छान व्यक्त होता येते असे मला वाटते. . जे काही आहे ते आता आपण समोरासमोर बोलू शकतो इतकी मैत्री आपल्यात आता नक्कीच झाली आहे. पण तरीही काही गोष्टी अशा नाही जमणार मला तुझ्यासमोर बोलायला . अर्धे अधिक तर मी तुला पहिले कि विसरूनच जातो, तरी मला बोलल्याचे समाधान . म्हणून हा उपाय मस्त तुझ्यापर्यंत नाही पोचले तरी मला आपले बोलल्याचे समाधान. तू त्या दिवशी विचारात होतीस ना कि सांग बरे दोन चार आठवणी. आता सांगतो पण कंटाळू नकोस हा आणि हसू तर अजिबात नकोस. कारण तुझ्या स्माईल वरच तर फिदा झालो ना मी. आठवत नाही पहिल्यांदा तुला कुठे पाहिले ते. पण एक दिवस शाळेच्या गेटजवळ मुलींच्या घोळक्यात तुला खळखळून हसताना पहिले आणि संपलोच मी. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी खूप वेगळीच वाटलिस तू इतर मुलींपेक्षा. आणि त्यानंतर मात्र माझा एकही दिवस गेला नाही कि मी तुला शोधले नाही. कधीतरी चोरून तर कधी समोरासमोर तुला पाहणे हा छंदच झाला होता माझा. शाळा सुटताना , भरताना अगदी मधल्या सुट्टीत सुद्धा फक्त तुला बघण्यासाठी माझा सगळं आटापिटा असायचा. मित्रांच्या किती शिव्या खाल्ल्या आहेत ते माझे मलाच माहित. तू मला आवडतेस हे जवळजवळ सगळ्या वर्गालाच ठाऊक झाले होते . कदाचित तुलाही त्याची कल्पना आलीच होती. पहिल्यांदा मला कुणीतरी इतके आवडले होते आणि कुणीतरी आवडणे हि चूक नाही. म्हणून माझ्या खास मित्रांमध्ये मी हे बोललो हि होतो. त्यामुळे त्यांचे मला तुझ्यावरून चिडवणे अंमळ जास्तच वाढले होते.
मला चांगले आठवतेय शाळा सुटताना एका मुलाने तुला धक्का मारला होता. कसले झापले होतेस तू त्याला. तुझ्या बरोबर तुझ्या दोन चार मैत्रिणी हि आल्या मग त्याला ओरडायला . तेव्हा मात्र थोडी भीती वाटली होती कसली डेंजर मुलगी आहे असे वाटले होते क्षणभर. मी हि तुझ्या मागे पुढेच असायचो शाळा भरताना आणि सुटताना त्या मुळे थोडे टेन्शन आले होते. शाळेतही कुठल्या शिक्षकांनी काही आणायला सांगितले कि जाता येता माझी नजर तुझ्या वर्गावर जायची. कधीतरी तू दिसायचीस कधीतरी नाही. मग थोडेसे नाराज व्हायला व्हायचे. तू शाळेला दांडी मारलीस कि माझा जीव मात्र कासावीस व्हायचा. मग दहा वेळा काही ना काही कारणाने आवारात दहा फेऱ्या व्हायच्या.
आता अगदी आपण दोघेही संसारात व्यवस्थित रमलोय तरीही तुझ्याविषयीची ओढ किंवा आवड कमी झाली नाही. तुझ्या बरोबर लग्न करावे किंवा साधा रोमान्स करावा असे स्वप्नातही वाटले नाही. तुझे आसपास असणेही आवडायचे मला. मला अजूनही तू आपल्या सेंड ऑफ च्या दिवशी नेसलेली ती जांभळ्या रंगाची हिरव्या काठाची साडी आठवतेय. किती गोड दिसत होतीस तू त्यात. असे वाटत होते कि दिवस संपूच नये. कारण त्या नंतर शाळा हि बंद म्हणजे तुझे दिसणेही बंद मन कासावीस झाले होते. नंतर परीक्षेच्या काळात आपलीच शाळा सेन्टर असल्यामुळे दिसलीस तू पण त्या दहावीच्या परीक्षेच्या टेन्शन मध्ये बाकी काही सुचत नव्हते.
त्यानंतर कॉलेज , जॉब लग्न सगळे होईपर्यंत आपले काही कधी भेटणे झालेच नाही. कधीतरी रस्त्यात एकमेकांसमोर आल्यावर एक स्माईल इतकेच . पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात तुझी छबी नेहमीच राहिली. तुला पूर्णपणे विसरलो असे कधी झालेच नाही. नंतर एक दिवस फोन आला " अरे !! आपल्या दहावीच्या बॅचचे गेटटुगेदर आहे. आणि मन परत भूतकाळात गेले. त्या निमित्ताने तू परत भेटशील म्हणून त्या मित्राचे हजार वेळा आभार मानले असतील मी. ज्या वेळी तुला पहिले ना त्या लाल रंगाच्या ड्रेस मध्ये किती छान दिसत होतीस. आणि तुझे ते हसू जसेच्या तसे सगळे विसरायला लावणारे. त्या दिवशीही माझ्या मित्रांनी मला काही सोडले नाही तुझ्या वरून चिडवणे सुरूच होते. त्या ऑकवर्ड स्थिती मुले तुझ्याशी धड बोलताही आले नाही मला. असा राग आला होता त्या मित्रांचा पण तरीही त्यादिवशी आपण सगळ्यांचेच फोन नंबर घेतले होते त्यामुळे एक आनंद होता मनात. पण तरीही तुला फोन करायचे हिम्मत काही झाली नाही. पण ज्या दिवशी तुझा फोन आला बापरे!!!! ऑफिस च्या खुर्चीत जवळ जवळ उडालोच होतो मी. किती बालिशपणा तरीही मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पहिल्यांदा तुझा आवाज ऐकला मस्त वाटले. अगदी नॉर्मल गप्पा मारून ५-१० मिनिटात फोन ठेवलास तू. मी मात्र आठवडाभर त्याच विश्वात होतो. कदाचित बायकोलाही ती गोष्ट जाणवली असेल. त्यानंतर मात्र बऱ्याच वेळा आपल्या छोट्या छोट्या भेटी होत होत्या. मला अजूनही आठवतेय तू पहिल्यांदा जेव्हा माझ्या गाडीत बसली होतीस पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होतास. तुला घरी ड्रॉप करेपर्यंत माझ्या काळजाची धडधड काही थांबत नव्हती. तू मात्र बडबड करण्यात दंग होतीस. तू, तुझी बडबड आणि तुझे हसू समोरच्याची पार विकेट घेते.
पण तरीही एक गोष्ट सांगू का तू इतक्या मुलांशी बोलतेस अगदी मोकळेपणाने. शाळेतही तुला एका मुलाच्या नावाने चिडवायचे पण कधीही मला राग नाही आला. किंवा जळफळाट हि नाही झाला. तू माझी होतीस माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी. एकतर्फी प्रेम नाही म्हणता येणार तरीही अव्यक्त प्रेम म्हणता येईल. आता तर आपण इतके छान बोलतो. महिन्यातून कधी कधी तर आठवड्यातून हि बोलणे होते आपले. अगदी आपल्यात काही नसले तरी तुला गमवायची भीती वाटायला लागली आहे मला . तुझ्याबरोबर असताना ना का कुणास ठाऊक अगदी तरुण झाल्यासारखे वाटते. सगळे त्रास टेन्शन विसरायला होतात. तुझी बडबड ऐकत राहावीशी वाटते आणि तुझे हसू पाहत राहावेसे वाटते. एक विनंती आहे तुला समज उद्या देव ना करो आपल्यात काही गैरसमज झाले तर काही न बोलता बोलणे बंद नको करू. जमले तर बोलून किंवा भेटून गैरसमज दूर करू. पण न बोलता मला न कळवता परस्पर निर्णय नको घेऊस इतकीच विनंती. कारण माझ्या आयुष्यातली माझी पहिली आवड आणि माझी एक चांगली मैत्रीण मला गमवायची नाही. मैत्रीची हि अस्पष्ट रेषा ना ओलांडता सगळे सांभाळून अगदी मरेपर्यंत मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. कारण तुझे असणेच माझ्या साठी खूप जास्त महत्वाचे आहे.
तुझाच एक मित्र,
ता. क. : व्याकरणाच्या चुका काढू नकोस आणि अक्षर पाहून किंवा लिहिलेलं वाचून हसू नकोस प्लिज
मला चांगले आठवतेय शाळा सुटताना एका मुलाने तुला धक्का मारला होता. कसले झापले होतेस तू त्याला. तुझ्या बरोबर तुझ्या दोन चार मैत्रिणी हि आल्या मग त्याला ओरडायला . तेव्हा मात्र थोडी भीती वाटली होती कसली डेंजर मुलगी आहे असे वाटले होते क्षणभर. मी हि तुझ्या मागे पुढेच असायचो शाळा भरताना आणि सुटताना त्या मुळे थोडे टेन्शन आले होते. शाळेतही कुठल्या शिक्षकांनी काही आणायला सांगितले कि जाता येता माझी नजर तुझ्या वर्गावर जायची. कधीतरी तू दिसायचीस कधीतरी नाही. मग थोडेसे नाराज व्हायला व्हायचे. तू शाळेला दांडी मारलीस कि माझा जीव मात्र कासावीस व्हायचा. मग दहा वेळा काही ना काही कारणाने आवारात दहा फेऱ्या व्हायच्या.
आता अगदी आपण दोघेही संसारात व्यवस्थित रमलोय तरीही तुझ्याविषयीची ओढ किंवा आवड कमी झाली नाही. तुझ्या बरोबर लग्न करावे किंवा साधा रोमान्स करावा असे स्वप्नातही वाटले नाही. तुझे आसपास असणेही आवडायचे मला. मला अजूनही तू आपल्या सेंड ऑफ च्या दिवशी नेसलेली ती जांभळ्या रंगाची हिरव्या काठाची साडी आठवतेय. किती गोड दिसत होतीस तू त्यात. असे वाटत होते कि दिवस संपूच नये. कारण त्या नंतर शाळा हि बंद म्हणजे तुझे दिसणेही बंद मन कासावीस झाले होते. नंतर परीक्षेच्या काळात आपलीच शाळा सेन्टर असल्यामुळे दिसलीस तू पण त्या दहावीच्या परीक्षेच्या टेन्शन मध्ये बाकी काही सुचत नव्हते.
त्यानंतर कॉलेज , जॉब लग्न सगळे होईपर्यंत आपले काही कधी भेटणे झालेच नाही. कधीतरी रस्त्यात एकमेकांसमोर आल्यावर एक स्माईल इतकेच . पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात तुझी छबी नेहमीच राहिली. तुला पूर्णपणे विसरलो असे कधी झालेच नाही. नंतर एक दिवस फोन आला " अरे !! आपल्या दहावीच्या बॅचचे गेटटुगेदर आहे. आणि मन परत भूतकाळात गेले. त्या निमित्ताने तू परत भेटशील म्हणून त्या मित्राचे हजार वेळा आभार मानले असतील मी. ज्या वेळी तुला पहिले ना त्या लाल रंगाच्या ड्रेस मध्ये किती छान दिसत होतीस. आणि तुझे ते हसू जसेच्या तसे सगळे विसरायला लावणारे. त्या दिवशीही माझ्या मित्रांनी मला काही सोडले नाही तुझ्या वरून चिडवणे सुरूच होते. त्या ऑकवर्ड स्थिती मुले तुझ्याशी धड बोलताही आले नाही मला. असा राग आला होता त्या मित्रांचा पण तरीही त्यादिवशी आपण सगळ्यांचेच फोन नंबर घेतले होते त्यामुळे एक आनंद होता मनात. पण तरीही तुला फोन करायचे हिम्मत काही झाली नाही. पण ज्या दिवशी तुझा फोन आला बापरे!!!! ऑफिस च्या खुर्चीत जवळ जवळ उडालोच होतो मी. किती बालिशपणा तरीही मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पहिल्यांदा तुझा आवाज ऐकला मस्त वाटले. अगदी नॉर्मल गप्पा मारून ५-१० मिनिटात फोन ठेवलास तू. मी मात्र आठवडाभर त्याच विश्वात होतो. कदाचित बायकोलाही ती गोष्ट जाणवली असेल. त्यानंतर मात्र बऱ्याच वेळा आपल्या छोट्या छोट्या भेटी होत होत्या. मला अजूनही आठवतेय तू पहिल्यांदा जेव्हा माझ्या गाडीत बसली होतीस पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होतास. तुला घरी ड्रॉप करेपर्यंत माझ्या काळजाची धडधड काही थांबत नव्हती. तू मात्र बडबड करण्यात दंग होतीस. तू, तुझी बडबड आणि तुझे हसू समोरच्याची पार विकेट घेते.
पण तरीही एक गोष्ट सांगू का तू इतक्या मुलांशी बोलतेस अगदी मोकळेपणाने. शाळेतही तुला एका मुलाच्या नावाने चिडवायचे पण कधीही मला राग नाही आला. किंवा जळफळाट हि नाही झाला. तू माझी होतीस माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी. एकतर्फी प्रेम नाही म्हणता येणार तरीही अव्यक्त प्रेम म्हणता येईल. आता तर आपण इतके छान बोलतो. महिन्यातून कधी कधी तर आठवड्यातून हि बोलणे होते आपले. अगदी आपल्यात काही नसले तरी तुला गमवायची भीती वाटायला लागली आहे मला . तुझ्याबरोबर असताना ना का कुणास ठाऊक अगदी तरुण झाल्यासारखे वाटते. सगळे त्रास टेन्शन विसरायला होतात. तुझी बडबड ऐकत राहावीशी वाटते आणि तुझे हसू पाहत राहावेसे वाटते. एक विनंती आहे तुला समज उद्या देव ना करो आपल्यात काही गैरसमज झाले तर काही न बोलता बोलणे बंद नको करू. जमले तर बोलून किंवा भेटून गैरसमज दूर करू. पण न बोलता मला न कळवता परस्पर निर्णय नको घेऊस इतकीच विनंती. कारण माझ्या आयुष्यातली माझी पहिली आवड आणि माझी एक चांगली मैत्रीण मला गमवायची नाही. मैत्रीची हि अस्पष्ट रेषा ना ओलांडता सगळे सांभाळून अगदी मरेपर्यंत मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. कारण तुझे असणेच माझ्या साठी खूप जास्त महत्वाचे आहे.
तुझाच एक मित्र,
ता. क. : व्याकरणाच्या चुका काढू नकोस आणि अक्षर पाहून किंवा लिहिलेलं वाचून हसू नकोस प्लिज
Mast, hyatala ha aani hi kon?
ReplyDeletePratek jan jyachya manachya kopryat ase kunitari ahe
ReplyDeleteWaa mast Romanticc..... "Ti sadhya kay karte" aala dolya samor....
ReplyDeletechaan lihile ahes... Story dolyasamorun geli... majhich vatli kuthe tari
Thank you Bhushan
DeleteMastach .
ReplyDeletethank you
Deleteअप्रतिम 👌👍👏👏👏
ReplyDeleteMastach
ReplyDeleteThank you
DeleteChhan
ReplyDeleteMast ahe story
THank you
DeleteMilan farach sundar lekh lihila aahes..school cha junya aatwanin madhe gheun jatat!!
ReplyDeleteThanks Samir
DeleteMastch
ReplyDeleteThanks
DeleteMast, hyatala ha aani hi kon? hey nakki sanga tai mandar barober bolle kon ahe te hi and ha........
ReplyDelete