Tuesday, 19 September 2017

निरागस मैत्रीचे रूप...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स १५. ०९. २०१७ )

आम्ही आमच्या शाळेचे 

आम्ही चेंबूर च्या " आमची शाळा " चे १९९२ बॅच चे विद्यार्थी. आमच्या पैकी बरेच जण अजूनही चेंबूर मध्ये असल्यामुळे भेटीगाठी होत होत्या. एप्रिल २०१३ ला आमचा वॉट्सअँप चा शाळेचा ग्रुप बनवला.  आणि त्यानंतर  आम्ही  २९ जुन २०१३  ला चेंबूर ला आमच्या शाळेजवळच पहिल्यांदा भेटलो.  १९८८ मध्ये इयत्ता पाचवी  झाल्यावर मी चेंबूर ची आमची शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेले, नंतर तब्बल  २५ वर्षांनी मला माझे बालमित्रमैत्रिणी  भेटले. काय क्षण होते ते. इतक्यावर्षानंतर प्रथमच.. आम्ही साधारण ११ जण होतो त्यावेळी. बरेच जण बदलले होते तर काहींच्या चेहऱ्यात अजिबात बदल नव्हता अर्थात वय वाढल्याच्या खुणा थोड्या फार खुणा प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसत होत्या. त्यातले काही जण हि शाळा किंवा कॉलेज सोडल्यावर प्रथमच एकमेकांना भेटले होते.  पुन्हा भेटण्याच्या निमित्तानं सगळेच परत एकदा बालपणात रमून गेले होते. सगळ्या जुन्या आठवणी निघत होत्या , काहीत मी होते तर काहीं मध्ये मी नव्हते. मनातून थोडे वाईट वाटत होते कि मी बरेच काही मिस केले याचे. पण त्या पुनर्भेटीचा आनंद काही औरच होता.  त्यानंतर आम्ही दर ३ महिन्यातून एकदा भेटतोच. ' फ्रेंडशिप डे ' च्या निम्मिताने एक पावसाळी पिकनिक असतेच.  खूप मज्जा करतो आम्ही अगदी वय विसरून लहान मुलांसारखी मज्जा करतो.  अशा वेळी अगदी खूप व्यस्त असलेले आमचे बरेच मित्र मैत्रिणी आवर्जून वेळ काढून येतातच. दर वेळी अजून कुणीतरी नवीन मित्रमैत्रिण आमच्या सोबत असते. खूप छान वाटते जेव्हा मित्र मैत्रिणीची संख्या कमी न होता ती वाढत जाते.  आणि प्रत्येक वेळी आठवणींच्या आल्बम मध्ये नवनवीन आठवणींची भर पडत जाते. खरंच शाळेत झालेली ती निरागस मैत्री कायम तशीच राहते कारण तेव्हा जातपात , गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो. आमची हि मैत्री अशीच कायम निरागस आणि घट्ट राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . 




1 comment: