म्हातारपण शीर्षक वाचून जरा टेन्शन आले असेल ना पण काय करणार आपल्या आयुष्यातला न टाळता येणार टप्पा. बऱ्याच वेळा नको रे बाबा लवकरच काही ते होऊ दे , इतके वय नको असा संवाद ऐकायला मिळतोच मिळतो. पण तरीही आता जर आपल्या आजूबाजूला पहिले तर हा काळ पण आपल्याला सुखकर करता येतो याची खूप उदाहरणे आजू बाजूला दिसतील. असे म्हणू शकतो कि आपल्यापेक्षा आपल्या आई बाबांची पिढी जास्त उत्साही आहे. तुम्ही कधी सकाळी चालायला जा तरुण आणि मध्यमवयीन लोकांबरोबर म्हातारी माणसे हि त्याच प्रमाणात असतात. अंतराअंतरावर त्यांची टोळकी असतात. छान गप्पा रंगलेल्या असतात. ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून मस्त जॉगिंग हि सुरु असते. कुठे प्राणायाम योगा हि सुरु असतो. लाफ्टर क्लब मध्ये तर सगळे सिनिअर सिटीझन असतात.
या सगळ्याच काका काकूंच्या कट्ट्यावर अगदी ऑलराऊंडर चर्चा होतात. किती विषय असतील त्यांच्याकडे , इतका अनुभव, आयुष्याचे सगळे उतार चढाव पाहिलेले. सगळ्या मोहपाशातून मुक्त होऊन फक्त आयुष्य जगायचे. त्याने लहानपण, तरुणपण, मुलांचे आयुष्य आणि आता नातवंडं कितीतरी बोलण्यासारखे. खरेच पण या पिढीचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. म्हणजे घरात नातवंडांना सांभाळ्यापासून, लग्न कार्याला हजेरी लावणे, घरातली छोटी मोठी कामे करणे . सगळ्या जबाबदाऱ्या ते कंटाळा न करता पार पडतात.
हल्ली चे आजी आजोबा नवीन टेकनॉलॉजि हि तितक्याच तत्परतेने शिकतात. त्यांचे हि व्हाट्सअँप वर ग्रुप हि आहेत. हल्ली जितके आता शाळा सोडून गेलेल्या मुलामुलींचे जितके स्नेहसंमेलन होत नाही तितके सत्तरीला पोहचलेल्या आजी आजोबांचे होते.
आजही मी व्हाट्सअँप वर एका अशा ग्रुप चा हिस्सा आहे तिथे सगळे ७०च्या वरचे तरुण तरुणी आहेत. त्या ग्रुप मध्ये हि प्रत्येकाच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला आवर्जून शुभेच्छा दिल्या जातात. कुणी कुठे फिरायला गेले, कुणाच्या घरी काही कार्यक्रम असला तर त्याची फोटो पाठवले जातात. आपल्यात असतो तितकाच उत्साह त्यांच्यातही असतो. हल्ली सगळ्या टूर कंपन्यांचे हि सिनिअर सिटीझन स्पेशल अशा बऱ्याच टूर असतात. माझ्या बाबांचा तळ्यावर बसणाऱ्या सिनिअर सिटीझन चा ग्रुप आहेत. सगळे ना चुकता ४. ३० - ५ पर्यंत तिथे जमतात. प्रत्येक महाशिवरात्रीला त्यांची पापडखिंड येथे असणाऱ्या शंकराच्या मंदिरामध्ये एक छोटीशी पिकनिक असते.त्यांचे नुसतेच भेटणे नसते तर एकमेकांना गरजेला मदत करणे हे हि त्यांचे कर्तव्य समजतात. एकमेकांच्या अडीअडचणींना मदत करतात. एकमेकांच्या सुख दुःखात सोबत करतात.
मी या सिनिअर लोकांबरोबर एकदिवसाची ट्रिप केली होती. सुरवातीला वाटले कि काय करणार मी इतक्या म्हाताऱ्या लोकांमध्ये? पण तिथे गेल्यावर कळले कि हे सगळे तर आमच्यापेक्षा जास्त तरुण आहेत. त्यांना एका जागी बसायचा कंटाळा आला होता म्हणून आम्ही भर उन्हात जेट्टीवर फिरून आलो. तिथे सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढले आणि माझ्याकडून काढून घेतले. त्यांच्या गप्पा जेव्हा रंगल्या ना तेव्हा तर गम्मतच वाटली अगदी त्यांच्या शाळेच्या आठवणी त्यांना जशाच्या तशा आठवत होत्या. सगळे एकमेकांची मस्करी करत होते. शाळेत कुणाला कुठल्या टोपण नावाने हाक मारायचे याची हि उजळणी झाली.
माझे सासरे वयाच्या ७९ व्या वर्षापर्यंत दुकानात जात होते. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत ते दुकानात उभे राहत असत. त्यांचे एक काका १०० वर्षाचे, आत्या ९५, ९२ वर्षाचे, त्यांची मावशी ९० आणि मामी हि जवळपास त्याच वयाचे आहेत. सगळे अजूनही चालते फिरते आहेत. आम्ही गावी जेव्हा आमच्या कुलदेवतेच्या उत्सवाला जातो तेव्हा तिथे तयारीसाठी म्हणून जे जातात ते सगळे ७०च्या पुढचे काका असतात. त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो. मधुकाकांसारखे सकाळी उठल्यापासून रात्री पर्यंत न थकता सगळी कामे त्याच एनर्जी ने करणे विशीतल्या तरुणांना हि शक्य होणार नाही. ते नुसतीच कामे करत नाहीत तर पालखी नाचवणे , आरत्या म्हणणे, आणि अगदी मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घेणे सगळे अगदी आवडीने करतात.
कधी कधी आपण ऐकतो कि घरातल्या वृद्धांचा त्रास होतो. असे म्हणतात ना कि लहानपण आणि म्हातारपण अगदी सारखे असते. त्यामुळे ती माणसे हि लहानमुलांसारखे वागतात. इतकी वर्षे त्यांना घरावर त्यांचे राज्य असते त्यामुळे आताही घरातल्या सगळ्या लहान सहन गोष्टी त्यांना कळाव्यात असा त्यांचा अट्टाहास असतो. घरातील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते हि लहान मुलांसारखे काही ना काही करत असतात. पथ्याचे खायचे टाळून बाकी गोष्टींचा गुपचूप आस्वाद घेणे हे हि सगळे करतात. त्यामुळे घरातले त्यांच्यावर रागावतात , पण तसे दोघेही त्यांच्या जागी योग्य असतात कारण मुले रागावतात ती त्यांच्या तब्बेतीची काळजी म्हणून तर चटपटीत खायची इच्छा सगळ्यांचा होते त्यात ते तरी अपवाद कसे असणार.
हेच म्हातारपण शाप वाटते जेव्हा वृद्धाश्रमात ठेवलेल्या आजी आजोबांना बघतो. कुणाची मुले बाहेरगावी आहेत , तर कुणाच्या घरच्यांशी पटत नाही तर कुणाला त्यांच्या आजारपणाचा कंटाळा आलेला म्हणून तिथे आणून टाकलेले. खरंतर त्यांच्या घरच्यांचा नाकर्तेपणाची शिक्षा ते भोगत असतात. पण त्या वृद्धाश्रमात पण आपल्या एकाकी आयुष्याला सुखकर बनविण्यासाठी ते लोक तिथे काही ना काही कार्यक्रम करत असतात. एकमेकांची काळजी घेत असतात. एक मात्र नक्की आपल्या तरुणपणात मेहनत करून आपल्या म्हातारपणाची पैसे साठवून ठेवणे खूप गरजेचं आहे.
आयुष्याच्या अशा टप्प्यावर असतात कि आलेली त्यांना कसलीही बंधने नको असतात. आतापर्यंत कष्टात काढलेले त्यांचे आयुष्य त्यांना त्यांच्या मनासारखं जगायचे असते. त्यामुळे कधीतरी आपण मुलांनीही त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू द्यावे. एकमेकांची काळजी घेणे, आपली तब्बेत सांभाळणे , आणि आपले मन रामावणे इतकेच काय त्या त्यांच्या अपेक्षा असतील. बऱ्याच वेळा घरात वाद होतो कि आजी आजोबांचे लाड नातवंडांना बिघडवतात. पण आपण हा विचार करतो का कि आपणही बऱ्याच वेळा आपल्या आई बाबांच्या लाडापेक्षा आजी आजोबांच्या लाडाचे गोडवे गातो. म्हणतात ना दुधापेक्षा साईवर माया जास्त तेच पिढ्यानपिढ्या सुरु राहणार. आपणही त्यांच्या वयाचे झालो कि तेच करणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणे म्हणजे एक वेगळी गम्मत असते कितीतरी छान छान
गोष्टीनी त्यांची पोतडी भरलेली असते. खरे तर आपल्या मुलांना जुनी गाणी
कविता गोष्टी या त्यांच्या मुळेच कळतात. हल्लीच्या मोबाईल युगात ते जिवंत
यू ट्यूब चॅनल आहेत असे म्हणायला हरकत नाहीत.
मला यांची सगळ्यात जास्त भावणारी गोष्ट म्हणजे यांचा आत्मविश्वास. अगदी आम्ही हि एकमेकांचा निरोप घेताना पुन्हा भेटू म्हणताना , बघू काही झाले नाही तर नक्की भेटू असे म्हणतो मस्करीत. पण ते मात्र अगदी वर्षभरानंतर भेटायचे असेल तरी म्हणतात कि हा कुठे जायचे नसेल तर गेट टू गेदर ला नक्की येऊ. किती पॉसिटीव्ह असतात हि लोक आपल्या आयुष्याबद्दल .
पण खरेच लहानपण देगा देवा असे हल्ली म्हणायचे म्हणजे आपले बालपण मोबाईल मध्ये हरवून घेणे असे समीकरण झालेय हल्ली. ९०% मुले मोबाईल च्या आहारी गेली आहेत. त्यापेक्षा आता म्हातारपण दे गा देवा असे म्हणायची वेळ आली आहे.
आपण किती जगू त्यापेक्षा आपण कसे जगू याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे हल्लीच्या काळात. आणि त्यामुळेच आपले जगणे जास्त सुखकर होईल .
वयाच्या शेवटच्या टप्प्यावर हि यांची आशा किती मजबूत असतात. नाहीतर आम्ही वयाच्या चाळिशीतच पुढे किती जगू कसे जगू याचा विचार करतो. बोलता बोलता आता आमचे किती दिवस राहिले म्हणणारी हि माणसे जेव्हा निरोप घेताना उद्या भेटू म्हणतात ना तेव्हा एक म्हण आठवते….
उम्मीद पे दुनिया कायम है
खूप भावला हा लेख ... वयाच्या या न टाळता येणाऱ्या टप्प्याचे खरे तर स्वागतच करायला हवे ...कारण म्हातारपणातच स्वता:ला स्वता:ची सगळ्यात जास्त गरज असते ..तू लिहिलेल्या दृष्टीकोनातून पहिले तर खरच आयुष्याचा अंत सुखकर होईल ...मस्त मिलन
ReplyDeleteMilan tai, tuzhe blogs vachayla khup chan vaatata, positivity vatate, kharach ahe ki OLD people are more energetic and with more knowledge and experience. Our kids are very lucky to see our grandparents. But in this fast moving life do know if next generation will be lucky enough to see us.
ReplyDeleteVery true. And due to their lifestyle they do not face problems like young generation.
ReplyDeleteBut , truly, as you said, their spirit and attitude is admirable.
Well written and expressed.
खुप सुंदर लिहिले आहे
ReplyDeleteActually sudhir mane ya mazhya mitra mule me tumcha blog vachte. Khup simple pn tarihi chan lihita tumhi. Ek navi urja milte. He lekh ek prakarch sicritist chach kam kartat. So keep it up.
ReplyDeleteThank you very much🙏🏻
DeleteKhupch chan sundar lihile aahes
ReplyDeleteManala sparsh karnyjoge.
wa parat ek vegla vishay mandlas to hi sopya padhatine. Ekdam chan ani sutsutit.
ReplyDeleteMast, second innings....
ReplyDeleteवयाच्या शेवटच्या टप्प्यावर हि यांची आशा किती मजबूत असतात. ekdam perfect bollis tu milan really khup active astat.. nahitar apan hey titkech barober ahe mast chan lihile ahes milan.........
ReplyDeleteNice blog while reading very much heart touching feelings come out.The stage of old age how you described its 360 degree...vision towards...life....
ReplyDeleteNice...keep ....writing...with different subjects with different....way...towards...life..
Thank you Sudhir🙏🏻
Deleteलहानपण देगा देवा म्हणतो .... अगदी तसंच म्हातारपण असेल तर तेही उत्साहाने सळसळतं आणि समाधानी असावं हेच खरं.
ReplyDeleteमिलन तु वेगळा विषय चांगल्या अंगाने मांडलास.अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा
खुपच छान..शब्दच नाहीत।
ReplyDeletedhanyawad
Delete