छान पाऊस पडतोय , गरमागरम भजी आणि कडक आले घातलेला चहा होऊन जाऊ दे ... असा संवाद आता पावसाळ्यात आपल्याला सर्रास ऐकायला मिळतो. तर "चहा, नको रे बाबा!! मला ऍसिडिटी होते " हे वाक्य तर दहातली नऊ जण म्हणताना आपण ऐकतो. तरीही चहा हे नक्कीच एक अमृतपेय आहे. काही म्हणा पण या मुसळधार पावसात गरमागरम वाफाळता चहाचा कप घेऊन गॅलरीत किंवा खिडकीत बसून त्याचा आस्वाद घेण्याचे सुख काही औरच.
मला कॉफी हे श्रीमंतांचे पेय वाटते, तर चहा गरिबांपासून श्रीमंतांचे सगळ्यांचे लाडके पेय आहे. एखाद्या मोठ्या कॉफी शॉप मध्ये जाऊन २५०-३०० रुपयाची ती कडू कॉफी पिण्यापेक्षा , टपरीवरचा १० रुपयाचा चहा जास्त चांगला वाटतो. अर्थात प्रेस्टिज म्हणून कधीतरी ते हि करायला हरकत नाही.
भरपावसात गाडीतून लांब फिरायला जावे आणि वाटेत असणार्या चहाच्या टपरीवर गरम गरम चहा आणि कांदा भजी खावी काय ते स्वर्गीय सुख. तुम्ही कधी अनुभवलं आहे का ? आपल्या कुठल्याही पिकनिकचे किंवा कुठल्याही प्रवासाची सुरुवात आणि शेवट हा टपरीवरच्या चहानेच होतो.
प्रत्येक नाक्यावर अशी एक तरी टपरी असते जिथे चार मित्रांची टोळकी जमतात, तिथे मित्रांचे कट्टे लागतात. गप्पा होतात, मोठे मोठे डिस्कशन होतात. कटिंग आणि वडापाव किंवा कटिंग आणि भजी ची पार्टी होते, लाखोंच्या उलाढालीत होतात , नाटक सिनेमाची बोलणी, आखणी होतात, कितीतरी कलाकार अशाच टपऱ्यांवर लहानाचे मोठे झाले असतील. कोणाच्या घरची टेंशन तेथे शेअर केली जात असतील तर कोणाचे आनंदाचे क्षण साजरे केले जातात.
आपल्यातल्या बहुतेक जणांची दिवसाची सुरुवात ही सकाळच्या चहाने होते. एक ठराविक प्रकारच्या स्वादाचा चहा मिळाला की दिवस कसा भन्नाट जातो. "अरे सकाळी चहा घेतल्याशिवाय मला प्रेशर येत नाही " येत नाही असं वाक्य म्हणणारा प्रत्येक घरात एक तरी माणूस असतोच. घरात कधी कधी प्रत्येकाला वेगळा चहा लागतो म्हणजे कुणाला बिनसारखरेचा, कुणाला दुधाचा, कुणाला खूप उकळवलेला तर कुणाला बिना दुधाचा. एक चहा पण घरातल्या घरातही त्याचे किती प्रकार. म्हणे हवा तसा चहा मिळाला नाही तर किक बसत नाही. बरे जसे चहा चे प्रकार वेगळे तसा प्रत्येकाचा चहाचा कप हि वेगळा असतो ठराविक कपात चहा प्यायल्या शिवाय तो प्यायची मजा येत नाही.
खरेतर चहाचे म्हणजे चहा पावडर चे हि खूप प्रकार असतात पण आपल्या सामान्य माणसांसाठी चहा म्हंटला कि तो टाटा, लिप्टन , सोसायटी किंवा ताज हेच डोळ्यासमोर येतात. आमच्या लहानपणी ताजमहल चहाची जाहिरात लागायची या जाहिरातीत दस्तुरखुद्द पं. झाकीर हुसेन असायचे, त्यामुळे मला नेहमी वाटायचं हा चहा फक्त श्रीमंतांसाठी असावा. एवढा मोठा माणूस जाहिरात करतोय म्हणजे. कारण बाकीच्या चहाच्या जाहिरातीत कोणीतरी अगदी आपले सामान्य चेहरे असायचे. आमच्याघरी आई पूर्वी ममरी चहा घेऊन यायची , तेव्हा हे ब्रँड वगैरे चे प्रस्थ जास्त नव्हते. नंतर मात्र तिची गाडी सोसायटी चहावर जी वळली की अजून पर्यंत त्याच्यावरच होती.
चहा म्हणजे दोन मनांना एकत्र आणणारा दुवा होतो कधी कधी. चहा पिता पिता आपण खूप साऱ्या गप्पा मारतो समोरच्यासोबत . एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी भेटली कि " चल , कुठेतरी बसून मस्त चहा पिऊ आणि गप्पा मारू. " हे वाक्य अगदी ठरलेले असते. चहा फक्त बहाणा असतो , तो वेळ असतो जो आपल्याला समोरच्यासोबत घालवायचा असतो. लग्नाच्या आधीहि चहा आणि कांदे पोह्यांचा कार्यक्रमच होतो. पहिली भेट हि चहा पासूनच सुरु होते (आता कॉफी ने). चहासोबत आपण बऱ्याच विचारांची हि देवाणघेवाण करतो. एक चहा दोघात मिळून प्यायची मजा हि न्यारीच. एकाने चहा कपात तर एकाने बशीत चहा प्यायचा.
आपल्याकडे कुठल्याही वेळी पाहुणे आले तरी आपण आधी हेच विचारतो चहा घेणार ना. हल्ली सीजन प्रमाणे विचारणे बदलले आहे हि गोष्ट वेगळी. पण सुरवात मात्र चहानेच होते. " अहो जास्त नाही , अर्धा कप तरी घ्या " म्हणून आग्रह केला जातो. दुपारचे जेवण कितीही उशिरा झाले असले तरी ४-४.३० ला घरातल्या पुरुष मंडळींचे फर्मान येतेच "चला चहा टाका आता चहाची वेळ झाली." ऑफिस मध्ये काम करून कंटाळा आला कि मित्रांसोबत टी टाइम म्हणून टपरी वर जाऊन एक कटिंग आणि सोबत एक सिगारेट ... . डोळ्यावर झोप आली कि पटकन एक अर्धा कप चहा मारायचा सगळी झोप गायब. काही म्हणा चहा म्हणजे पण एक नशा आहे , वेळेत नाही मिळला कि जीव कासावीस होतो. आणि एकदा सवय लागली कि ती सुटणे फार कठीण. ह्या चहाचे ज्याला व्यसन लागते ना त्यांना तुम्ही कधीही विचारा चहा घेणार का ? हो अर्धा कप चालेल असे त्यांचे उत्तर ठरलेले असते.
एरवी हायजिन म्हणून ठराविक ठिकाणीच खाणारी लोक हि चहा मात्र कुठेही पितात. मग ती सायकल वर किटली घेऊन येणाऱ्या पोऱ्या कडची असो , कि एखाद्या कळकट्ट टपरी वरची , कि चाय गरम, चाय म्हणत ट्रेन मध्ये ओरडत येणाऱ्या त्या माणसांकडची असो. चहाला कसलेच बंधन नसते. जसे चहा कुठे प्यायचा यावर बंधन नाही तसे चहा बरोबर काय खायचे याला हि मर्यादा नाही. म्हणजे चहा सोबत काही खपून जाते म्हणजे चहा सोबत वडापाव खा, किंवा खारी खा , किंवा फरसाण खा. सगळे चांगलेच लागते. शिळी चपाती तुपावर गरम करून ती चहा सोबत खाणे हा बऱ्याच जणांचा नाश्ता असेल बालपणी. चहा सोबत भरपूर बटर लावलेला पाव असेल तर त्याची मजा काही औरच ... सुटले ना तोंडाला पाणी.
आम्ही मैत्रिणी जेव्हा जमतो तेव्हा रात्रभर जागरण असते, पण मी लवकर झोपते , त्याची शिक्षा म्हणून मला मध्यरात्री कधीतरी उठवून चहा बनवायला सांगतात. मी आपली अर्धवट झोपेत चहा बनवते पण ह्या आपल्या चहाला नाव ठेवायला तयार. साखरच जास्त झालीय, दूधच जास्त आहे, आले कमी झालेय नीट उकळला नाहीये. थोडक्यात काय तर मला चहा नीट बनवायला जमत नाही. आता हे वाक्य इथे टाकण्याचे कारण तुम्ही सुज्ञ वाचकांनी जाणलेच असेल. (बरोबर हे वाचून कधी येऊ चहासाठी असे विचारायला नको म्हणून 😃😃😃😃
चहा जसा सगळ्या वर्गातल्या लोकांचा तसाच तो सगळ्या ऋतूंचा हि आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात चहा हि गरज असते. पण उन्हाळ्यात उकडतेय म्हणून चहा न पिणारे लोक विरळाच. दिवसातून एखादा चहा झाला नाही तर दिवस सार्थकी लागत नाही आपला. मला चहा ना आवडणाऱ्या लोकांचे नवल वाटते. एका अमृतपेयाला मुकतात असे वाटते.
प्रत्येक नाक्यावर अशी एक तरी टपरी असते जिथे चार मित्रांची टोळकी जमतात, तिथे मित्रांचे कट्टे लागतात. गप्पा होतात, मोठे मोठे डिस्कशन होतात. कटिंग आणि वडापाव किंवा कटिंग आणि भजी ची पार्टी होते, लाखोंच्या उलाढालीत होतात , नाटक सिनेमाची बोलणी, आखणी होतात, कितीतरी कलाकार अशाच टपऱ्यांवर लहानाचे मोठे झाले असतील. कोणाच्या घरची टेंशन तेथे शेअर केली जात असतील तर कोणाचे आनंदाचे क्षण साजरे केले जातात.
आपल्यातल्या बहुतेक जणांची दिवसाची सुरुवात ही सकाळच्या चहाने होते. एक ठराविक प्रकारच्या स्वादाचा चहा मिळाला की दिवस कसा भन्नाट जातो. "अरे सकाळी चहा घेतल्याशिवाय मला प्रेशर येत नाही " येत नाही असं वाक्य म्हणणारा प्रत्येक घरात एक तरी माणूस असतोच. घरात कधी कधी प्रत्येकाला वेगळा चहा लागतो म्हणजे कुणाला बिनसारखरेचा, कुणाला दुधाचा, कुणाला खूप उकळवलेला तर कुणाला बिना दुधाचा. एक चहा पण घरातल्या घरातही त्याचे किती प्रकार. म्हणे हवा तसा चहा मिळाला नाही तर किक बसत नाही. बरे जसे चहा चे प्रकार वेगळे तसा प्रत्येकाचा चहाचा कप हि वेगळा असतो ठराविक कपात चहा प्यायल्या शिवाय तो प्यायची मजा येत नाही.
खरेतर चहाचे म्हणजे चहा पावडर चे हि खूप प्रकार असतात पण आपल्या सामान्य माणसांसाठी चहा म्हंटला कि तो टाटा, लिप्टन , सोसायटी किंवा ताज हेच डोळ्यासमोर येतात. आमच्या लहानपणी ताजमहल चहाची जाहिरात लागायची या जाहिरातीत दस्तुरखुद्द पं. झाकीर हुसेन असायचे, त्यामुळे मला नेहमी वाटायचं हा चहा फक्त श्रीमंतांसाठी असावा. एवढा मोठा माणूस जाहिरात करतोय म्हणजे. कारण बाकीच्या चहाच्या जाहिरातीत कोणीतरी अगदी आपले सामान्य चेहरे असायचे. आमच्याघरी आई पूर्वी ममरी चहा घेऊन यायची , तेव्हा हे ब्रँड वगैरे चे प्रस्थ जास्त नव्हते. नंतर मात्र तिची गाडी सोसायटी चहावर जी वळली की अजून पर्यंत त्याच्यावरच होती.
चहा म्हणजे दोन मनांना एकत्र आणणारा दुवा होतो कधी कधी. चहा पिता पिता आपण खूप साऱ्या गप्पा मारतो समोरच्यासोबत . एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी भेटली कि " चल , कुठेतरी बसून मस्त चहा पिऊ आणि गप्पा मारू. " हे वाक्य अगदी ठरलेले असते. चहा फक्त बहाणा असतो , तो वेळ असतो जो आपल्याला समोरच्यासोबत घालवायचा असतो. लग्नाच्या आधीहि चहा आणि कांदे पोह्यांचा कार्यक्रमच होतो. पहिली भेट हि चहा पासूनच सुरु होते (आता कॉफी ने). चहासोबत आपण बऱ्याच विचारांची हि देवाणघेवाण करतो. एक चहा दोघात मिळून प्यायची मजा हि न्यारीच. एकाने चहा कपात तर एकाने बशीत चहा प्यायचा.
आपल्याकडे कुठल्याही वेळी पाहुणे आले तरी आपण आधी हेच विचारतो चहा घेणार ना. हल्ली सीजन प्रमाणे विचारणे बदलले आहे हि गोष्ट वेगळी. पण सुरवात मात्र चहानेच होते. " अहो जास्त नाही , अर्धा कप तरी घ्या " म्हणून आग्रह केला जातो. दुपारचे जेवण कितीही उशिरा झाले असले तरी ४-४.३० ला घरातल्या पुरुष मंडळींचे फर्मान येतेच "चला चहा टाका आता चहाची वेळ झाली." ऑफिस मध्ये काम करून कंटाळा आला कि मित्रांसोबत टी टाइम म्हणून टपरी वर जाऊन एक कटिंग आणि सोबत एक सिगारेट ... . डोळ्यावर झोप आली कि पटकन एक अर्धा कप चहा मारायचा सगळी झोप गायब. काही म्हणा चहा म्हणजे पण एक नशा आहे , वेळेत नाही मिळला कि जीव कासावीस होतो. आणि एकदा सवय लागली कि ती सुटणे फार कठीण. ह्या चहाचे ज्याला व्यसन लागते ना त्यांना तुम्ही कधीही विचारा चहा घेणार का ? हो अर्धा कप चालेल असे त्यांचे उत्तर ठरलेले असते.
एरवी हायजिन म्हणून ठराविक ठिकाणीच खाणारी लोक हि चहा मात्र कुठेही पितात. मग ती सायकल वर किटली घेऊन येणाऱ्या पोऱ्या कडची असो , कि एखाद्या कळकट्ट टपरी वरची , कि चाय गरम, चाय म्हणत ट्रेन मध्ये ओरडत येणाऱ्या त्या माणसांकडची असो. चहाला कसलेच बंधन नसते. जसे चहा कुठे प्यायचा यावर बंधन नाही तसे चहा बरोबर काय खायचे याला हि मर्यादा नाही. म्हणजे चहा सोबत काही खपून जाते म्हणजे चहा सोबत वडापाव खा, किंवा खारी खा , किंवा फरसाण खा. सगळे चांगलेच लागते. शिळी चपाती तुपावर गरम करून ती चहा सोबत खाणे हा बऱ्याच जणांचा नाश्ता असेल बालपणी. चहा सोबत भरपूर बटर लावलेला पाव असेल तर त्याची मजा काही औरच ... सुटले ना तोंडाला पाणी.
आम्ही मैत्रिणी जेव्हा जमतो तेव्हा रात्रभर जागरण असते, पण मी लवकर झोपते , त्याची शिक्षा म्हणून मला मध्यरात्री कधीतरी उठवून चहा बनवायला सांगतात. मी आपली अर्धवट झोपेत चहा बनवते पण ह्या आपल्या चहाला नाव ठेवायला तयार. साखरच जास्त झालीय, दूधच जास्त आहे, आले कमी झालेय नीट उकळला नाहीये. थोडक्यात काय तर मला चहा नीट बनवायला जमत नाही. आता हे वाक्य इथे टाकण्याचे कारण तुम्ही सुज्ञ वाचकांनी जाणलेच असेल. (बरोबर हे वाचून कधी येऊ चहासाठी असे विचारायला नको म्हणून 😃😃😃😃
चहा जसा सगळ्या वर्गातल्या लोकांचा तसाच तो सगळ्या ऋतूंचा हि आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात चहा हि गरज असते. पण उन्हाळ्यात उकडतेय म्हणून चहा न पिणारे लोक विरळाच. दिवसातून एखादा चहा झाला नाही तर दिवस सार्थकी लागत नाही आपला. मला चहा ना आवडणाऱ्या लोकांचे नवल वाटते. एका अमृतपेयाला मुकतात असे वाटते.
माझ्या बकेटलीस्ट मधली अजून एक इच्छा आहे कि एकदा तरी ताज हॉटेल ला जाऊन चहा प्यायचा. कारण तोच बहुधा परवडणारा असेल 😃😃. कधीतरी नक्कीच होईल पूर्ण हि इच्छा.
खरेतर
चहा वर खूप
तज्ञ लोकांचे लिहून
झालेय म्हणून विचार
करत होते लिहू
कि नको. पण
मला वाटते कि
हे जे लिहिले
आहे ते आपल्या
सामान्य माणसांच्या मनातला चहा
आहे. आणि जिच्यामुळे
हा ब्लॉग लिहायची
माझी इच्छा प्रबळ
झाली ती "हर्षा पेणकर"
, आमचे दोन चहा
प्रेमी " विकी" आणि "आकांक्षा"
हा ब्लॉग खास
तुमच्या साठी. 💖
" चहाला वेळ नसते .... पण वेळेला चहाच लागतो "
चला
तर मग सगळ्या
चहा प्रेमींनी एखादी
"टी " पार्टी करायाला हरकत
नाही. मौसम भी
है दस्तूर भी
है . . . . . . . . . .
. . काय म्हणताय मग येताय
ना चहा प्यायला.