Friday, 15 February 2019

आता पुरे झाले.... एक सामान्य नागरिक


परवाच री पिक्चर पाहून आले आतंकवाद्यांनी उरी मध्ये आपल्या जवानांवर केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून आपण केलेले सर्जिकल स्ट्राइक यावर तो पिक्चर आहे,  पिक्चर बघताना अंगावर शहारा आला
ज्यावेळी आतंकवादी आपल्या जवानांवर गोळीबार करत होते तेव्हा असे वाटत होते आपणास बंदूक घ्यावी आणि त्यांना गोळ्या झाडाव्यात.  सर्जिकल स्ट्राइक नंतर आपल्या सगळ्या जवानांना सुखरूप परत आलेले बघून आपोआप टाळ्या वाजवल्या आम्ही. 

पिक्चर बघताना वाटलं जशास तसे केले खूप छान झाले आणि मुळातच सर्जिकल स्ट्राइक मध्ये आपले सगळे जवान सुखरूप परत आले आतंकवाद्यांना कंठस्नान घालून.

पिक्चर बघून आल्यावर जाणवलं उरीचा हल्ला मोठा होता म्हणून त्याचा बदला पटकन घेतला गेला पण असेच सीमेवर रोज एक दोन एक दोन जवान आपले शहीद होत असतात, त्यांच्या सगळ्यांचा ना एकदाच काय तो बदला घ्यायला हवा. सिनेमा  बघून येऊन आज दोनच दिवस झाले आणि आता टीव्हीवर बातमी पाहिली  काश्मिरात एका सुसाईड बॉम्ब  कारने जवानांनीं भरलेल्या बस वर हल्ला केला.  जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जवान शहीद.  ती बातमी ऐकल्यापासून मनात एक वेगळीच खळबळ माजली आहे ज्यांच्यामुळे आपण अगदी निवांत आपल्या घरात झोपतो, आपला देश ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, थंडी वारा ऊन कशाचीही परवा न करता आपल्या देशासाठी सीमेवर तैनात असतात अशा आपल्या सैनिकांना अशा भ्याड हल्ल्यामध्ये शहीद व्हावे लागते कि दुदैव आहे आपले.   

कधीतरी वाटतं किस सगळ्यांनी एकत्र यावे आणि सरकारकडे मागणी करावी की आपल्या जवानांना द्या  मुक्तपणा , जसे ते आतंकवादी काहीही विचार न करता हल्ले करतात ना, जवानांना द्या की मोकळीक त्यांना घुसून मारण्याची.  आतंकवाद्याला दहशत वाद्याला  फाशी न देता त्याला द्या आपल्या जवानांच्या हवाली आणि असे हाल करून मारू देत त्यांना कि पुन्हा हल्ला करताना त्यांनी विचार करायला हवा हजार वेळा कि भारतीय सैनिकांशी  पंगा घेतल्यावर काय होतं. आपणही त्यांच्या सारखे असे हल्ले करायला पाहिजेत ना जसा आपल्याला दहशतवादाची भीती वाटते ना तशी त्यांना भारतीय जवानांची भीती वाटली पाहिजे,  कदाचित आताही वाटत असेल म्हणून ते युद्धासाठी समोर न येत असे भ्याड हल्ले करतात.

उरी साठी एक सर्जिकल स्ट्राइक केला ना तसे इतके करायला हवेत ना कि हि आतंकवाद्यांची जमातच मुळापासून नष्ट करायला हवी. 

टीव्हीवरच्या  एका मुलाखतीत एकएका  निवृत्त कर्नल यांचे एक वाक्य खूप आवडले "Our soldiers are not trained to die they are trained attack and kill."
 
किती दुर्दैव आहे आपलं कोणीच येतो तिसऱ्या देशातला माणूस येतो आपल्या लोकांना आपली असा जीवानिशी मारतो घरी सुट्टी आनंदात व्यतीत करून करायला जाणाऱ्या माणसांवर हल्ला आणि आपण काहीच करू शकत नाही. देशासाठी प्राण द्यायची तयारी असली तरी युद्धात वीरगती हसत हसत पत्करणाऱ्या आपली सैनिकांना असे मरण नक्कीच आवडणार नाही. 

एक गाणं आहे 'ए मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी'.  खरंतर आताही वेळ ना डोळ्यात पाणी आणण्याची नाही घरात घुसून मारण्याची त्यांनी ४० मारले ना तुम्ही ४००० मारा अशी मागणी आपण  प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे.  आपली सहनशीलता म्हणजे आपला भेकडपणा नाही हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे.  नुसतं  भावपूर्ण श्रद्धांजली इतकच लिहून थांबण्याची वेळ गेलीय आता. 
९/११ च्या हल्ल्यानंतर जसे ओसामा ला त्याच्या घरात घुसून मारले ना तसेच या सगळ्यांना मारले पाहिजे अगदी निवडून निवडून.

कधीं आपल्या सामान्य नागरिकांची हि चीड येते , असे काही झाले कि आपले सगळ्यांचेच राष्ट्रप्रेम उफाळून येते. पण काही जणांचे हे प्रेम इतके तकलादू वाटते ना , साधेच उदाहरण आहे   जेव्हा चित्रपटगृहात  राष्ट्रगीत लागते माणसे उभी तर   राहतात पण शंभरातले चार-पाच लोक असतात जे आपल्या राष्ट्रगीत म्हणतात मोठ्याने. त्या मल्टिप्लेक्स मध्ये  राष्ट्रगीत म्हणायची लाज वाटते ती काय या लोकांना? अशी लोक काय देशप्रेम दाखवणार? त्यांचं ते बघतील अशा प्रवृत्तीने वागतो कधीकधी आपण, पण हा विचार आपले सैनिक नाही करत. आपण इथे जात धर्म करून लढतो तिथे ते सगळ्या जाती धर्माचे फक्त देशासाठी लढतात एकत्र . असं म्हणतात ना की घरात प्रत्येक घरातला एक माणूस देशाच्या पाठवला पाहिजे खरंच आहे

खरं तर असं काही झालं आपण  व्यक्त होतो, लिहितो.  काही जण म्हणतात की आपण नुसतं श्रद्धांजली वाहून गप्प राहतो.  पण कदाचित  आपल्याला माहीत असतं की आपल्या हातात काहीच नाहीये तरी आपण एखाद्याला जाऊन गोळ्या नाही घालू शकत कदाचित तोच राग आपण व्यक्त करतो आपल्या या लिहिण्या बोलण्यातून.


कुणीतरी एक सुंदर वाक्य लिहिले आहे तो हि आज प्रेमाच्या रंगांत रंगला फरक फक्त इतकाच होता कि तो रंग देशप्रेमाचा होता. आणि काय तो विचित्र योगायोग लाल रंग प्रेमाचे प्रतीक पण हाच लाल रंग आमच्या शहीद जवानांच्या रक्ताचा हि होता ज्यांनी सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम निर्माण केले पण तितकीच चीड निर्माण केलीय शत्रू राष्ट्र विषयी.  

एक सामान्य नागरिक म्हणून मी इतकेच म्हणेन कि कदाचित  आम्ही बंदूक घेऊन सीमेवर लढायला नाही जाऊ शकणार पण तुम्ही दिलेले हे तुमच्या रक्ताचे बलिदान व्यर्थ नाही जाऊ देणार. 
 




7 comments:

  1. wa Milan. Saglyanchya manat jo Rag ahe to tu write up madhun baher aanlas. Its very true that now India should take strict action against enemies otherwise new generation will think 100 times before entering in military

    ReplyDelete
  2. Wow masta lihila ahes tu, pratekacha manat hya vishai raag ahe pun tula te lihun vyakta karach vardan ahe

    ReplyDelete
  3. ��Milan.Not only soldiers. We all or everybody should do something for the betterment of our country and make our country strong to fight against this kind of terrorism. Paying tax we should not complain about it. Guide our children to become a good Indian.and about nationalism So that this future generation will be strong enough for such situations.

    Rajesh Gawade

    ReplyDelete
  4. he sagle lihilele jevha krutit yeil tevhach khari shradhhanjali dili ase mhanta yeil ....

    ReplyDelete
  5. सर्वात प्रथम पत्थर बाज लोकांना गोळ्या घाला
    370 कलम रद्द करा

    ReplyDelete
  6. आज प्रेमाच्या रंगांत रंगला फरक फक्त इतकाच होता कि तो रंग देशप्रेमाचा होता.khup chan lihile ahe kharch ani premchya rangat rangya peksha deshachya premat ranga ase mhnen kharch sarkarne khup lavkarat lavkar action ghetli pahije

    ReplyDelete
  7. Very thoughtful article. Every Indian is angry.
    You have nicely explained emotions of common man.
    Thanks.

    ReplyDelete