न्यूनगंड म्हणजे नक्की काय? आपल्यात काहीतरी उणीव आहे याची मनाला असलेली एक सल असेच ना?
आपल्या प्रत्येकालाच कसला न कसला न्यूनगंड असतोच. गरिबाला आपण श्रीमंत नसल्याचा, सावळ्या माणसाला आपण गोरे नसल्याचा, ढ व्यक्तीला आपण हुशार नसल्याचा अशी बरीच उदाहरणे देता येतील.पण खरंच असा न्यूनगंड घेऊन जगण्याची गरज असते का? आपल्या कडे जी गोष्ट नाही आणि समोरच्या कडे आहे तर तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ हे कोण ठरवतो आपणच ना? ती व्यक्ती आपल्यापेक्षा एका बाबतीत उजवी असली म्हणून तिचे श्रेष्ठत्व आपण गृहीत धरतो. असेही असू शकते कदाचित आपल्याकडे असणारा एखादा गुण हा त्या व्यक्ती कडे काडीमात्र ही नाही.
प्रत्येक ठिकाणी , क्षेत्रात एकतरी व्यक्ती असते की त्या व्यक्तीला जवळजवळ सगळेच अवगत असते पण त्या व्यक्तीला सगळं येते मग आपल्याला काहीच येत नाही किंवा मी तिथपर्यंत पोहचू शकत नाही असा विचार जर सगळ्यांनीच केला असता तर जगातल्या कितीतरी उत्तम कलाकृती ना , कलाकारांना , उद्योजकांना, खेळाडूंना आपण मुकले असतो....खरं आहे ना हे?
पण तरीही कधीतरी असे होते की कुणीतरी आपला आपल्यातल्या एखाद्या कमीपणावरून आपला अपमान करतो आणि मग आपण त्या अपमानापेक्षा आपल्यातल्या त्या कमतरतेचा जास्त विचार करतो. ती व्यक्ती म्हणाली म्हणून आपण ही हे गृहीत धरतो की आपल्याला ही कमतरता भरून काढताच येणार नाही किंवा मी अशीच किंवा असाच आहे मला हे जमणारच नाही.आणि त्याच चुकीच्या मार्गाने दिशेने आपण स्वतःला ओढत नेतो. आपल्याला दिलेले हे एक आव्हान म्हणून आपण त्या कडे बघत नाही. त्या अपमानाने चरफडत बसण्यापेक्षा किंवा रडत बसण्यापेक्षा हीच संधी असते स्वतःला सिद्ध करायची. आपल्यातल्या त्या कमी ला पूर्ण करायचा प्रयत्न करायची.
काही वेळा न्यूनगंड हा क्षणिक असतो म्हणजे कुणीतरी आपल्यापेक्षा जास्त चांगले काहीतरी करून जाते आणि मग आपल्याला वाटतं की आपण असे उत्तम करूच शकत नाही. त्यावेळी गरज असते आपण आपल्यावर विश्वास ठेवायची. त्या गोष्टींची बरोबरी ना करता त्यातले वेगळे पण शोधायची आणि आपण तसे स्वतःला घडवायची.
मला खरेच कौतुक वाटते जेव्हा कुठेतरी वाचते किंवा बघते एखाद्या अपंग व्यक्ती जेव्हा खूप छान कलाकृती निर्माण करते. आपल्यातल्या कमतरतेला आपली लाचारी न बनवता जिद्दीने काही करून दाखवतात. रांगोळी, चित्र, गायन अशा कितीतरी कला ते उत्तमपणे सादर करतात. मी या ठिकाणी एकच उदाहरण देईन ते म्हणजे संगीतकार श्री रवींद्र जैन.
आपल्या सगळ्यांमध्ये एक सगळ्यात जास्त आढळणारा न्यूनगंड म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलता न येणे किंवा न समजणे. या गोष्टी मूळे खूप जण स्वतःला कमी लेखतात. बापरे ती कसली छान बोलते ....मला मेले एक वाक्य धड यायचे नाही. नको रे बाबा तिथे सगळे फाडफाड इंग्लिश बोलतात मला काही कळणार नाही. अशी वाक्य नेहमीच कानावर पडतात. इंग्रजी ही भाषा आहे ते ज्ञान नाही असे वाचले होते कुठेतरी. आपली मातृभाषा येते ना आपल्याला मग का न्यूनगंड?? परकी भाषा येत नाही म्हणून?? कुठे काही अडत नाही तिच्याशिवाय आणि अडले तर मदत करणारे आहेतच की...आणि जर प्रयत्न केला तर ती शिकायला ही कठीण नाही. पण आपण त्याचा बाऊच इतका करतो की मला जमणारच नाही ही खूणगाठ मनाशी पक्की करून ठेवतो. आणि तेच मनात ठेवून प्रयत्न ती शिकायचा प्रयत्न करणे ही सोडून देतो.
अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते आताही जेव्हा पिकनिक किंवा गेट टू गेदर साठी आम्ही विचारतो आमच्या शालेय मित्रमैत्रिणी ना तेव्हा कधी कधी नको ग तुम्ही सगळे हुशार मुले आहात आम्ही कुठे येणार किंवा तुमच्या इतके पुढारलेले नाही अशी कारणे ऐकायला मिळतात. इतकचं कशाला तर परिस्थिती ची ही तुलना केली जाते. मला वाटतं आपण शाळेतच शिकतो की भेदभाव करू नये आणि आपण तेच करतो. का असे नको ते न्यूनगंड मनात ठेवता? मैत्री मध्ये कमी जास्त हे नसतेच कधी.
एखादी व्यक्ती जर अडखळत बोलत असेल तर आपण त्यांच्यासमोरच हसतो, अरे! हे काय बोलतात कळतच नाही..असे बोलून मोकळे होतो. कधी शांतपणे ऐकून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. त्यांच्या भावना समजून घेतल्या तर संवाद आपोआपच साधला जातो.
आपल्याकडे सगळ्यात जास्त मनाला खुपणारी गोष्ट असते एखाद्या स्त्री ला मुल न होणे. लग्नानंतर लगेच विचारणा होऊ लागते आता पाळणा कधी हलणार. मग हळू हळू कुजबुज सुरू होते तिच्यातल्या दोषांची. मग दोघांतल्या दोषांची. हजार सल्ले दिले जातात. मुलं न झालेल्यांना समारंभात पण थोडे लांब ठेवले जाते. कधी कधी तर त्याची इतकी चर्चा होते की त्याचा परिणाम त्यांच्या संसारिक जीवनावर होतो. दोघांना कुठे जाणे येणे नको होते. आपसातले वाद वाढतात. आपल्या कडे आज या गोष्टी साठी ही बरेच चे उपाय आहेत अगदीच काही नाही तर दत्तक घेणे हा ही एक पर्याय आहेच. पण आपली मानसिकताच आहे की दोषांवर बोट ठेवायचे.
खरे तर न्युनगंड येण्याला आपल्या आजूबाजूचे लोक जास्त कारणीभूत असतात. एखादी व्यक्ती मध्ये जर काही उणीव असेल तर तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करून त्या उणिवेवरच बोट ठेवले जाते. मग त्या व्यक्तीला आपोआपच आपल्यातल्या त्या उणिवेची लाज वाटायला लागते आणि त्या गोष्टींचा न्यूनगंड येतो. कुणीतरी आपल्याला कमी लेखले म्हणून आपण कुणीच नाही असाही न्यूनगंड आपल्या सगळ्यात बऱ्याच वेळा येतो, आणि आपोआपच ती व्यक्ती सगळ्यांपासून लांब लांब राहू लागते.
आज नवीन वर्षाच्या निमित्ताने एक संकल्प सोडू की निदान एका तरी व्यक्तीला न्यूनगंडातून बाहेर पडायला मदत करू. कुणाच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्यातल्या गुणांचे कौतुक करू. आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने जगासमोर उभे राहू.एक वाक्य आपण नेहमी लक्षात ठेवावे हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्याचे प्रत्येकाचे एक वेगळेपण आहे आणि वेगळे वैशिष्ट्य ही.
खरे आहे ..असा माणूस शोधून सापडणार नाही ज्याने कधी कोणता न्यूनगंड बाळगला नाही , पण आपल्यातल्या खुबी ,वैशिष्ट्य ओळखून त्या न्यूनगंडावर मात करणारे हि बरेच आहेत, तू नेमके तेच संगीत्लेय्स या लेखातून ..क्या बात है मिलन ... नववर्षाची सुंदर भेट दिलीस
ReplyDeleteस्त्री ला मूल न हो णे हा नुन्य गंड असू शकत नाही
ReplyDeleteकारण ही एक शारीरिक रचना जी देवाची देणगी आहे
नुन्य गंड आपण प्रयत्न पूर्वक दूर करू शकतो
असे मला वाटते
न्यूनगंड नाहीच तो पण आजूबाजूची माणसे सतत त्यावर बोलून तो मनात आणतात.
DeleteMast, good start
ReplyDeleteहळूहळू आपले लेखन सम्रद्ध होत आहे, वेगळा विषय आहे
ReplyDeleteMilan tai, khup chan vishay nivadla ahes , न्यूनगंड pratekachya manat asto pun tyavar maat kase karave asa ha tuzha lekh khupach avadla ����
ReplyDeleteHarsha Penkar-Kale
really ekdam perfect subject madla ahe tai tumhi ashya khup sarya goshtincha manat vichar challela asto ani kon kay bolel hey dekhil pan apan ahe tase swikar karun mast life enjoy karavi ............... pretek mansa madye kahitari kamtarta astech pan tyacha baau karun jagu naye bas enjoy.......kara ani mast jaga each and every moments.......nice tai mast .
ReplyDeleteWah dear...kya baat hai!!A budding counsellor..You are maturing as a writer with every blog of yours! Keep it up n God bless! Happy New year!
ReplyDeleteVery good start for the new year. Ekdam different vishay mandlas tu. Ha manushya swabhav ahe jo ya blog madhun tu perfectly mandlas. Keep it up dear.
ReplyDeleteन्युनगंड या जरा वेगळ्याच विषयावर लिहिलंस छान लिहिलंय लिहितानाच संकल्प करायला सुचवलं आहेस! क्या बात... लगे रहो.Great Going
ReplyDelete