आमची मैत्री जेमतेम दोन वर्षांची आहे. शाळेतला भूषणच काय तर त्याचे नावही मला आठवत नाही. अर्थात त्यालाही मी आठवत नाहीये ही गोष्ट वेगळी. जेव्हा ग्रुप वर माझ्या विषयी बोलले जायचे तेव्हा तो विचार करायचा कि आपल्या वर्गांत मिलन नावाचा कोण मुलगा होता? पण ज्या दिवशी माझ्या दहिसर च्या घरच्या गेट टू गेदर चे फोटो टाकले तेव्हा त्याला कळले कि मिलन मुलगा नाही मुलगी आहे.
त्यानंतर हि आम्ही जास्त काही बोलत नव्हतो पण एकदा माझा महाराष्ट्र टाइम्स ला एक लेख आला होता त्यावर त्याने कंमेंट्स केले होते. तेव्हा खरी बोलायला सुरवात झाली आमची. त्यानंतर कळले कि त्याला वाचनाची खूप आवड आहे म्हणून मी ग्रुप वर पाठवलेले बाजींद कथेचे भाग त्याला हि पाठवले. त्या वेळेला आम्ही मेल मधून एकमेकांशी बोलायला लागलो. त्यावेळी त्याने मला म्हटले होते कि धरती वर माणूस उपराच हे पुस्तक आहे माझ्याकडे मी देईन तुला. आज दोन वर्ष पूर्ण होतील आमच्या मैत्रीला पण अजून पुस्तक काही मिळालेलं नाही मला.
त्यानंतर खूप दिवस मेलवरच बोलल्यावर आमच्या लक्षात आले कि आम्ही व्हाट्सअँप वरही बोलू शकतो मग तिथे संवाद सुरु झाले. आमचे बोलणे हे साधारण पुस्तकं, लेख एखादा चांगला चित्रपट यावरच असायचे. अगदी ऑफिशिअली गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट आम्ही एकमेकांना केले असे मला आठवत नाही.
एक दिवस त्याचा मेसेज आला मी विरार ला येणार आहे तुला वेळ असेल तर भेट. अनायसे मी हि विरार लाच होते म्हणून आम्ही भेटायचे ठरवले. विरार स्टेशन ला उतरल्यावर मी त्याला फोन केला " कुठे आहेस तू?" ते आमचे पहिले फोनवरचे संभाषण होते. मग आम्ही स्टेशन जवळच भेटलो जेमतेम १० ते १५ मिनिट. बापरे किती गप्पा मारल्या आम्ही. सगळ्या गमती जमती ज्या त्याने आतापर्यंत मिस केल्या होत्या त्या सांगितल्या. त्यावेळी मला आठवतेय तो म्हणाला होता कि तुझे आणि मंदार चे कौतुक कि तुम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले आहे. परत लवकरच भेटू म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
आणि अगदी एकाच महिन्यात आम्हाला परत भेटण्याची संधी मिळाली. जानेवारी मध्ये आमची पिकनिक होती त्यावेळी आमची दुसरी भेट. त्या पिकनिक मध्ये भूषण च्या बऱ्याच चांगल्या गोष्टी लक्षात आल्या. तो उत्तम कानसेन आहे. जुन्या गाण्यांबद्दल आणि चित्रपटांबद्दल त्याचे ज्ञान भन्नाट आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अशा फार कमी गोष्टी असतील ज्या त्याला माहित नाही. आणि गाणी तर त्याला अशी पाठ आहेत मग ती जुनी असोत कि नवीन हिंदी असोत कि मराठी. तो ज्या टीम मध्ये असेल ती टीम अतांक्षरी मध्ये कधीच हरणार नाही.त्याला इंटरनेट चे हि भयानक वेड आहे. मी तर त्याला " इंटरनेट चा कीडा " म्हणते. त्याला काही काम सांगा नेट शी रेलटेड तो पूर्ण करतोच. अगदीच नाही जमण्यासारखे असेल तर सांगतो कि मी प्रयत्न करतो पण झाले तर ठीक. त्याच पिकनिक मध्ये भूषण ची विनोदबुद्धी हि दिसून आली आणि त्याचा हजरजबाबीपणा हि. एखाद्या गोष्टीवर त्याची उस्फुर्त प्रतिक्रिया अगदी अफलातून असते. हि गोष्ट तर आमच्या शाळेच्या ग्रुप वर असणाऱ्या प्रत्येकालाच लक्षात आली असेल. भूषण चे कौतुक असे हि कारण तो आमच्या गेट टू गेदर ला येताना ३ ट्रेन बदलून येतो. कोपरखैरणे ते विरार असा प्रवास म्हणजे धन्यच. यावर्षी माझ्याघरी गणपतीला हि त्याने प्रॉमिस केल्याप्रमाणे येऊन गेला.
माझे ज्यावेळी दोन तीन लेख छापून आले तेव्हा त्याने मला विचारले तू ब्लॉग लिहितोस का ? बापरे !!! हे काय ? अशी काहीतरी माझी प्रतिक्रिया होती. मग त्याने फोन करून मला नीट समजावले , त्यानंरत २-३ दिवसांनी फोन करून त्याने मला फोनवरूनच ब्लॉग कसा ओपन करायचा ते शिकवले. जवळ जवळ एक तासभर मी त्याला हैराण केले असेल. मला प्रश्न खूप पडतात ना ... त्यानंतर मी माझा पहिला ब्लॉग लिहिला आणि त्याला मेल केला. त्यात असणाऱ्या चुका त्याने सुधारून दिल्या. त्यानंतर मी माझा प्रत्येक ब्लॉग आधी त्याला मेल करते त्याचे अप्रूव्हल आले कि मगच तो पब्लिश करते. त्याची एक गोष्ट मला खूप भारी वाटते कि मी त्याला कितीही वाजता जरी मेल किंवा मेसेज केला तरी तो त्याला वेळ मिळेल तास तो रिप्लाय करतो. कधीही कंटाळा करत नाही. आणि चुकून जर कधी त्याला उशीर झाला तर तो चक्क सॉरी म्हणतो. माझा एकमेव मित्र असा आहे जो मला सॉरी म्हणतो. लिखाणात झालेल्या चुका खूप सोप्या पद्धतीने तो मला समजावतो. माझ्या प्रत्येक ब्लॉग वर सर्वात आधी त्याची कंमेंट असते. त्याने नाही केली तर नेहमीप्रमाणे मी त्याच्यावर रागावते.
मला वाटते माझ्या लिखाणाचे सगळ्यात जास्त कौतुक त्यानेच केले असेल. मध्यंतरी जेव्हा मला काही लिहायला सुचत नव्हते. म्हणजे अक्षरशः असे वाटत होते कि बहुधा माझे लिखाण इथेच थांबले आता अजून काही लिहूच शकणार नाही. हे त्याला सांगितल्यावर माझ्यापेक्षा जास्त टेन्शन त्याला आले होते. ८ दिवस सतत तो माझ्या संपर्कात होता. मी काही मेसेज केला तरी रिप्लाय देत होता. मला धीर देत होता. एक वाक्य सुचले तरी लिही. होते असे कधी कधी. नको अशी खचून जाऊ. खूप समजावले त्याने मला. आणि त्या नंतर मी पहिला ब्लॉग लिहिला तो विंदा वरचा. तो वाचून तो खूप खुश झाला. त्याची बिनपगारी ब्लॉग एडिटर ची नोकरी टिकल्याचा आनंद झाला होता त्याला. हो आणि मी हि त्याची ओळख आता ' माझा ब्लॉग एडिटर ' अशीच करून देते.
मी जेव्हा हॅम्लेट वरचा ब्लॉग लिहिला ना तेव्हा तो आणि मुक्ता म्हणाले होते कि यावर सुमित राघवन ची प्रतिक्रिया येईल बघ. आणि काय आश्चर्य एका अज्ञात व्यक्ती मुळे माझा तो ब्लॉग सुमित पर्यंत पोचला आणि सुमित ने त्यावर खूप छान प्रतिक्रिया हि दिली. त्यात लिहिले होते कि पुन्हा याल तेव्हा नक्की भेटा. आधी मी आणि मुक्त जाणार होतो पण मग ५ मित्रमैत्रिणी गेलो नाटकाला. मला खूप आनंद होत होता कि ज्याच्या मुळे मला सुमित ची प्रतिक्रिया मिळू शकली त्याच व्यक्तीबरोबर अगदी बी रांगेत बसून मी ते नाटक पहिले. आणि फोटो मध्ये हि माझ्यासोबत तो हि आहे. जेव्हा सुमित शी बोलताना माझे ततपप होत होते तेव्हा भूषणनेच माझी बाजू सावरून घेतली. माझे कौतुक होताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हि मला स्पष्ट दिसत होता.
भूषण चा एका गोष्टीचा मला राग येतो तो जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तो कधीच समोरून सांगत नाही आपण विचारले कि अरे कुठे होतास इतके दिवस तेव्हा सांगतो. पाठीच्या मणक्याचा असलेला त्रास त्याने सांगितला त्याला कारण हि तसेच झाले आमचे २५ वर्षाचे स्नेहसंमेलन होते आणि त्याच्या आदल्या दिवशी पासून त्याचा फोन बंद येत होता. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो कि काय झाले. पण त्या दिवशी सकाळी त्याचा फोन आला कि मी येतो आहे. मी तर खूप चिडले होते पण नंतर त्याने कारण सांगितले. आताही मध्ये जेव्हा तो हॉस्पिटल ला ऍडमिट होता मी सहज म्हणून मेसेज केला तेव्हा म्हणाला कि अग मी हॉस्पिटल ला आहे. त्याच्यासाठी मी जेव्हा अगदी साधे गेट वेल सून चे ग्रीटिंग बनवले तेव्हा हि तो खूप खुश झाला कि मी वेळ काढून स्वतः काहीतरी बनवले त्याच्यासाठी.
मला वाटते माझी आणि भूषणची इतक्या पटकन मैत्री होण्याचे कारण आमच्या बऱ्याच आवडी निवडी सारख्या आहेत (गाणी, सिनेमा, वाचन ) . तो हि खूप हळवा आहे. सगळ्यांना मदत करायला तो हि एका पायावर तयार असतो. आणि त्याला तुम्ही त्याला कधी हि , किती वाजता हि मेसेज करा तो रिप्लाय देतोच.
भूषण परत एकदा मनापासून सॉरी मी तुझा वाढदिवस विसरले.
खरेतर हा ब्लॉग मी खूप आधी लिहायला पाहिजे होता कारण ज्याच्यामुळे मी
ब्लॉग लिहायला सुरु केले त्याच्यावर इतक्या उशिरा लिहिणे मलाच मन खात होते.
मला माहित आहे भूषण तुला मी थँक यू म्हटलेले आवडत नाही पण हा ब्लॉग खरेच
फक्त तुझे आभार मानण्यासाठी. कदाचित तू ब्लॉग सुरु करून दिला नसतास तर मी
फक्त महाराष्ट्र टाइम्स च्या लेखावरच समाधान मानले असते. खऱ्या अर्थाने तू
माझ्या लेखनाला दिशा दिलीस. मी खूप मोठे काही करू शकणार नाही कदाचित पण
माझ्या लेखांचे होणारे कौतुक यात सतत तुझा वाटा असेल.
आज माझी तुझ्या ब्लॉग मध्ये वर्णी लागली .... जाम भारी वाटतेय .... स्वता:ला स्वता:चीच स्तुती ऐकायची ,वाचायची मजाच काही और असते हे ब्लॉग वाचताना जाणवले आणि अनुभवले .. मी असा आहे माझे मलाच माहित नव्हते.... पण तुझे व्यक्ती वर्णन अफलातून असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
ReplyDeleteगुण स्वभाव सांगितलेस त्या प्रमाणे “ पृथ्वीवर माणूस उपराच “ पुस्तकाचा टोमणा हि छान मारलास 😄😄👌 ,
THIS IS THE BEST DIWALI GIFT
Thanks नाही म्हणणार ...पण तुझ्या लिखाणाला खूप खूप शुभेच्छा मनापासून देईन.
As usual Jhakas
ReplyDeleteKhup chan Milan. Perfect varnan.
ReplyDeleteMilan , khup chan ahe ha vyakti vishesh.....
ReplyDeleteछान लिहिलंय
ReplyDeleteमिलन छान लिहिलंय
ReplyDeleteखूप छान लिहिले आहेस मिलन भूषण बद्दल. तूझ्या लेखातून भूषणची ओळख झाली. Hope this blog you didn't send to editor😊
ReplyDeletekhup sundar lihile ahe tu milan bhushan baddal and ekun ek shabd sagle barober ahe tu jase tyala " इंटरनेट चा कीडा " tase mi tyala "Google" bolte har ek problem aplyala asel tevha tyache utter tyakade asacyachech lagech ani amche sir tyana "mobile master" boltat ..bhushan ek chan vyaktimatav ahe khup chan nature ahe tyanche ...mast tu ekdam barober lihile ahes .... ani ajun ek bhushan chan gato suddha khup mast gayan ahe and chan dialog suddha bolta yetat amhla office madye natsamrath madle dailog bolun dhakhavle hote ........nice mast milan khup chan lihile ahe.....
ReplyDelete