सगळ्यात प्रथम तर महाराष्ट्र टाईम्स चे आभार. त्यांच्या उपक्रमामुळे आम्हाला " सूर नवा ध्यास नवा" च्या सेट वर जायची संधी मिळाली. एक नवीन अनुभव आणि तोच अनुभव मी आता सांगणार आहे. माझ्या शब्दात.
रविवारी पेपर मध्ये आले की ज्यांना सूर नवा ध्यास नवा च्या सेट वर जायचे आहे त्यांनी नाव नोंदणी करा. एक उत्सुकता म्हणून मी नाव नोंदणी केली. शूटिंग बुधवारी होते. सोमवार गेला, मंगळवार दुपारपर्यंत काही फोन आला नाही. मी म्हटले झाले बहुतेक आपला नंबर नाहीं लागला. पण ५.३० च्या दरम्यान फोन आला की उद्या ९.३० वाजता बोरीवली ला भेटा. माझा विश्वासच बसेना. इतका आनंद झाला होता. माझी सगळी कामे बाकी होती पण मी आपली वेड्यासारखी त्या फोन चा च विचार करत होते. नक्की नेतील ना? खरेच जायचे आहे का? माझा विश्वास बसत नव्हता. फक्त नाचायचे तेवढे बाकी राहिले होते. मग अजून गडबड सुरू झाली , उद्या काय घालून जायचे हा यक्ष प्रश्न..... शेवटी बरचे ड्रेस, साड्या उलट पुलट करून झाल्यावर एक साडी नक्की केली, मग त्यावरचे सगळे म्याचिंग चे काढून झाले. २-३ फ़ोन करून झाले.
त्या रात्री धड काही झोप लागली नाही. काय असेल ? कसे असेल?? परत तिथे सगळेच अनोळखी , एकटे बसून काय करायचे?? असे हजार प्रश्न.... आणि त्याही पेक्षा उत्सुकता आणि आनंद.
झाली बाबा सकाळ एकदाची.. घरातली काम आटपून निघायची तयारी केली. तिथे उशीर नको म्हणून लवकरच निघाले भीती मनात उशीर झाला आणि आपल्याला सोडून गेले तर.. तिथे पोचता पोचता फोन आला त्यांचा ... हुश्श वेळेत आहोत आपण. तिथे गेले तर आधीच ४-५ जणी होत्या तिथे. सगळेच उत्सुक होते. तसे त्यातल्या काहींनी आधी असे प्रोग्राम पाहिले होते. आम्ही जे पहिल्यांदा जाणारे होतो ते त्यांचे अनुभव ऐकत होतो. आम्ही ७-८ वेगवेगळ्या वयोगटातील बायका होतो तिथे पण आम्ही सगळ्या एकमेकींना एकेरीच संबोधत होतो. वयाच्या मर्यादा ओलांडून आम्ही छान मैत्रिणी झालो होतो. बस मध्ये ही मजा करत होतो. नेहमीप्रमाणे सेल्फी काढायला सुरवात झाली होती. पुरुषही उत्साही होते. एक काका वाशी तर एक काका कल्याण हुन आले होते. आणि गंमत म्हणजे सगळेच तिथे कोणाच्या ना कोणाच्या लांबच्या किंवा जवळच्यांच्या ओळखीचे होते. जग किती लहान आहे याचा प्रत्यय येतो अशा वेळी.
१०.१५- १०.३० ला पोचलो स्टुडिओत. अजून उत्सुकता. तिथे गेल्यावर श्री. महेश काळे आणि शाल्मली बाहेरच दिसले. त्यांच्याशी बोलायला जाणार इतक्यात ते तयारीला गेले. मग नाश्ता करून आम्ही आत सेट वर गेलो. आधी जागा पकडून घेतली. मग ५-१० मिनिटे बसल्यावर आम्ही सगळ्यांनी स्टेज वर आक्रमण केले .. हो आक्रमणच जवळ जवळ. सगळेजण फोटो काढायला स्टेज वर. आधीच त्या स्टेज वर किती माणसे. ते वादक, लाईट वाले, सेटिंग वाले, आणि त्यात आम्ही. काय मस्त होता तो सेट. किती लाईट्स, कॅमेऱ्याची मोठी ट्रॉली. ते चालवणारी माणसे. सगळ्यांच्या कानाला ते हेडफोन लावलेले. माणसांची नुसती धावपळ सुरू होती. त्या सेटवर शिरताना एक छोटीशी रूम होती त्यात ७-८ मोठे मोठे टीव्ही होते. आणि पूर्ण स्टेज त्यात दिसत होता. दोन तीन माणसे तिथे काहीतरी करत होती . हो!! काहीतरी, कारण हे सगळेआमच्यासाठी नवीनच ना. कोण काय करतोय काही कळत नव्हते. फक्त त्यांचे संवाद ऐकताना गम्मत येत होती. आणि सगळीकडे वायर्स चे जाळे होते.
आधी स्टेज वर जिथे गायक उभे राहतात तिथे उभे राहून फोटो झाले. काही सेल्फी काही ग्रुप. नुसता उत्साह ओलांडून जात होता. मग तिथे एक स्पर्धक आला मग त्याच्या सोबत . हळू हळू एक एक स्पर्धक येत गेले मग त्यांच्या सोबत फोटो आम्हाला ६४ जी. बी पण कमी पडले असते त्यादिवशी जर पूर्णवेळ बसलो असतो. त्या स्पर्धकांना सुद्धा खूप छान गाता. तुमचे ते गाणे खूप आवडले , आज कुठले गाणे? अक्षरशः भंडावून सोडले त्यांना. (असे आम्हाला मनात वाटले) ते सगळेच खूप छान हसून उत्तर देत होते. मग आम्ही आमचा मोर्चा वादकांकडे वळवला . आधी त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यांचे भरपूर कौतुक केले. त्यांनी ही आमच्या प्रश्नांची मस्त उत्तर दिली. त्यातला तबल्यावर साथ देणारा प्रसाद पाध्ये मला जास्त आवडला. इतक्यात अवधूत , महेश आणि शाल्मली आले म्हणून आम्हाला जागेवर बसायला सांगितले. आम्ही सगळे अय्या!! अवधूत ने बघ काय घातलंय, महेश किती साधा आहे, शाल्मली ची हेअर स्टाइल बघ करत जागेवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात आम्हाला परत स्टेज वर बोलावलं महाराष्ट्र टाईम्स साठी फोटो काढायला. आधी कॅप्टन बरोबर फोटो काढून झाल्यावर स्पर्धकांबरोबर फोटो काढले. फोटो काढता काढता तेजश्री ला हळूच तू खूप गोड दिसतेस सांगून झाले. फोटो काढताना मोबाईल नाही घ्यायचा असे सांगितले होते पण फोटो काढून झाल्यावर पटकन मोबाईल आणला आणि महेश काळे ना गाठले. अवधूत ला आधी भेटले होते म्हणून त्याला सतवायला गेले नाही परत. महेश ला माझ्या मुलीने दिलेला निरोप दिला की तिला त्याचे गाणे खूप आवडते. तर त्याने सांगितले की माझा प्रोग्रॅम आहे षण्मुखानंद ला त्याला घेऊन या , आणि मला भेटायला आणा तिला. नवीन पिढीतील शास्त्रीय गाण्याची ओढ पहिली की बरे वाटते. त्याला मी सहज विचारले तुमचा हात कसा आहे आता?? तर त्याने लगेच त्याला लागलेले दाखवले आणि म्हणाला की बघा ना ४-४ खिळे ठोकून ठेवले आहेत. मला हसूच आले. इतका मोठा माणूस पण किती साहजिक बोलत होता. खरेच ग्रेट. डोके आभाळाला टेकलेले असताना पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे अशा माणसांकडून शिकावे.
झाले आता शूटिंग सुरू होणार. आम्हाला परत जागेवर पळवले. आम्ही बसलो आणि तिथे एक माणूस आला आणि म्हणाला की मी सांगेन तेव्हा त्या स्टेज वर बघून टाळ्या वाजवा. आम्ही शाळेत म्हणायचो तसे एका सुरात होsss म्हणालो. मग आकाशवाणी व्हावी तसा कुठूनतरी आवाज आला वन, टू, थ्री ऍक्शन.. आणि आम्ही टाळ्या वाजवायला लागलो. मला तर खूप हसायला येत होते रिकाम्या स्टेज कडे पाहून टाळया वाजवताना. मग तेजश्री आली स्टेज वर तिने त्या स्क्रोल वर पाहून वाचायला सुरवात केली. वाचताना तिच्या लक्षात आले की तिचा आवाज स्पीकर वर येत नाहीये. मग तिची ड्रेसर आणि तो माईक वाला दोघे येऊन ते नीट करून गेले. मग परत तोच अदृश्य आवाज ऍक्शन म्हणाला आणि खरे शूटिंग सुरू झाले. त्या आधी जिचे पाहिले गाणे होते तिने त्या वादकांसोबत एकदा मुखडा गाऊन पहिला. त्या वादकांना सूचना देणाऱ्या माणसाने बऱ्याच सूचना केल्या. सुरवातीचे सगळे झाल्यावर प्रमुख पाहुणे " संगीतकार प्यारेलाल" जी आले. सगळे उठून उभे राहिलो. तो मगाशी आम्हाला सूचना देणारा माणूस म्हणाला की ते आले की उभे राहून टाळ्या वाजवाल का?? आम्ही म्हटले अर्थातच इतका मोठा माणूस न सांगताच करू आम्ही. ते स्टेज वर येण्याआधी त्यांच्या स्वागतासाठी काय वाजवायचे याची चर्चा झाली त्या वादकांमध्ये आणि त्या सूचना देणाऱ्या माणसामध्ये. मग आपल्या सगळ्यांचा आवडता कर्मा सिनेमा चा तो पिस वाजवण्यात आला. प्यारेलालजी आल्यावर स्टेज वर वेगळेच चैतन्य आले. टाळ्यांचा कडकडाट, सगळे उभे राहिले होते. इतका अनुभवी माणूस पण किती आल्या आल्या म्हणाले की मी आज येथे नवीन पिढी करून शिकायला आलो आहे. इथून नवी सुरवात. ते स्थानापन्न झाल्यावर गायिकेला सुरवात करण्यास सांगितली. गाणे झाल्यावर कॅप्टन ना गाणे कसे झाले असे विचारले गेले. त्यावर अवधूत ची टिप्पणी खूप छान होती. किती अभ्यास करून येतो तो माणूस. प्रत्येक गाण्याचा त्याचा परिपूर्ण अभ्यास असतो. आणि महेश बद्दल काय सांगायचे, त्याचे मराठी तर अप्रतिमच. जे बोलतो ते किती तळमळीने. त्याच्या बोलण्यातून त्याची गाण्यावरची श्रद्धा दिसून येते. नंतर प्यारेलालजी ची वेळा गाण्याबद्दल बोलायची. किती आठवणी त्या प्रत्येक गाण्यामागच्या. त्या माणसाला खरेच मानायला हवे आज लक्ष्मीकांत जगात नाहीत पण त्यांची आठवण काढली नाही असे एकही वाक्य प्यारेलालजी नी उद्गारले नाही. सलाम त्यांच्या मैत्रीला आणि सलाम लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीला.
तिथे स्पर्धकांमध्ये ही किती खेळीमेळीचे वातावरण. एकमेकांशी स्पर्धा करायला हे आले आहेत असे अजिबात वाटत नव्हते. प्रत्येक जण एकमेकांशी मस्त हसून खेळून बोलत होते. सगळेजण एकमेकांना गुडलक देत होते. गाण्याला दाद देत होते. तिथे आलेल्या दोन स्पर्धकांच्या छोट्या गोंडस मुलीं सोबत खेळत होते. तेजश्री साठी असणारी वाक्य जेव्हा एक स्पर्धक म्हणत होती तेव्हा परत त्या अदृश्य आवाजाने सूचना केली की स्पर्धाकांसाठी स्क्रोल नाही. मला अजूनही कळलं नाहीये की तो आवाज नक्की कुणाचा होता आणि कुठून येत होता.
प्रत्येक गाण्यानंतर थोडी विश्रांती असायची त्यात सगळ्यांचे मेकअप चे टचअप. वादकांची एक रिहर्सल होत होती. शेवटी आमची निघायची वेळा झाली. पण आम्हाला अजून एक गाणे ऐकायचे होते , ज्या स्पर्धकांचे गाणे होते त्याची मावशी आमच्या सोबत होती. त्यांनी त्या आयोजकांना विनंती केली आणि अजून थोडा वेळ आमच्या पदरी पडला. मस्तच झाले ते गाणे. शेवटी इच्छा नसताना तिथून निघालो. खूप नवीन आणि अविस्मरणीय अनुभव घेऊन. खूप मजा आली. एक दिवसाची आमची छोटी पिकनिक झाली ती.
म्हणतात ते खरच छोटा पडदा असो वा मोठा ही चंदेरी दुनिया म्हणजे जादुई स्वप्न नगरी. या स्वप्न नगरी मध्ये आम्ही एक छोटासा फेरफटका मारून आलो.
बरे ही गम्मत इथेच संपत नाही हा.......
ज्यावेळी तिकडचे फोटो मी सगळीकडे पोस्ट केले. तेव्हा किती जणांनी विचारले अगं!! तू कशी गेलीस? आम्हाला सांगायचे आम्ही आलो असतो.. वा मस्त महेश काळे!!! कसा आहे ग तो?? अवधूत बरोबर फोटो का काढले नाहीत?? हजार प्रश्न. पण जाम भारी वाटत होते. सगळयांना सरप्राइज होते. मी सगळ्यांना मेसेज केले होते की सोमवारी कलर्स वर ९.३० वाजता " सूर नवा ध्यास नवा" नक्की पहा. जे नेहमी पाहत होते त्यांनी म्हटले आम्ही पाहतोच , जे पाहत नव्हते त्यांनी म्हटले तुझ्यासाठी नक्की बघू. कधी सोमवार उजाडतो असे झाले होते. आणि ज्या दिवशी टीव्ही वर कार्यक्रम दिसला त्या दिवशी तर फोन आणि मेसेजेस ... जराही उसंत नव्हती. सगळे भरभरून कौतुक करत होते. माझी एक मैत्रीण चक्क मोजत होती की मी किती वेळा दिसले. काही जण म्हणाले की तू काय त्या कॅमेरामन ला पैसे दिलेस ?? की तो ओळखीचा होता ?? सतत तुझ्यावर कॅमेरा. म्हणे काळ्या साडीत उठून दिसत होतीस ते किती जाडी दिसतेस ते काय नुसती हसून टाळ्या वाजवत होतीस इथपर्यंत सगळे कंमेंट. काहींनी म्हटले बघ हा चुकून एखादी ऑफर यायची काम करायची..तर एक काका म्हणाले मला वाटले तू गाणार आहेस की काय? मी म्हटले की मी गायले ना तर ती कट्यार मलाच मिळेल. माझा आवाज ऐकून पळून जातील सगळे मग काय कट्यार माझीच. माझा नवरा म्हणाला तू तर टी आर पी वाढवलास कार्यक्रमाचा. त्याच्या ही मित्रमैत्रिणी नि त्याला मेसेजेस केले. त्याच्या एका अमेरिकेतल्या मैत्रिणीने ही फ़ोन केला होता. खूप कौंतुक झाले. नातेवाईक, मित्रमैत्रिणी , आजूबाजूचे सगळेच खुश. काही न करता सेलिब्रिटी झाले होते. टिव्ही वर यायची इच्छा मात्र पूर्ण झाली.
माझे गुडलक आणि सगळ्यांचे आशीर्वाद. सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
रविवारी पेपर मध्ये आले की ज्यांना सूर नवा ध्यास नवा च्या सेट वर जायचे आहे त्यांनी नाव नोंदणी करा. एक उत्सुकता म्हणून मी नाव नोंदणी केली. शूटिंग बुधवारी होते. सोमवार गेला, मंगळवार दुपारपर्यंत काही फोन आला नाही. मी म्हटले झाले बहुतेक आपला नंबर नाहीं लागला. पण ५.३० च्या दरम्यान फोन आला की उद्या ९.३० वाजता बोरीवली ला भेटा. माझा विश्वासच बसेना. इतका आनंद झाला होता. माझी सगळी कामे बाकी होती पण मी आपली वेड्यासारखी त्या फोन चा च विचार करत होते. नक्की नेतील ना? खरेच जायचे आहे का? माझा विश्वास बसत नव्हता. फक्त नाचायचे तेवढे बाकी राहिले होते. मग अजून गडबड सुरू झाली , उद्या काय घालून जायचे हा यक्ष प्रश्न..... शेवटी बरचे ड्रेस, साड्या उलट पुलट करून झाल्यावर एक साडी नक्की केली, मग त्यावरचे सगळे म्याचिंग चे काढून झाले. २-३ फ़ोन करून झाले.
त्या रात्री धड काही झोप लागली नाही. काय असेल ? कसे असेल?? परत तिथे सगळेच अनोळखी , एकटे बसून काय करायचे?? असे हजार प्रश्न.... आणि त्याही पेक्षा उत्सुकता आणि आनंद.
झाली बाबा सकाळ एकदाची.. घरातली काम आटपून निघायची तयारी केली. तिथे उशीर नको म्हणून लवकरच निघाले भीती मनात उशीर झाला आणि आपल्याला सोडून गेले तर.. तिथे पोचता पोचता फोन आला त्यांचा ... हुश्श वेळेत आहोत आपण. तिथे गेले तर आधीच ४-५ जणी होत्या तिथे. सगळेच उत्सुक होते. तसे त्यातल्या काहींनी आधी असे प्रोग्राम पाहिले होते. आम्ही जे पहिल्यांदा जाणारे होतो ते त्यांचे अनुभव ऐकत होतो. आम्ही ७-८ वेगवेगळ्या वयोगटातील बायका होतो तिथे पण आम्ही सगळ्या एकमेकींना एकेरीच संबोधत होतो. वयाच्या मर्यादा ओलांडून आम्ही छान मैत्रिणी झालो होतो. बस मध्ये ही मजा करत होतो. नेहमीप्रमाणे सेल्फी काढायला सुरवात झाली होती. पुरुषही उत्साही होते. एक काका वाशी तर एक काका कल्याण हुन आले होते. आणि गंमत म्हणजे सगळेच तिथे कोणाच्या ना कोणाच्या लांबच्या किंवा जवळच्यांच्या ओळखीचे होते. जग किती लहान आहे याचा प्रत्यय येतो अशा वेळी.
१०.१५- १०.३० ला पोचलो स्टुडिओत. अजून उत्सुकता. तिथे गेल्यावर श्री. महेश काळे आणि शाल्मली बाहेरच दिसले. त्यांच्याशी बोलायला जाणार इतक्यात ते तयारीला गेले. मग नाश्ता करून आम्ही आत सेट वर गेलो. आधी जागा पकडून घेतली. मग ५-१० मिनिटे बसल्यावर आम्ही सगळ्यांनी स्टेज वर आक्रमण केले .. हो आक्रमणच जवळ जवळ. सगळेजण फोटो काढायला स्टेज वर. आधीच त्या स्टेज वर किती माणसे. ते वादक, लाईट वाले, सेटिंग वाले, आणि त्यात आम्ही. काय मस्त होता तो सेट. किती लाईट्स, कॅमेऱ्याची मोठी ट्रॉली. ते चालवणारी माणसे. सगळ्यांच्या कानाला ते हेडफोन लावलेले. माणसांची नुसती धावपळ सुरू होती. त्या सेटवर शिरताना एक छोटीशी रूम होती त्यात ७-८ मोठे मोठे टीव्ही होते. आणि पूर्ण स्टेज त्यात दिसत होता. दोन तीन माणसे तिथे काहीतरी करत होती . हो!! काहीतरी, कारण हे सगळेआमच्यासाठी नवीनच ना. कोण काय करतोय काही कळत नव्हते. फक्त त्यांचे संवाद ऐकताना गम्मत येत होती. आणि सगळीकडे वायर्स चे जाळे होते.
आधी स्टेज वर जिथे गायक उभे राहतात तिथे उभे राहून फोटो झाले. काही सेल्फी काही ग्रुप. नुसता उत्साह ओलांडून जात होता. मग तिथे एक स्पर्धक आला मग त्याच्या सोबत . हळू हळू एक एक स्पर्धक येत गेले मग त्यांच्या सोबत फोटो आम्हाला ६४ जी. बी पण कमी पडले असते त्यादिवशी जर पूर्णवेळ बसलो असतो. त्या स्पर्धकांना सुद्धा खूप छान गाता. तुमचे ते गाणे खूप आवडले , आज कुठले गाणे? अक्षरशः भंडावून सोडले त्यांना. (असे आम्हाला मनात वाटले) ते सगळेच खूप छान हसून उत्तर देत होते. मग आम्ही आमचा मोर्चा वादकांकडे वळवला . आधी त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यांचे भरपूर कौतुक केले. त्यांनी ही आमच्या प्रश्नांची मस्त उत्तर दिली. त्यातला तबल्यावर साथ देणारा प्रसाद पाध्ये मला जास्त आवडला. इतक्यात अवधूत , महेश आणि शाल्मली आले म्हणून आम्हाला जागेवर बसायला सांगितले. आम्ही सगळे अय्या!! अवधूत ने बघ काय घातलंय, महेश किती साधा आहे, शाल्मली ची हेअर स्टाइल बघ करत जागेवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात आम्हाला परत स्टेज वर बोलावलं महाराष्ट्र टाईम्स साठी फोटो काढायला. आधी कॅप्टन बरोबर फोटो काढून झाल्यावर स्पर्धकांबरोबर फोटो काढले. फोटो काढता काढता तेजश्री ला हळूच तू खूप गोड दिसतेस सांगून झाले. फोटो काढताना मोबाईल नाही घ्यायचा असे सांगितले होते पण फोटो काढून झाल्यावर पटकन मोबाईल आणला आणि महेश काळे ना गाठले. अवधूत ला आधी भेटले होते म्हणून त्याला सतवायला गेले नाही परत. महेश ला माझ्या मुलीने दिलेला निरोप दिला की तिला त्याचे गाणे खूप आवडते. तर त्याने सांगितले की माझा प्रोग्रॅम आहे षण्मुखानंद ला त्याला घेऊन या , आणि मला भेटायला आणा तिला. नवीन पिढीतील शास्त्रीय गाण्याची ओढ पहिली की बरे वाटते. त्याला मी सहज विचारले तुमचा हात कसा आहे आता?? तर त्याने लगेच त्याला लागलेले दाखवले आणि म्हणाला की बघा ना ४-४ खिळे ठोकून ठेवले आहेत. मला हसूच आले. इतका मोठा माणूस पण किती साहजिक बोलत होता. खरेच ग्रेट. डोके आभाळाला टेकलेले असताना पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे अशा माणसांकडून शिकावे.
झाले आता शूटिंग सुरू होणार. आम्हाला परत जागेवर पळवले. आम्ही बसलो आणि तिथे एक माणूस आला आणि म्हणाला की मी सांगेन तेव्हा त्या स्टेज वर बघून टाळ्या वाजवा. आम्ही शाळेत म्हणायचो तसे एका सुरात होsss म्हणालो. मग आकाशवाणी व्हावी तसा कुठूनतरी आवाज आला वन, टू, थ्री ऍक्शन.. आणि आम्ही टाळ्या वाजवायला लागलो. मला तर खूप हसायला येत होते रिकाम्या स्टेज कडे पाहून टाळया वाजवताना. मग तेजश्री आली स्टेज वर तिने त्या स्क्रोल वर पाहून वाचायला सुरवात केली. वाचताना तिच्या लक्षात आले की तिचा आवाज स्पीकर वर येत नाहीये. मग तिची ड्रेसर आणि तो माईक वाला दोघे येऊन ते नीट करून गेले. मग परत तोच अदृश्य आवाज ऍक्शन म्हणाला आणि खरे शूटिंग सुरू झाले. त्या आधी जिचे पाहिले गाणे होते तिने त्या वादकांसोबत एकदा मुखडा गाऊन पहिला. त्या वादकांना सूचना देणाऱ्या माणसाने बऱ्याच सूचना केल्या. सुरवातीचे सगळे झाल्यावर प्रमुख पाहुणे " संगीतकार प्यारेलाल" जी आले. सगळे उठून उभे राहिलो. तो मगाशी आम्हाला सूचना देणारा माणूस म्हणाला की ते आले की उभे राहून टाळ्या वाजवाल का?? आम्ही म्हटले अर्थातच इतका मोठा माणूस न सांगताच करू आम्ही. ते स्टेज वर येण्याआधी त्यांच्या स्वागतासाठी काय वाजवायचे याची चर्चा झाली त्या वादकांमध्ये आणि त्या सूचना देणाऱ्या माणसामध्ये. मग आपल्या सगळ्यांचा आवडता कर्मा सिनेमा चा तो पिस वाजवण्यात आला. प्यारेलालजी आल्यावर स्टेज वर वेगळेच चैतन्य आले. टाळ्यांचा कडकडाट, सगळे उभे राहिले होते. इतका अनुभवी माणूस पण किती आल्या आल्या म्हणाले की मी आज येथे नवीन पिढी करून शिकायला आलो आहे. इथून नवी सुरवात. ते स्थानापन्न झाल्यावर गायिकेला सुरवात करण्यास सांगितली. गाणे झाल्यावर कॅप्टन ना गाणे कसे झाले असे विचारले गेले. त्यावर अवधूत ची टिप्पणी खूप छान होती. किती अभ्यास करून येतो तो माणूस. प्रत्येक गाण्याचा त्याचा परिपूर्ण अभ्यास असतो. आणि महेश बद्दल काय सांगायचे, त्याचे मराठी तर अप्रतिमच. जे बोलतो ते किती तळमळीने. त्याच्या बोलण्यातून त्याची गाण्यावरची श्रद्धा दिसून येते. नंतर प्यारेलालजी ची वेळा गाण्याबद्दल बोलायची. किती आठवणी त्या प्रत्येक गाण्यामागच्या. त्या माणसाला खरेच मानायला हवे आज लक्ष्मीकांत जगात नाहीत पण त्यांची आठवण काढली नाही असे एकही वाक्य प्यारेलालजी नी उद्गारले नाही. सलाम त्यांच्या मैत्रीला आणि सलाम लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीला.
तिथे स्पर्धकांमध्ये ही किती खेळीमेळीचे वातावरण. एकमेकांशी स्पर्धा करायला हे आले आहेत असे अजिबात वाटत नव्हते. प्रत्येक जण एकमेकांशी मस्त हसून खेळून बोलत होते. सगळेजण एकमेकांना गुडलक देत होते. गाण्याला दाद देत होते. तिथे आलेल्या दोन स्पर्धकांच्या छोट्या गोंडस मुलीं सोबत खेळत होते. तेजश्री साठी असणारी वाक्य जेव्हा एक स्पर्धक म्हणत होती तेव्हा परत त्या अदृश्य आवाजाने सूचना केली की स्पर्धाकांसाठी स्क्रोल नाही. मला अजूनही कळलं नाहीये की तो आवाज नक्की कुणाचा होता आणि कुठून येत होता.
प्रत्येक गाण्यानंतर थोडी विश्रांती असायची त्यात सगळ्यांचे मेकअप चे टचअप. वादकांची एक रिहर्सल होत होती. शेवटी आमची निघायची वेळा झाली. पण आम्हाला अजून एक गाणे ऐकायचे होते , ज्या स्पर्धकांचे गाणे होते त्याची मावशी आमच्या सोबत होती. त्यांनी त्या आयोजकांना विनंती केली आणि अजून थोडा वेळ आमच्या पदरी पडला. मस्तच झाले ते गाणे. शेवटी इच्छा नसताना तिथून निघालो. खूप नवीन आणि अविस्मरणीय अनुभव घेऊन. खूप मजा आली. एक दिवसाची आमची छोटी पिकनिक झाली ती.
म्हणतात ते खरच छोटा पडदा असो वा मोठा ही चंदेरी दुनिया म्हणजे जादुई स्वप्न नगरी. या स्वप्न नगरी मध्ये आम्ही एक छोटासा फेरफटका मारून आलो.
बरे ही गम्मत इथेच संपत नाही हा.......
ज्यावेळी तिकडचे फोटो मी सगळीकडे पोस्ट केले. तेव्हा किती जणांनी विचारले अगं!! तू कशी गेलीस? आम्हाला सांगायचे आम्ही आलो असतो.. वा मस्त महेश काळे!!! कसा आहे ग तो?? अवधूत बरोबर फोटो का काढले नाहीत?? हजार प्रश्न. पण जाम भारी वाटत होते. सगळयांना सरप्राइज होते. मी सगळ्यांना मेसेज केले होते की सोमवारी कलर्स वर ९.३० वाजता " सूर नवा ध्यास नवा" नक्की पहा. जे नेहमी पाहत होते त्यांनी म्हटले आम्ही पाहतोच , जे पाहत नव्हते त्यांनी म्हटले तुझ्यासाठी नक्की बघू. कधी सोमवार उजाडतो असे झाले होते. आणि ज्या दिवशी टीव्ही वर कार्यक्रम दिसला त्या दिवशी तर फोन आणि मेसेजेस ... जराही उसंत नव्हती. सगळे भरभरून कौतुक करत होते. माझी एक मैत्रीण चक्क मोजत होती की मी किती वेळा दिसले. काही जण म्हणाले की तू काय त्या कॅमेरामन ला पैसे दिलेस ?? की तो ओळखीचा होता ?? सतत तुझ्यावर कॅमेरा. म्हणे काळ्या साडीत उठून दिसत होतीस ते किती जाडी दिसतेस ते काय नुसती हसून टाळ्या वाजवत होतीस इथपर्यंत सगळे कंमेंट. काहींनी म्हटले बघ हा चुकून एखादी ऑफर यायची काम करायची..तर एक काका म्हणाले मला वाटले तू गाणार आहेस की काय? मी म्हटले की मी गायले ना तर ती कट्यार मलाच मिळेल. माझा आवाज ऐकून पळून जातील सगळे मग काय कट्यार माझीच. माझा नवरा म्हणाला तू तर टी आर पी वाढवलास कार्यक्रमाचा. त्याच्या ही मित्रमैत्रिणी नि त्याला मेसेजेस केले. त्याच्या एका अमेरिकेतल्या मैत्रिणीने ही फ़ोन केला होता. खूप कौंतुक झाले. नातेवाईक, मित्रमैत्रिणी , आजूबाजूचे सगळेच खुश. काही न करता सेलिब्रिटी झाले होते. टिव्ही वर यायची इच्छा मात्र पूर्ण झाली.
माझे गुडलक आणि सगळ्यांचे आशीर्वाद. सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
Mast milan.. Tujhya sobat.. Mi pan tya मैफिलीत aslyacha bhaas jhala vachtana... Ekdam lively lihile ahes.. Ekun ek gosht najre samorun तरळून गेली... Kayam athvanit rahnara ek sundar.. Sukhad anubhav.. 👏👏👍👌👌
ReplyDeleteAaplya group madhlya eka friend la assa anubhav ala ki aaplyala ass vaat ki kharch aapan pan tyach thikani ahot ani to anubhav anubhavtoy
ReplyDeleteBhushan tu ekadam barobar bolas
Kayam athavnit rahanara ek sukhad anubhav ani tya anubhavat aap tithe ahot ki Kay asa anubhav ghenare aapan lok
Hyach credits milanla jate.
Thanks Milan ������������
Ratna
Deleteखूप छान लिहिलंय परत सेट वर घेल्याचा फिल आला
ReplyDeleteJabardast
ReplyDeleteVachatana mi pratyaksha tithe asalyacha ani te sarva anubhavtey asa bhaas hot hota. Milan, that is really magic of your writing....
ReplyDeleteVachatana mi pratyaksha tithe asalyacha ani te sarva anubhavtey asa bhaas hot hota. Milan that is really magic of your writing...
ReplyDeleteKhup chaan lihilays Milan...agdi rasbharit ani utsahane varnan kelays.
ReplyDeletekasa ahe ki...Chaan lihinara... vachakala chaan anubhav deun jato...tasach tuzya babtit ahe... Je tu swataha anubhavtes toch anubhav tu tuzya likhanane vachakan paryant pohochavtes. Ashich lihit raha.
Very well narrated
ReplyDeleteEnjoyed watching the show on TV n my eyes were searching for you .
khrach sagle boltat tasech vattey ki hey vachtana ase vattey ki amhi suddha tithe ahot ekun ek shbd lihun kadhla ahe tumhi mastch lihile ahe...... sagle kase lakshat rahte evdhe ekun ek shabd anubhav .......mast ani mahesh kale khup sundar vyaktimatv ahe khup tyanche bolne hi tyanycha ganya sarkhe sundar ahe mala khup avdatat mast gatat mahesh kale...... milan tai khup sundar abhubhav lihun kadhla ahat tumhi................thanks hey amhala vachanatun anubhavnyat ale.....
ReplyDelete