संदिती
आमची मैत्री नेमकी कशी आणि कधी झाली ते आठवत नाही. पण दहावीत असताना ती माझ्या मागच्या बेंचवर बसायची. शाळेत जाता येताना ही आम्ही जास्त कधी एकत्र नासायचो. पण दहावीच्या त्या वर्षात आम्ही एकत्र आलो. आमच्या दोघींची कॉलेज वेगवेगळी होती पण आम्ही कायम एकत्र असायचो. माझा एक दादा आम्हाला " चंगू मंगू " म्हणायचा. कॉलेज ती ५ वर्ष . दिवसातून एकदा तरी आम्ही भेटायचोच. सकाळी किंवा संध्याकाळी . माझ्या दिवसभराच्या गमती जमती कधी तिला सांगते असे व्हायचे. बऱ्याच वेळा माझा संध्याकाळचा चहा तिच्याच घरी असायचा. तिच्या आई साठी हि मी घरातली चौथे अपत्य झाले होते. तिच्या घरी २-३ तास गप्पा मारल्यावर ती मला खाली सोडायला यायची मग तिथे परत तासभर गप्पा. मग थांब तुला थोडे पुढे सोडायला येते म्हणून ती घरपर्यंत यायची. मग मी परत तिला अर्ध्या रस्तात सोडायला जायचे. जेव्हा कुठे बाहेर जाऊन आलो कि हे चक्र उलट असायचे मी तिला सोडायला जायचे. त्या जीवदानी रोड ला हि आमच्या सगळ्या गप्पा पाठ असतील इतका वेळ आम्ही रस्त्यात गप्पा मारायचो. माझी आई मला नेहमी रागवायची कि तुमच्या गप्पा कधी संपणारच नाही म्हणून. पण तिची आई मात्र कधी रागावलेली मला आठवत नाही. आम्ही ना जेव्हा एकमेकांना बाय म्हणताना ना दोन बोटे जुळवून मग शेक हॅन्ड करतात तसे करायचो, म्हणजे आता फायनल बाय असे पण त्या नंतर हि आमच्या गप्पा चालूच राहायच्या. असे निदान ३-४ वेळा म्हणायचो कि " ए , आता हे फायनल हा!" पण ते फक्त बोलण्यापुरताच. माझा दादा मला म्हणायचं अरे झाले ३ वेळा जा आता. आम्ही एकमेकींच्या इतक्या जवळ होतो तरी कधी आम्ही एकमेकींच्या घरी राहायला गेलो नाही. जे काही असेल ते रात्री ८.३० पर्यंत. मग दुसऱ्या दिवशी.
माझ्या आयुष्यातली एकही घटना किंवा गोष्ट नाही जी तिला माहित नाही. माझी सगळी सीक्रेट तिला माहित आहेत आणि तिची मला.माझे पहिले प्रेम, पहिली नोकरी, पहिला पगार, माझ्या सगळ्या आवडी निवडी अशी एकही गोष्ट नाही जी तिला माहित नाही. ज्यावेळी मी अगदी बावळट, दोन वेण्या घालणारी , कुणाच्याही खिजगणतीत नसणारी होते ना तेव्हापासून तिला मात्र माझ्यावर काहीतरी वेगळाच आत्मविश्वास होता. तेव्हा हि ती माझे नेहमीच कौतुक करायची. माझी एकूण परिस्थिती त्यातून मी केलेला स्ट्रगल सगळ्याची ती साक्षीदार आहे.
आम्ही दोघी सोबत अर्धी मुंबई भटकलो आहोत. सिद्धिविनायक, महालक्ष्मी, फॅशन स्ट्रीट. खूप मज्जा करायचो. खूप भटकायचो. फॅशन स्ट्रीट वरून तिला घेतलेले दोन स्कर्ट मला अजूनही आठवतात. आयुष्यात पहिल्यांदा तिने घासाघिस केली असेल. आणि सांगितलेल्या भावापेक्षा कमी भावात कपडे घेऊन आल्यामुळे भलतीच खुश होती ती. एकदा ती पाटकर कॉलेज ला असताना ची गोष्ट. मी तिच्यासोबत तिच्या कॉलेज ला गेले होते मग तिथून थोडी खरेदी करून आम्ही गोरेगावलाच एका हॉटेल मध्ये गेलो. तिथे आम्ही डोसा ऑर्डर केला होता. आणि तो वेटर असा शंकू सारखा भाला मोठा डोसा डिश मध्ये घेऊन आला . मला तो काही काट्याचमच्याने खाता येईना म्हणून आम्ही तो हाताने खायला सुरवात केली. मग लक्षात आले कि समोरच्या टेबल वर बसलेली दोन मुले आमची ती त्रेधातिरपीट बघून हसत होते. इतके लाजल्यासारखे झाले. आम्ही पटापट तो डोसा संपवून बाहेर आलो. आणि वेड्यासारख्या हसत होतो. त्या मुलांना घाबरून असे बाहेर येण्यावर आम्हाला आमचेच हसू येत होते.
अजून एक प्रसंग आहे जो तिला आठवत नसेल. एकदा तिला दिवाळीला दोन ड्रेस मिळाले होते तेव्हा तिने ते दोन्ही ड्रेस मला दिले होते कारण होते तिला ते आवडले नव्हते. पण खरे कारण होते कि त्या वेळी माझ्याकडे नवीन ड्रेस नव्हता हे तिला माहित होते म्हणून तिने मला ते ड्रेस दिले होते.
त्याकाळात एकत्र असणाऱ्या आम्ही तिच्या लग्नानंतर खूप दूर झालो होतो. मनाने नाही तर फक्त शरीराने. कितीतरी वर्षे आमचा एकमेकांशी अजिबात कॉन्टॅक्ट नव्हता. साधे फोनवर बोलणेही झाले नाही आमचे. पण तरीही जेव्हा तिच्या बाळाला बघायला आम्ही गेलो होतो असे वाटलेच नाही कि इतकी वर्षे आम्ही लांब होतो. ती माझ्यावर कधी रागावली नाही कि मी तिला फोन केला नाही कि सगळीकडे भटकते पण तिला भेटायला गेले नाही. कसली म्हणून तक्रार नसते तिची. आताही तिला भेटायला येते म्हणून कितीतरी वेळा मी जात नाही पण ती गेल्यावर मागचे कधीच बोलून दाखवत नाही.
मला तिच्या लग्नाला ही जाता आले नव्हते पण तिच्या साखरपुड्याची मेहंदी मी काढली होती.
मला तिच्या लग्नाला ही जाता आले नव्हते पण तिच्या साखरपुड्याची मेहंदी मी काढली होती.
मला तिच्या बोलण्याची पद्धत जाम भारी वाटते म्हणजे मी एखादी गोष्ट तिला सांगितली नसेल आणि म्हटले कि अग बोलले होते तुला तर तिचे उत्तर असणार " साली , नालायक कधी बोललीस मला ? हे मला माहीतच नाही " आणि एखादे चांगले काम केले तर म्हणेल " मेले , काय काय उद्योग करत असतेस." आता माझ्या भटकंती करण्यावरून मला नवीन नाव ठेवलेय " भिंगरी" . ती काही बोलली ना तरी मला राग नाही येत. तिच्या शिव्याहि (नॉर्मल) गोड वाटतात मला. कारण त्यात तिचे प्रेम असते.
संदिती विषयी एक गोष्ट कदाचित जास्त कुणाला माहीत नाहीये ती म्हणजे ती खूप छान गाते. शाळेत असताना " शिशा हो या दिल हो " हे गाणे तिच्या कडून खूप वेळा ऐकले आहे. आता बहुतेक गाणे सोडलय तिने. ज्या वेळी माझ्या चपात्या म्हंजे देशाचे नकाशे असायचे तेव्हा तिच्या चपात्या अगदी गोल गोल असायच्या. तिच्या हाताचा स्वयंपाक हि अप्रतिमच. तिच्या आईच्या हाताची चव तिच्या हातात उतरली आहे.
मला तिच्याबद्दल एक खूप वेगळंच फीलिंग आहे. खूप खंबीर , सहनशील आहे ती. असे म्हणतात की बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म पण हीचा तीसरा जन्म होता तो. बाळंतपणाच्या वेळी झालेले ट्यूमर चे ऑपेशन, त्यातून आलेले पॅरॅलीसिस पण. बाळापासून ८-१० दिवस लांब ठेवले होते तिला. पण या सगळ्यावर मात करून जिद्दीने उभी राहिली ती. . खरे तर युग मुळे तिला पुनर्जन्म मिळाला. तीन महिन्यांच्या युग ला घेऊन जेव्हा ती विरार ला आली होती मी आणि दीपाली तिला बघायला गेलो होतो. खूप अशक्त दिसत होती पण तरीही सगळे करत होती. तिच्या माने वरचा तो ऑपेशन चा कट पाहून काळजात एक चमक उठून गेली. तिच्या शारीरिक त्रासाचे दुःख तर होतेच पण त्यापेक्षा जास्त मनात सल होती की माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणींच्या गरजेच्या वेळी मी तिच्या जवळ तर नव्हतेच पण मला काही माहिती ही नव्हते. ज्या वेळी ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा माधवी तिला बघून अली होती. आणि आम्ही तिला जास्त फ़ोन करून तिला त्रास देऊ नका असे स्पष्ट बजावले होते. त्यावेळी माधवी मैत्रीण कमी आणि डॉक्टर जास्त होती. त्यामुळे तिचे ते म्हणणे आम्ही निमूटपणे ऐकले होते. आता हि ती पडली तिच्या पायात रॉड टाकावा लागला पण त्याही अस्वस्थेत तिचे काम करणे काही थांबले नाही. दोन -तीन महिन्यातच ती व्यवस्थित चालायला लागली. तिच्या या जिद्दीला मनापासून सलाम. सगळी दुखणी सहन करून तिच्या चेहऱयावर सतत एक स्माईल असते. देवाने तिला भरपूर बळ दिले आहे.
असे म्हणतात ना की सगळ्या
जगाने पाठ फिरवली तरी अशी एक व्यक्ती असते जी आपल्या सोबत राहते आणि मी
खात्रीने सांगते की माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती म्हणजे संदिती. ती
माझ्यावर ओरडेल, रागावेल पण मला एकटे पडणार नाही. माझी चूक असली तरी ती
आधी ती मी का केली ते समजून घेईल. पण मी चुकले म्हणून मला वाळीत टाकणार नाही. कारण माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती कि तेव्हा ती एकटीच माझ्या बाजूने बोलली होती.
माझ्या आयुष्यातली संदिती अशी एकमेव व्यक्ती असेल जिच्या विषयी मी कधीच काहीच वाईट बोलले नसेन अगदी तिच्या पाठीमागे हि नाही . तिच्यातल्या उणीवा मला कधी जाणवल्याचं नाहीत किंवा मला त्या जाणून घ्यायची इच्छा झाली नाही. आम्ही कधी भांडलो नाही , तिने मला कधीच रडवले नाही आणि मी तिच्या समोर कधी रडले नाही. पण आज लिहिताना मात्र माझ्या डोळ्यात पाणी आहे कारण देवाची मी खूप खूप आभारी आहे मी त्याने मला पूर्णपणे समजून घेणारी मैत्रीण दिली. इतके असूनही आता जेव्हा ती विरार ला आलेय तर मी विरार सोडून गेलेय. मला तिच्यासाठी काहीच करता येत नाही हि गोष्ट मनाला सारखी खटकत राहते.
माझा हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्या बऱ्याच जवळच्या व्यक्तींची मने
दुखावली असतील, तुम्ही सगळेच माझ्या जवळचे आहात पण कदाचित जी नाळ संदितीशी
जोडली गेली ती कुणाशीही जोडली नाही जाणार. तिचे आणि माझे नाते म्हणजे दुधात मिसळलेल्या साखरेसारखे आहे कधीही वेगळे न होणारे.
Mast re, I was unaware about many things...
ReplyDeleteBane chaahe dushman zamana tumhara... Salaamat rahe dostana tumhara.... 👍khupp sunder lihile ahes... As. Usual
ReplyDeleteKhup chan Milan. Mast lihile ahes . Malahi baryach vhya gosti navin hotya.. Hats off to your friendship ....
ReplyDeleteNicely written. I know Sanditi since childhood but now we know her better. A real hero, she is...
ReplyDeleteVery good Milan. Chan lihil ahes. Partekashi tu different types ne close friend ahes bhutek.
ReplyDeleteThanks Milan... Sanditi Tai la samjun ghenari ani tichya barobar nehmi asnari tuch ahes. Ashich tumchi maitri ayushyabhar rahude...Jashi lahan pana pasun me baghat aloy. Khup chaan memory pan ahe tuzi. Tuzya maitrichi garaj tila atta tar khup jasta ahe. Tevha ekmekanchi ashich kalji ghya ani ekatra raha, sath dya. Three cheers for ur friendship.
ReplyDeleteP. S. Note : tula kadachit tine kadhi sangitla nasel ki tumhala jevha gappa marnyat ushir vhaycha tevha tila Aai Babancha orda padaycha.Tumhi gappa marta mhanun navhe tar ushir zala mhanun ani te pan rastyavar ubhe rahun gappa marta mhanun.... "Jya kahi gappa maraychya ahet tya ghari yeun mara" asa Aai Babancha bolna asaycha....hehe
khup chan mast maitrin ahe tumchi.........
ReplyDeleteThe best comments about someone can only be written by best friends only. Thank you for such beautiful comments about your friends. We were together only for a couple of years, but the best time of my life
ReplyDelete