१४ डिसेंबर १९९४ (बुधवार) माझ्या आयुष्यातील कटू दिवसांपैकी एक दिवस. ज्या दिवशी माझी लाडकी आजी आम्हाला सोडून गेली. अजूनही तो दिवस जसाच्या तास आठवतोय .
मला नीट आठवत नाहीये पण सोमवार का मंगळवारी आजीचा फोन आला होता कि आज आजोबांबरोबर चेंबूर स्टेशन ला जाऊन आले नवीन मंगळसूत्र घेतलेय तर तू येऊन बघून जा. पण मी नाही म्हटले म्हणाले "अगं ! रविवारी येते म्हणजे राहायला मिळेल. उद्या आले तर परत सकाळचे कॉलेज ." तिने दोन तीन वेळा परत सांगितले पण मी माझ्या नाही वर ठाम माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे. मग म्हणाली ठीक शनिवारी ये कॉलेज हुन डायरेक्ट. तस माझ्या आजीला दागिन्यांचा सोस नव्हता तिला कसलाच सोस नव्हता खरंतर . खूप साधी भोळी होती. सगळे तिला " बाई" म्हणायचे. आणि आजोबा "इंदू". कधी कधी आम्ही तिला हाक मारायचो " इंदू आजी". आजी आजोबानी खूप लाड केले माझे.
मी F.Y.B.Com ला होते सकाळचे कॉलेज आम्ही ५.२५ ची ट्रेन पकडायचो. त्यादिवशी आमच्या कॉलेज चा पिंक डे होता. मस्त पूर्ण पिंक पंजाबी ड्रेस घालून अगदी तयार होऊन कॉलेज ला गेले. साधारण १०-१०.३० ची वेळ ऑफ पिरियड होता म्हणून आम्ही बाहेर कॉरिडोर मध्ये टाइमपास करत उभे होतो. मी, नमा, सोनाली, आशु, शिल्पा सगळेच. इतक्यात आशु म्हणाला "मिलन तुझी आई आलीय बघ. " मी मागे वळून न बघताच त्याला ओरडले कि "प्लीज अशी काहीतरी मस्करी करू नको". तेवढ्यात अजून कुणीतरी म्हणाले "अरे तुझे भाऊ , बहीण पण आलेत." तेव्हा मात्र मागे पहिले तर खरंच आई , अमोल , शीतल तिघेही आले होते. आईचा चेहरा रडवेला वाटत होता. आई म्हणाली चल निघायचे आहे चेंबूर ला जायचे आहे. मला काही कळेना पण जास्त प्रश्न ना विचारात मी बॅग घेऊन आई बरोबर निघाले. कॉलेज च्या बाहेर आईने टॅक्सी केली. टॅक्सी म्हटल्यावर लक्षात आले कि नक्कीच काहीतरी झालेय वाईट. कारण टॅक्सी ची चंगळ परवडणारी नव्हती त्या काळात. गाडी सुरु झाल्यावर वैतागून आईला विचारले काय झालेय सांग तरी. मग आई म्हणाली कि सकाळी 'जो' अंकल आले होते त्यांनी सांगितले कि आजी गेली. त्या वेळी फोन असला तरी एखाद कुणाकडे तरी. आणि नेमके सगळे फोन बंद होते म्हणून ते चेंबूर हुन विरार ला आले होते. पण मला विश्वास बसत नव्हता कि आजी गेली. दोन दिवस आधी तर बोललो होतो आम्ही. पण 'जो' अंकल खोटे का सांगतील?
तरी एकदा मी आई ला म्हणाले कि तू चुकून आजी ऐकले असेल आजोबा म्हटले असतील ते. कारण आजोबाना दोन अटॅक येऊन गेले होते. पण आई म्हणाली आजीचं गेली. मला तरीही विश्वास बसत नव्हता. आई सारखी रडत होती. मला काही केल्या रडायला येत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डोळ्यातून पाणी येत माझ्या पण त्या वेळी जराही नाही. माझा विश्वासच नव्हता त्या गोष्टीवर. आजीचे असे अचानक जाणे माझ्या पचनी पडत नव्हते. आईचे रडणे सुरु होते , मध्ये मध्ये ती आजीच्या जुन्या आठवणी सांगत होती. त्यात मला ओरडून हि झाली तुला बोलावले होते ना तू गेली का नाहीस. मला कळतंच नव्हते का आई अशी का करतेय? माझा विश्वास नव्हताच बसत काही केल्या. शेवटी आमच्या बिल्डिंग समोर गाडी थांबली. बरीच गर्दी होती खाली. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे दिसत होते. टॅक्सितून उतरल्यावर आई जोरजोरात रडायला लागली. मी मात्र अजूनही शांतच होते. घर कडे जाताना सगळे डोक्यावरून हात फिरवत होते. सगळेच रडत होते मी सोडून. जिने चढून वर गेलो आई धावत आमच्या खोलीत गेली आतली रडारड जास्त जोरात सुरु झाली तरी मी मात्र अजूनही रडत नव्हते. कदाचित त्या वेळी लोकांना वाटले असेल कि जिच्यावर आजीचा सगळ्यात जास्त जीव होता तिला साधे तिच्या जाण्याने रडू हि येऊ नये. पण माझे फक्त मला आणि मलाच माहित होते. मी मान्यांच्या दारात पोचले आणि एकदम आजोबा समोर आले मला जवळ घेऊन म्हणाले " मिनू, तुझी आजी गेली ग" . त्या क्षणी असे वाटले कि पायाखालची जमीन सरकतोय कि काय. आजोबाना घट्ट मिठी मारून मी जोरजोरात रडायला लागले. इतक्यावेळची माझी खोटी अशा संपली होती. खरंच माझी आजी हे जग सोडून गेली होती कायमची. त्या क्षणी वाटले का नाही आले मी ती बोलावत होती तेव्हा. खरंच तिला कळले होते का तिचे मरण? तिची मला भेटायची शेवटची इच्छा हि मी पूर्ण केली नाही. मान्यांचे घर ते आमचे घर जेमतेम १० फुटांचे अंतर पण ते हि १० मैलांसारखे वाटत होते. आजोबानी मला आत नेले. सगळेच जोरजोरात रडायला लागले. म्हणे बघ बाई तुझी लाडकी नातं आलीय. आजीला त्या आराम खुर्चीत बसवले होते. समोर आशा मावशी होती तिची अवस्था तर बघवत नव्हती. काही वेळ वाटले सगळे म्हणत आहेत तसे खरंच मी आलेय म्हणून उठेल का एकदा आजी. मी जाऊन तिच्या जवळ बसले. तिचा हात हातात घेऊन तिची बोटे फोल्ड करायचा प्रयत्न केला. तिच्या हाताला जेव्हा फ्रॅक्चर झाले होते तेव्हा मी अशीच तिची बोटे फोल्ड करायचे आणि मग ती म्हणायची नको ग दुखतंय वाटले कदाचित आताही बोलेल ती. पण नाही सगळे संपले होते.
देवाने तिला हवे तसे मरण दिले होते. चालता फिरता पहिल्याच अटॅक मध्ये ती गेली. कधी कधी देवाचा राग येतो मला किती लवकर नेले माझ्या आजीला. आमचे कुणाचे शिक्षण हि पूर्ण झालेलं पहिले नाही तिला. ताईचा तर लास्ट वर्ष होते. डॉक्टर होणार होती ती. पण म्हणतात ना कि जो माणूस सगळ्यांना आवडतो तो देवालाही आवडतो म्हणून नेले असेल त्याने आजीला. त्यादिवसापासून आज पर्यंत जेव्हा जेव्हा तो दिवस आठवतो डोळ्यात पाणी येते. डोळ्यासमोरून तो दिवस काही जात नाही. आजही १४ डिसेंबर ला सकाळी उठले कि मनात एक भीती दाटते. २३ वर्ष उलटली पण जखम काही सुकत नाही , दरवर्षी तिच्यावरचे खपली निघतेच. आजी गेल्यानंतर कितीतरी वर्ष तिचे अस्तित्व जाणवत होते. चेंबूर हुन निघाले कि मागच्या खिडकीत ती नेहमीच उभी राहून टाटा करायची अगदी आम्ही दिसेनासे होईपर्यंत. खूप वेळा ती तिथे आहे असेच वाटायचे. खालून खेळून आल्यावर मी बाहेरच्या खोलीत बसून राहायचे कि आता आजी आतून चहा घेऊन येईल. पण बराच वेळ झाल्यावर लक्षात यायचे कि आता मागितल्याशिवाय चहा नाही मिळणार. सगळे हातात द्यायची आजी. माझी आवडीचे काही बनवले कि मला ते नेहमी जास्त मिळायचे. शैला मावशी कधी कधी म्हणायची मुलींवर केले नाही तितके प्रेम तुम्ही नाती वर करता. खरेही होते ते. मला कुणी ओरडले तरी आजीला वाईट वाटायचे. मग जवळ घेऊन समजवायची ती. आजही कधी कधी खूप एकटे वाटले कि आजीचं आठवते सगळ्यात आधी, असे वाटते कि तिच्या मांडीत डोके ठेऊन झोपावे. आजी आजोबा दोघेच असे होते कि ज्यांनी निस्वार्थी प्रेम केले. माझ्या चुकांना प्रेमाने पोटात घेणारे. मी कितीही हट्टी , जिद्दी असले तरी मायेने समजावणारे. माझे एकूण एक लाड पुरवणारे.
आम्हाला तिच्यासारखे साधी राहणी , उच्च विचार असे नाही जगाता येणार, तिच्यासारखे सगळ्यांचे सगळेच निरपेक्ष भावनेने नाही करता येणार पण तिच्या सारखे कायम माणसे जोडून राहण्याचा नक्की प्रयत्न करू.
आम्हाला तिच्यासारखे साधी राहणी , उच्च विचार असे नाही जगाता येणार, तिच्यासारखे सगळ्यांचे सगळेच निरपेक्ष भावनेने नाही करता येणार पण तिच्या सारखे कायम माणसे जोडून राहण्याचा नक्की प्रयत्न करू.
आजी खूप आठवण येते ग तुझी ....... .......
ReplyDeleteKhup.. Emotional jhalo mi khup.. Vachtana khupp dole bharun aale... Mi ek varshacha astana majhi aaji geli.. Aajoba tar majhya aai chya lagna adhich gelele.. Tyamule mala doghanche prem nahi milale... Pan tujhya aaji chi gosht vachtana mi janavle te prem.. Khupp have havese asel kharach... Atishay sunder lihile ahes.. As usual.. Pan aaj cha ek touch veglach hota.......
Kharach, aji- ajobanche Prem vegalech asate ... Memory kayam manat rahatat!!!
ReplyDeleteGood article!!!
Khup chan Milan. Vachtana dole bharun aale. Angavar kata ubha rahila sarkan.
ReplyDeleteMinu Vachtana Maze Aaji & Ajoba dolya samor aale, khoop Chan Minu
ReplyDeleteKhup chan, Vachtana dole bharun aale........😞😞
ReplyDelete