
आम्ही विद्यामंदिर , विरार चे १९९२ विद्यार्थी. हल्ली
प्रत्येकाचेच स्नेहसंमेलन होते. सगळेच शाळा कॉलेज चे मित्र मैत्रिणी
भेटतात. आम्ही हि भेटतो अगदी ना चुकता ३ -४ महिन्यातून एकदा. वर्षातून एक
दोनदा पिकनिक ला हि जातो.
पण
वर्षातून एकदा तरी आम्ही असे काहीतरी काम करतो ज्याने आम्हाला आपल्या
समाजांचे ऋण हि फेडता येतात आणि एक मानसिक समाधान हि लाभते. प्रत्येक
वर्षी एकदा तरी आम्ही सगळे मिळून एक डोनेशन फंड काढतो आणि एखादा वृधाश्राम,
किंवा गरजू व्यक्ती, किंवा अनाथाश्रम किंवा जिथे खरंच कुणीतरी काहीतरी
द्यायची गरज आहे अशा ठिकाणी मदत करतो.
ह्या
वर्षी आम्ही वसई मधील एका वृध्दाश्रमाला औषध आणि काही खाण्याचे जिन्नस
दिले. तिथे असलेल्या त्या वृद्ध बायकांना किती आनंद झाला आम्हाला भेटून.
आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांना खाऊ दिला तेव्हा त्यांनी अगदी
आजी सारखे जवळ घेऊन आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. त्यांना कुणीतरी दिवाळी
निम्मित भेटण्यास आले आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
त्यानंतर
आम्ही लोकनारायण जयप्रकाश हॉस्पिटल इथे गेलो. जिथे कुष्ठरोग्यांसाठी
हॉस्पिटल कम केअर सेन्टर मध्ये गेलो. बाहेरून पाहताना वाटले काय असेल इथे ?
पण आत गेल्यावर आम्ही भारावून गेलो. ३५ एकर जागेत डॉ. सामंत आणि त्यांचे
सोबती डॉ. परुळेकर यांनी नंदनवन फुलवले आहे. हॉस्पिटल, शाळा, कॅन्सर पेशंट
साठी वेगळा वॉर्ड, ऑपेरेशन थिएटर , शेती, बायोगॅस प्लांट, वसतिगृह सगळेच.
इथे येणाऱ्या लोकांवर फुकट उपचार केले जातात. तिथे हि आम्ही थोडे जिन्नस व
त्यांना लागणाऱ्या काही उपयोगी वस्तू दिल्या.
आम्ही
जे दिले होते ते १% हि नव्हते. डॉ. सामंत, डॉ. परुळेकर आणि त्या महिलाश्रम
सांभाळणाऱ्या महान लोकांसमोर आपण किती खुजे वाटतो. पण अशा काम करणाऱ्या
लोकांना पाहून आम्हालाही आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा
मिळाली. मनापासून असे वाटते कि आपण जसे आपल्या मजा मस्ती साठी पैसे खर्च
करतो तसे प्रत्येक ग्रुप ने असे जर छोटे मोठे काही केले तर कितीतरी
लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीची दिवाळीही आमच्या "टीम १९९२" ने सार्थकी लावली. आणि अशीच पुढेही आम्हाला जमेल तशी हि सेवा अशीच सुरु ठेव
weldone........"टीम १९९२"........... mastch kam karat ahat tumhi sagle...
ReplyDelete