*मंदार*
खरे तर याच्या विषयी काय आणि किती लिहायचे हा खूप मोठा प्रश्न. आमची मैत्री कधी झाली नीटसे आठवत नाही. पण दहावीच्या सुट्टीत अमितच्या घरी केलेली मजा आठवते आहे. कदाचित तीच आमची पहिली नीट झालेली भेट.
त्यानंतर आमची बऱ्याच वेळा भेट झाली पण ती नुसतीच hi hello पर्यंत मर्यादित होती. मंदार चे घर साने काकूंच्या शेजारी होते त्यामुळे अशा भेटी होत होत्या. पण पुढे हीच मैत्री इतकी घट्ट होईल असे वाटलेच नव्हते.
२००८ मध्ये जेव्हा आमचे पाहिलं गेट टू गेदर झाले तेव्हा आमचे काही जास्त बोलणे झाले नाही सगळेच पहिल्यांदा भेटत होते त्यामुळे प्रत्येकाशी मोजकेच बोलणे झाले. त्यावेळी प्रत्येकाचे फ़ोन नंबर घेतले . पण तरीही २००८ ते २०१० आमचे जास्त काही बोलणे किंवा भेटणे झालेले मला आठवत नाही. २०११ मध्ये जेव्हा त्याच्या नवीन घरी गेलो होतो तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या आणि तेव्हा वाटलं की आपण शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी भेटले पाहिजे आणि तिथून सुरू झाला आमच्या टीम १९९२ चा प्रवास.
कधी कधी मंदार चा खूप राग ही येतो. नुसता बॉसिंग करत असतो. हे कर ते कर नुसत्या ऑर्डर्स देणार. आणि मग त्याचा फॉलो अप . इतक्या वेळा एकच गोष्ट विचारेल की मग मी तर वैतागून सांगते तूच कर ना सगळे. आणि कधी तर असा वागतो की जगात हाच एकटा बिझी आहे बाकी रिकामी. पण तरीही तो आणि मी अगदी मनापासून काम करतो आमच्या ग्रुप साठी. ग्रुप मध्ये कार्यक्रमाचे मेसेज टाकणे , सगळ्यांना आठवण करून देणे बरीच कामे तोच करतो. कधी कल्पना त्याची कृती माझी तर कधी कल्पना माझी कृती त्याची. आता तर आम्ही एकमेकांना इतके ओळखतो की बऱ्याच वेळा त्याच्या आणि माझ्या कल्पना बऱ्याच वेळा सारख्याच होतात.
दाखवताना असे दाखवतो की मी कुठलीही गोष्ट सिरियसली घेत नाही पण तसा हळवा आहे. कुणी आजारी असो किंवा कुणाचे काही झालेले असो याला जायला जमले नाही तरी फोन करून हा नक्की चौकशी करणारच. कधी कधी तो इतका पॅनिक होतो की बस मी आजारी पडले तर कार्यक्रम पुढे धकलूया म्हणत होता. एखादी गोष्ट नाही म्हटली की लगेच जाऊ दे मग सगळे कॅन्सल करू हे उत्तर ठरलेले. इमोशनल ब्लॅक मेल करणे कोणी याच्या कडून शिकावे. पण तरीही एक खूप चांगला, काळजी घेणारा आणि सगळ्यांना जोडून ठेवणारा आहे. मला जास्त अभिमान वाटतो की हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात तो त्याचा आई वडिलांच्या सोबत आहे आणि खूप छान सांभाळून आहे. अर्थात त्यात त्याला त्याच्या बायकोची म्हणजे मनालीची ही तितकीच उत्तम साथ आहे. मुख्य म्हणजे ती आमच्या मध्ये ही अगदी मिसळून जाते. मंदार बद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे त्याने " देहदान" केले आहे आणि आमच्या समोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
२०१४ मध्ये जेव्हा आम्ही सगळ्या शिक्षकांना बोलावून स्नेहसंमेलन करणार होतो तेव्हा काही कारणाने आमच्यात खूप वाद झाले होते . किती तरी दिवस आमचा अबोला ही होता. त्यानंतर जवळपास ६ महिने आम्ही एकमेकांशी नीट बोलतही नव्हतो. असे वाटत होते की कदाचित आता काही परत पूर्वी सारखे होणार नाही. एकमेकांना खूप बोलून सगळे आरोप प्रत्यारोप करून आम्ही मोकळे झालों होतो. पण आमच्या अबोलयाचा परिणाम जेव्हा जाणवायला लागला तेव्हा आम्ही दोघांनीही माघार घेतली. हीच वेळ असते की ज्या वेळेला आपली मैत्रीची भावना आपल्याला सावरते. आणि एका गेट टू गेदर च्या निमित्ताने आम्ही परत बोलायला लागलो. मैत्री च्या परीक्षेत आम्ही शंभर पैकी शंभर गुणांनी पास झालो. अशी तर लुटुपुटूची आमची बरीच भांडणं होतात रागाने कधी मी तर कधी तो ग्रुप ही सोडतो पण ते तेव्हढ्यापुरताच असते. आपल्याला कोणीतरी मस्का मारावा ही निव्वळ भावना. राग वैगरे प्रकार नाही. आमचा ग्रुप जिवंत ठेवण्यामागे मंदार चा खूप मोठा वाटा आहे. सतत काही न काही बोलणे असतेच ग्रुप वर. मी केलेल्या कुठल्याही पोस्ट वर त्याचे कंमेंट नाही असे होतच नाही. मलाही त्याचे काही कंमेंट नाही आले तर चुकल्या सारखे होते. कोणाची फिरकी कशी घ्यायची हे त्याला पक्के ठाऊक आहे. मला तर चिडवून चिडवून बेजार करतो. आता आम्हाला एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करायची इतकी सवय झालीय की त्याने एखादी गोष्ट मला न सांगता दुसऱ्या कुणाकडून कळली तर वाईट वाटते. माझ्याशीच असे नाही तर प्रत्येकाशी त्यांचे संवाद सुरू असतात. पण तरीही कधीतरी सिक्रेट ठेवतोच.
इथे ना एक गंमत सांगावीशी वाटतं अमित ला मंदार ला डिफेकटिव्ह पीस म्हणतो मलाही आधी नवल वाटायचे असे का?? पण त्याची छोटी छोटी १०-११ ऑपरेशन झाली आहेत. काय सहनशीलता ....बापरे. कदाचित त्यामुळे तो अर्धा डॉक्टर झालाय😊😊.
मंदार मध्ये एकच बदल हवा त्यानें थोडे धीर धरायला शिकायला हवे. कधी कधी यामुळे तो आम्हाला सगळ्यांना धारेवर धरतो.
पण तरीही एक चांगला मित्र , भाऊ ,मुलगा वडील आणि नवरा मला वाटतं सगळ्याच भूमिका तो व्यवस्थित पार पडतोय .
जोपर्यंत टीम १९९२ आहे तोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत किंवा जोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत तोपर्यंत टीम १९९२ ची धुरा अशीच सांभाळत राहणार.👍
त्यानंतर आमची बऱ्याच वेळा भेट झाली पण ती नुसतीच hi hello पर्यंत मर्यादित होती. मंदार चे घर साने काकूंच्या शेजारी होते त्यामुळे अशा भेटी होत होत्या. पण पुढे हीच मैत्री इतकी घट्ट होईल असे वाटलेच नव्हते.
२००८ मध्ये जेव्हा आमचे पाहिलं गेट टू गेदर झाले तेव्हा आमचे काही जास्त बोलणे झाले नाही सगळेच पहिल्यांदा भेटत होते त्यामुळे प्रत्येकाशी मोजकेच बोलणे झाले. त्यावेळी प्रत्येकाचे फ़ोन नंबर घेतले . पण तरीही २००८ ते २०१० आमचे जास्त काही बोलणे किंवा भेटणे झालेले मला आठवत नाही. २०११ मध्ये जेव्हा त्याच्या नवीन घरी गेलो होतो तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या आणि तेव्हा वाटलं की आपण शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी भेटले पाहिजे आणि तिथून सुरू झाला आमच्या टीम १९९२ चा प्रवास.
कधी कधी मंदार चा खूप राग ही येतो. नुसता बॉसिंग करत असतो. हे कर ते कर नुसत्या ऑर्डर्स देणार. आणि मग त्याचा फॉलो अप . इतक्या वेळा एकच गोष्ट विचारेल की मग मी तर वैतागून सांगते तूच कर ना सगळे. आणि कधी तर असा वागतो की जगात हाच एकटा बिझी आहे बाकी रिकामी. पण तरीही तो आणि मी अगदी मनापासून काम करतो आमच्या ग्रुप साठी. ग्रुप मध्ये कार्यक्रमाचे मेसेज टाकणे , सगळ्यांना आठवण करून देणे बरीच कामे तोच करतो. कधी कल्पना त्याची कृती माझी तर कधी कल्पना माझी कृती त्याची. आता तर आम्ही एकमेकांना इतके ओळखतो की बऱ्याच वेळा त्याच्या आणि माझ्या कल्पना बऱ्याच वेळा सारख्याच होतात.
दाखवताना असे दाखवतो की मी कुठलीही गोष्ट सिरियसली घेत नाही पण तसा हळवा आहे. कुणी आजारी असो किंवा कुणाचे काही झालेले असो याला जायला जमले नाही तरी फोन करून हा नक्की चौकशी करणारच. कधी कधी तो इतका पॅनिक होतो की बस मी आजारी पडले तर कार्यक्रम पुढे धकलूया म्हणत होता. एखादी गोष्ट नाही म्हटली की लगेच जाऊ दे मग सगळे कॅन्सल करू हे उत्तर ठरलेले. इमोशनल ब्लॅक मेल करणे कोणी याच्या कडून शिकावे. पण तरीही एक खूप चांगला, काळजी घेणारा आणि सगळ्यांना जोडून ठेवणारा आहे. मला जास्त अभिमान वाटतो की हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात तो त्याचा आई वडिलांच्या सोबत आहे आणि खूप छान सांभाळून आहे. अर्थात त्यात त्याला त्याच्या बायकोची म्हणजे मनालीची ही तितकीच उत्तम साथ आहे. मुख्य म्हणजे ती आमच्या मध्ये ही अगदी मिसळून जाते. मंदार बद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे त्याने " देहदान" केले आहे आणि आमच्या समोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
२०१४ मध्ये जेव्हा आम्ही सगळ्या शिक्षकांना बोलावून स्नेहसंमेलन करणार होतो तेव्हा काही कारणाने आमच्यात खूप वाद झाले होते . किती तरी दिवस आमचा अबोला ही होता. त्यानंतर जवळपास ६ महिने आम्ही एकमेकांशी नीट बोलतही नव्हतो. असे वाटत होते की कदाचित आता काही परत पूर्वी सारखे होणार नाही. एकमेकांना खूप बोलून सगळे आरोप प्रत्यारोप करून आम्ही मोकळे झालों होतो. पण आमच्या अबोलयाचा परिणाम जेव्हा जाणवायला लागला तेव्हा आम्ही दोघांनीही माघार घेतली. हीच वेळ असते की ज्या वेळेला आपली मैत्रीची भावना आपल्याला सावरते. आणि एका गेट टू गेदर च्या निमित्ताने आम्ही परत बोलायला लागलो. मैत्री च्या परीक्षेत आम्ही शंभर पैकी शंभर गुणांनी पास झालो. अशी तर लुटुपुटूची आमची बरीच भांडणं होतात रागाने कधी मी तर कधी तो ग्रुप ही सोडतो पण ते तेव्हढ्यापुरताच असते. आपल्याला कोणीतरी मस्का मारावा ही निव्वळ भावना. राग वैगरे प्रकार नाही. आमचा ग्रुप जिवंत ठेवण्यामागे मंदार चा खूप मोठा वाटा आहे. सतत काही न काही बोलणे असतेच ग्रुप वर. मी केलेल्या कुठल्याही पोस्ट वर त्याचे कंमेंट नाही असे होतच नाही. मलाही त्याचे काही कंमेंट नाही आले तर चुकल्या सारखे होते. कोणाची फिरकी कशी घ्यायची हे त्याला पक्के ठाऊक आहे. मला तर चिडवून चिडवून बेजार करतो. आता आम्हाला एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करायची इतकी सवय झालीय की त्याने एखादी गोष्ट मला न सांगता दुसऱ्या कुणाकडून कळली तर वाईट वाटते. माझ्याशीच असे नाही तर प्रत्येकाशी त्यांचे संवाद सुरू असतात. पण तरीही कधीतरी सिक्रेट ठेवतोच.
इथे ना एक गंमत सांगावीशी वाटतं अमित ला मंदार ला डिफेकटिव्ह पीस म्हणतो मलाही आधी नवल वाटायचे असे का?? पण त्याची छोटी छोटी १०-११ ऑपरेशन झाली आहेत. काय सहनशीलता ....बापरे. कदाचित त्यामुळे तो अर्धा डॉक्टर झालाय😊😊.
मंदार मध्ये एकच बदल हवा त्यानें थोडे धीर धरायला शिकायला हवे. कधी कधी यामुळे तो आम्हाला सगळ्यांना धारेवर धरतो.
पण तरीही एक चांगला मित्र , भाऊ ,मुलगा वडील आणि नवरा मला वाटतं सगळ्याच भूमिका तो व्यवस्थित पार पडतोय .
जोपर्यंत टीम १९९२ आहे तोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत किंवा जोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत तोपर्यंत टीम १९९२ ची धुरा अशीच सांभाळत राहणार.👍