आपण कितीही पुढारलो ना तरी स्त्री पुरुष हा भेद आपल्या मधून जाणे फार कठीण आहे. जाईल पण अजून बरीच वर्ष लागतील त्या गोष्टीला. आताही बघितले तर स्त्रीभृण हत्या थांबण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, किती जनजागृती केली जाते तरीही हे प्रमाण काही कमी होत नाही. असे पाहायला गेलो तर टीव्ही मालिकांचा आपल्या आयुष्यावर किती तरी मोठा पगडा असतो . पण त्यातल्या वाईट गोष्टी पटकन घेतल्या जातात. पण त्याच मालिकांमध्ये मुलगी झाली म्हणून आनंद साजरा करणे हे मात्र बरेच जण नाक मुरडून पाहत असतील. मी मेल्यावर मुलगाच मला अग्नी देणार अशीच धोरणा साधारणपणे सगळी कडे आहे. पण आज प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली मुलगी आपल्या आई बाबाना अग्नी देऊ शकत नाही का ? मधली आहे म्हणून मुलीने अग्नी द्यायचा नाही तोच जर दोन बहिणींच्या मध्ये मुलगा असता तर त्या मधल्या मुलाने अग्नी दिलेला चालतो. पण आयुष्यभर सांभाळणाऱ्या मुलीने नाही. किती विचित्र पद्धती आहेत ना आपल्याकडे?
अजूनही बाई म्हटली कि ती अबला च असाच गृह केलेला असतो. आजही बलात्काराच्या , छेडछाडीच्या कितीतरी घटना आपण वाचतो ऐकतो. यात प्रत्येक वेळी एक स्त्रीच असते जी छळली जाते. आतापर्यन्त आपण अशा किती घटना ऐकल्या आहेत कि ज्यात ४-५ मुलींनी मिळून एका मुलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला? किंवा २-३ टारगट मुलींनी एखाद्या मुलाची छेड काढली ? नाही !!!!! अशी एकही घटना आपल्या ऐकिवात नसते. ज्या स्त्रीच्या उदरातून तुम्ही जन्म घेता तिचाच विनयभंग करताना शरम नाही वाटत? पुरुषांना वाटत स्त्री बद्दल आकर्षण तसे स्त्री ला नाही वाटत? पण ती तिच्या मर्यादा ओळखून असते.
स्त्री ला सगळीकडेच बंधनात ठेवण्याचा प्रयत्न असतो. एखादा पुरुष कामानिमित्त ऑफिस मध्ये थांबला तर तो कामसू त्याची कामा प्रति श्रद्धा आणि तेच जर एखादी बाई थांबली तर हिला काही घरदार नाहीच नुसते कामाचे नाटक करत असते . आणि नाही थांबली तर हिलाच का एकटीला घरदार आम्ही काय रस्त्यावर पडलोय अशी धारणा. पुरुष अर्ध्या चड्डीत कुठेही फिरू शकतो, उधडाबंब राहू शकतो. तेच जर एखाद्या मुलीने छोटे कपडे घातले तर तिला पाहून यांच्या नको त्या भावना जागृत होतात. आणि मग अगदी आशाळभूत नजरेने तिचे निरीक्षण केले जाते. मग याना ना स्वतःच्या वयाचे भान असते ना लाज असते. हेच स्वभावात हि एखादा पुरुष जर १० बायकांशी बोलत असेल तर किती मनमिळावू, किंवा कोणी त्याच्याशी बोलत असेल तर त्याचे व्यक्तिमत्वच किती छान कि सगळ्यांना हवासा वाटतो. पण हेच जर त्या जागी एखादी बाई असेल तर ती ना तसलीच आहे सतत पुरुषांमध्ये असते. काही लाज शरम नाही तिला. जरा मर्यादा ठेवून वागायचे सगळ्यांशीच काय ते गोड गोड बोलायचे. आणि त्यातही मग बऱ्याच जणांचा ग्रह असा होतो कि हि काय आपलीच आहे. आणि तिच्याशी वाटेल तसे वागायला मोकळे. तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून ती आपल्याशी चांगली वागते नाही हा विचार यांच्या डोक्यात येतच नाही. आणि मग ती त्याच्याशी अशी वागते मग माझ्याशी का नाही म्हणून तिला छळायला हि तयार. एखाद्या पुरुषाचे जर लग्नानंतर संबंध असतील तरी बऱ्याच वेळा पत्नीला ते स्वीकारावे लागतात . पण याच गोष्टीचा स्त्रीने विचार करणे हि पाप.
इतकंच कशाला तर दुकानातून समान घेतल्यावर उरलेले पैसे देताना काही लोक चावट स्पर्श करायला ही मागे पुढे पाहत नाहीत. रस्त्याने चालताना हाताचा कोपरा मुद्दाम बाहेर काढून स्पर्शसुख घेणाऱ्यांची ही कमी नाही. बाई जरा सुंदर असली की यांचा लाळ घोटेपणा सुरू. सगळ्या बाजूने नुसत्या हापापलेल्या नजरा. एखाद्या स्त्री ला मदत केली की तिच्याकडून वेगळ्याच प्रकारच्या परतफेडीची अपेक्ष् करणारे लोकही कमी नाहीत. अशाच आंबटशौकीनां मुळे स्त्री ला नको त्या व्यवसायात ढकलले जाते.
इतकंच कशाला तर दुकानातून समान घेतल्यावर उरलेले पैसे देताना काही लोक चावट स्पर्श करायला ही मागे पुढे पाहत नाहीत. रस्त्याने चालताना हाताचा कोपरा मुद्दाम बाहेर काढून स्पर्शसुख घेणाऱ्यांची ही कमी नाही. बाई जरा सुंदर असली की यांचा लाळ घोटेपणा सुरू. सगळ्या बाजूने नुसत्या हापापलेल्या नजरा. एखाद्या स्त्री ला मदत केली की तिच्याकडून वेगळ्याच प्रकारच्या परतफेडीची अपेक्ष् करणारे लोकही कमी नाहीत. अशाच आंबटशौकीनां मुळे स्त्री ला नको त्या व्यवसायात ढकलले जाते.
कुठल्याही नात्यामध्ये सहनही स्त्रीलाच करावे लागते. प्रत्येकाला प्रेयसी मॉडर्न आणि बायको मात्र साडीतलीच हवी असते. लग्न आधी तिचे काही असल्यास ह्यांना त्रास का तर स्त्री च्या व्हर्जिनिटी चा पुरावा असतो. मग तुमचे काय ? हे दहा जणींना फिरवून नामानिराळे. यांच्या व्हर्जिनिटीचा पुरावा काय? तिने मात्र नवऱ्याला असेल तसे स्वीकारायचे. आणि स्वतः मात्र संशयी नवऱ्याचा आयुष्यभर मर खायचा. नवऱ्याचे व्यसनही हे रोजचेच आहे म्हणून सोडून द्यायचे. तिला हि हजार त्रास असतात पण तिने व्यसन करणे पाप. विवाहित स्त्री ने परपुरुषांशी बोलणे हि चालत नाही आपल्याकडे. बायको असो कि प्रेयसी प्रत्येकाला ती आपली खाजगी मालमत्ता वाटते. तिने आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाशी हसून बोलणे, जवळीक साधणे याना नकोसे असते. याना मात्र कुणाशीही कसेही वागायचा परवाना मिळालेला असतो. काही वेळा तर असे असते की एकाने तिला नाकारले तर दुसरा दिला आपुलकी चा खांदा द्यायला तयार जसे तिचे प्रेम म्हणजे बस ची सीट एक जण उठले की दुसरा बसायला तयार. तिच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारे ही कमी नाहीत.
आज किती तरी ठिकाणी फक्त एक स्त्री आहे म्हणून तिच्या बोलण्याला महत्व दिले जात नाही. हे काम बाईने होणार नाही म्हणून तिला मागे टाकले जाते. आज सगळ्या ठिकाणी आपला ठसा उमटवून पण स्त्री नेहमी उपेक्षितच असते. प्रत्येक पुरुष वाईट असतो असे नाही पण समाजातले ७५% लोकांची विचारधारणा स्त्री बद्दल सारखीच असते.
एकच सांगणे आहे कि स्त्री ला एक वस्तू म्हणून बघणे सोडून द्या . तिचा आदर करा. तिला मुक्तपणे जगू द्या. तिच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढणे सोडा. तिला तिची स्पेस द्या. ती लक्ष्मी आहे तिला तसेच तेव्हा. तिने जर कडकलक्ष्मी चे रूप धारण केले तर मग तिच्यापासून तुमचे रक्षण कुणीच नाही करू शकत.
Khupp chhan mandlayes ha vishay..mast.. bursatlelya mansiktetun jevha purn pane purush samaj baher padel tevhach kharya arthane ..stri swatantr hoil...nahitar apan kiti hi pudharlelyachya gamjaa marlya tari...stri hi kayam partantryatach... mast lihile ahes.. nusta awreness kiti karaycha...ammalbajavni mahatvachi ahe
ReplyDelete
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे
अतिशय सुंदर.........संस्कृतिच्या नावाने गले काढणारयानाच .... संस्कृति व विकृति मधला फरक कलत नाही.... संस्कृतिच्या नावाँने कोकालनारी लोकच विकृत मनोवृत्तिचि अस्तात , फ़क़त ते त्याला संस्कृति असा गोंडस नाव देतात.
ReplyDeleteSunder ani bold vishay changla padhatine hatyla ahes. Khup chan.
ReplyDeleteShrikant Bhagwat
Very true... This is reality..
ReplyDeleteज्वलंत विषय आहे हा एक तर स्त्री ने स्वत:हाच या विषयी जागरुक रहाणे गरजेचे आहे आणी त्याच बरोबर समाजाने पण विक्रुत मानसीकता बदलण्याची गरज आहे
ReplyDeleteExcellent, very well drafted
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletekhup chan mast lihile ahe ek ek word agdi barober ahe....
ReplyDelete