Thursday, 20 July 2017

स्त्री

आपण कितीही पुढारलो ना तरी स्त्री पुरुष हा भेद आपल्या मधून जाणे फार कठीण आहे. जाईल पण अजून बरीच वर्ष लागतील त्या गोष्टीला. आताही बघितले तर स्त्रीभृण हत्या थांबण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, किती जनजागृती केली जाते तरीही हे प्रमाण काही कमी होत नाही. असे पाहायला गेलो तर टीव्ही मालिकांचा आपल्या आयुष्यावर किती तरी मोठा पगडा असतो . पण त्यातल्या वाईट गोष्टी पटकन घेतल्या जातात. पण त्याच मालिकांमध्ये मुलगी झाली म्हणून आनंद साजरा करणे हे मात्र बरेच जण नाक मुरडून पाहत असतील. मी मेल्यावर मुलगाच मला अग्नी देणार अशीच धोरणा साधारणपणे सगळी कडे आहे. पण आज प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली मुलगी आपल्या आई बाबाना अग्नी देऊ शकत नाही का ? मधली आहे म्हणून मुलीने अग्नी द्यायचा नाही तोच जर दोन बहिणींच्या मध्ये मुलगा असता तर त्या मधल्या मुलाने अग्नी दिलेला चालतो. पण आयुष्यभर सांभाळणाऱ्या मुलीने नाही. किती विचित्र पद्धती आहेत ना आपल्याकडे?

अजूनही बाई म्हटली कि ती अबला च असाच गृह केलेला असतो. आजही बलात्काराच्या , छेडछाडीच्या कितीतरी घटना आपण वाचतो ऐकतो. यात प्रत्येक वेळी एक स्त्रीच असते जी छळली  जाते.  आतापर्यन्त आपण अशा किती घटना ऐकल्या आहेत कि ज्यात  ४-५ मुलींनी मिळून एका मुलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला? किंवा २-३ टारगट मुलींनी एखाद्या मुलाची छेड काढली ? नाही !!!!! अशी एकही घटना आपल्या ऐकिवात नसते. ज्या स्त्रीच्या उदरातून तुम्ही जन्म घेता तिचाच विनयभंग करताना शरम नाही वाटत?  पुरुषांना वाटत स्त्री बद्दल आकर्षण तसे स्त्री ला नाही वाटत? पण ती तिच्या मर्यादा ओळखून असते.  

स्त्री ला सगळीकडेच बंधनात ठेवण्याचा प्रयत्न असतो. एखादा पुरुष कामानिमित्त ऑफिस मध्ये थांबला तर तो कामसू त्याची कामा प्रति श्रद्धा आणि तेच जर एखादी बाई थांबली तर हिला काही घरदार नाहीच नुसते कामाचे नाटक करत असते . आणि नाही थांबली तर हिलाच का एकटीला घरदार आम्ही काय रस्त्यावर पडलोय अशी धारणा.  पुरुष अर्ध्या चड्डीत कुठेही फिरू शकतो, उधडाबंब राहू शकतो. तेच जर एखाद्या मुलीने छोटे कपडे घातले तर तिला पाहून यांच्या नको त्या भावना जागृत होतात. आणि मग अगदी आशाळभूत नजरेने तिचे निरीक्षण केले जाते. मग याना ना स्वतःच्या वयाचे भान असते ना लाज असते.  हेच स्वभावात हि एखादा पुरुष जर १० बायकांशी बोलत असेल तर किती मनमिळावू, किंवा कोणी त्याच्याशी बोलत असेल तर त्याचे व्यक्तिमत्वच किती छान कि सगळ्यांना हवासा वाटतो. पण हेच जर त्या जागी एखादी बाई असेल तर ती ना तसलीच आहे सतत पुरुषांमध्ये असते. काही लाज शरम नाही तिला. जरा मर्यादा ठेवून वागायचे सगळ्यांशीच काय ते गोड गोड बोलायचे.  आणि त्यातही मग बऱ्याच जणांचा ग्रह असा होतो कि हि काय आपलीच आहे. आणि तिच्याशी वाटेल तसे वागायला मोकळे. तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून ती आपल्याशी चांगली वागते नाही  हा विचार यांच्या डोक्यात येतच नाही. आणि मग ती त्याच्याशी अशी वागते मग माझ्याशी का नाही म्हणून तिला छळायला  हि तयार. एखाद्या पुरुषाचे जर लग्नानंतर संबंध असतील तरी बऱ्याच वेळा पत्नीला ते स्वीकारावे लागतात . पण याच गोष्टीचा स्त्रीने विचार करणे हि पाप.

इतकंच कशाला तर दुकानातून समान घेतल्यावर उरलेले पैसे देताना काही लोक चावट स्पर्श करायला ही मागे पुढे पाहत नाहीत. रस्त्याने चालताना हाताचा कोपरा मुद्दाम बाहेर काढून स्पर्शसुख घेणाऱ्यांची  ही कमी नाही. बाई जरा सुंदर असली की यांचा लाळ घोटेपणा सुरू. सगळ्या बाजूने नुसत्या हापापलेल्या नजरा. एखाद्या स्त्री ला मदत केली की तिच्याकडून वेगळ्याच प्रकारच्या परतफेडीची अपेक्ष् करणारे लोकही कमी नाहीत. अशाच आंबटशौकीनां मुळे स्त्री ला नको त्या व्यवसायात ढकलले जाते.

कुठल्याही नात्यामध्ये सहनही स्त्रीलाच करावे लागते. प्रत्येकाला प्रेयसी मॉडर्न आणि बायको मात्र साडीतलीच हवी असते.  लग्न आधी तिचे काही असल्यास ह्यांना त्रास का तर स्त्री च्या व्हर्जिनिटी चा पुरावा असतो. मग तुमचे काय ? हे दहा जणींना फिरवून नामानिराळे. यांच्या व्हर्जिनिटीचा पुरावा काय? तिने मात्र नवऱ्याला असेल तसे स्वीकारायचे. आणि स्वतः मात्र संशयी नवऱ्याचा आयुष्यभर मर खायचा. नवऱ्याचे व्यसनही हे रोजचेच आहे म्हणून सोडून द्यायचे. तिला हि हजार त्रास असतात पण तिने व्यसन करणे पाप. विवाहित स्त्री ने परपुरुषांशी बोलणे हि चालत नाही आपल्याकडे.  बायको असो कि प्रेयसी प्रत्येकाला ती आपली खाजगी मालमत्ता वाटते. तिने आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाशी हसून बोलणे, जवळीक साधणे  याना नकोसे असते. याना मात्र कुणाशीही कसेही वागायचा परवाना मिळालेला असतो. काही वेळा तर असे असते की एकाने तिला नाकारले तर दुसरा दिला आपुलकी चा खांदा द्यायला तयार जसे तिचे प्रेम म्हणजे बस ची सीट एक जण उठले की दुसरा बसायला तयार.  तिच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारे ही कमी नाहीत.

आज किती तरी ठिकाणी फक्त एक स्त्री आहे म्हणून तिच्या बोलण्याला महत्व दिले जात नाही. हे काम बाईने होणार नाही म्हणून तिला मागे टाकले जाते. आज सगळ्या ठिकाणी आपला ठसा उमटवून पण स्त्री नेहमी उपेक्षितच असते.  प्रत्येक पुरुष वाईट असतो असे नाही पण समाजातले ७५% लोकांची विचारधारणा स्त्री बद्दल सारखीच असते. 

एकच सांगणे आहे कि स्त्री ला एक वस्तू म्हणून बघणे सोडून द्या . तिचा आदर करा.  तिला मुक्तपणे जगू द्या. तिच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढणे सोडा. तिला तिची स्पेस द्या. ती लक्ष्मी आहे तिला तसेच तेव्हा. तिने जर  कडकलक्ष्मी चे रूप धारण केले तर मग तिच्यापासून तुमचे रक्षण कुणीच नाही करू शकत. 







Friday, 7 July 2017

प्रिय अंकुश.......

आपल्या प्रिय अभिनेता किंवा अभिनेत्री ला पत्र लिहावे असे बऱ्याच जणांना वाटत , मलाही वाटायचे नेहमी. असाच माझा हा प्रयत्न माझ्या लाडक्या अभिनेता " अंकुश चौधरी" याला पत्र लिहिण्याचा. हे वाचून तुम्हालाही तुमच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण येतील. 


प्रिय अंकुश ,

खूप दिवसापासून इच्छा होती तुला पत्र लिहायची. तशी तुला आतापर्यन्त बऱ्याच जणींनी पत्र लिहिली असतील. खरे तर तुला "अहो जाहो" केले पाहिजे कारण तू सेलिब्रिटी आहेस ना. पण मी तुला "अरेच " म्हणणार कारण तू आम्हाला नेहमी आमच्यातलाच वाटतो. आणि  कदाचित आपण साधारण सारख्याच वयाचे आहोत.

माझ्या आयुष्यातले पहिले नाटक , शिवाजी मंदिर ला पाहायला गेले होते नवीनच नाटक जेमतेम १२-१३ प्रयोग ते नाटक होते " ऑल द बेस्ट". ते नाटक पहिले आणि तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले. तुझे दिसणे , उंची, ऍक्टिंग  सगळेच भारी होते.  त्यानंतर फक्त तुझ्यासाठी म्हणून ते बऱ्याच वेळा पहिले.  बऱ्याच वर्षांनी मराठीत असा देखणा ऍक्टर  आला.त्यानंतर तुझा आलेला एकही सिनेमा मी चुकवला नाही. त्या काळात फार कमी मुली अशा असतील कि ज्यांना तू आवडत नसशील.  त्यावेळी बड्या बॉलीवुड स्टार च्या जोडीने तुझीही पोस्टर्स मुलींनी आपल्या कपाटात लावली असतील.  आणि किती तरी जणींच्या स्वप्नांवरही अधिराज्य केले असशील. 

कधी कोणी विचारले  की तुझा आवडता अभिनेता कोण तर साधारण पणे बॉलीवूड मधल्या एखाद्याचे नाव अपेक्षित असते पण मला कोणी विचारले तर एक क्षणाचाही विलंब न करता माझे उत्तर असते "अंकुश चौधरी".


तुझे प्रत्येक काम छान असते मध्ये काही वेळा त्यात एकसुरीपणा आल्यासारखे वाटत होते पण त्याच वेळी वेगळया धाटणीचे सिनेमे करून तुझी अभिनयक्षमता सिद्ध केलीस. आता तर तुझा अभिनय जास्त परिपक्व वाटतो. तुझ्या बऱ्याच भूमिका सामान्य माणसाला आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. यंदा कर्तव्य आहे मधला राहुल ,मातीच्या चुली मधला विशाल , सावरखेड एक गाव मधला राहुल आणि डबल सीट मधला 'अमू'   असे वाटत कुणीतरी आपल्या च आजूबाजूची ही व्यक्ती आहे. तू साकारलेल्या DSP आणि सत्या , प्रत्येक कॉलेज मध्ये असा कोणीतरी एक सिनिअर असतोच ज्याला अख्ख कॉलेज टरकून असते. आणि आताच तुझा ' ती सध्या काय करते' मधला 'अनूराग' कसला दिसला आहेस तू त्यात एकदम भारी. तुला पाहताना सगळ्यांच आपले जुने प्रेम आठवले असेल. आणि माझ्या सारख्या किती जणींना असे वाटले असेल की 'अरे  यार त्या तन्वी च्या जागी मी असायला हवे होते. ' शेवटच्या त्या गच्ची वरचा सीन पाहताना नकळत डोळ्यात पाणी येते. जत्रा मधल्या "ये गो ये मैना"वर कैती छान नाचाला आहेस. आणि दिसण्याच्या बाबतीत तर तुझी तोडच नाही. दर वेळी ते गाणे पाहताना काळजचा ठोका चुकतोच. मराठीतला रोमँटिक हिरो कोण म्हटले तर पहिले नाव तुझेच येते डोळ्या समोर.  असे कितीतरी सिनेमे आहेत कि ते पाहताना असे वाटते कि " या भूमिकेसाठी अंकुश हवा होता" जास्त मजा अली असती.  

पण नुसते रोमँटिक सिनेमेच नाही तर 'रिंगा रिंगा' ' गैर ' मधले तुझी अँटी हिरो, आणि ' पोरबाजार ' मध्ये तू साकारलेली माहिती निगेटिव्ह भूमिका सगळेच अफलातून.  झकास मधल्या तुझ्या तीन भूमिका किती छान निभावल्यास तू. दगडी चाळ मधला सूर्या  त्या काळी  खरेच अशा चुकीच्या ठिकाणी अडकलेल्या मुलांचे चित्र तू तंतोतंत उभे केलेस आणि चेकमेट मधला विशाल,त्यातही   तुला त्रास दिला म्हणून त्या कै . विनय आपटे चा हि राग यायचा   , ते माझ्या आवडत्या कलाकारांच्या यादीत असले  तरीही .  कुठलेही काम असो तुझी स्टाइल काही वेगळीच. कसे आहे ना आपण सामान्य माणसे पटकन रिलेट करतो सगळ्याला. आणि टीव्ही , सिनेमा म्हणजे आपला सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे.  

कुठल्याही अवॉर्ड च्या वेळी तुझ्या बरोबर  अगदी एखाद्या सिनियर कलाकाराचे नामांकन असेल ना तरी मला वाटते कि हे बक्षीस तुलाच मिळायला हवे. ज्यावेळी तुला सलग ३ वर्षे " महाराष्ट्राचा  स्टाइल आयकॉन " हा पुरस्कार मिळाला ना तेव्हा कसले भारी वाटले होते. कुठल्याही अवॉर्ड फंक्शन च्या वेळी जर तुझे नामांकन असेल  तर मी सतत देवाचा धावा करत असते कि तुलाच अवॉर्ड मिळू दे. जसे क्रिकेट च्या वेळी इतर लोक करत असतील ना तसे.  आभाळमाया, हसा चकटफू मधला साधा मुलगा . महाराष्ट्राचा स्टाइल आयकॉन किती भारी.  मला तर तू हिंदी सिनेमांच्या हीरोंपेक्षा  भारी वाटतोस.  

ज्या वेळी आम्ही कॉलेज ला होतो तेव्हा टीव्ही  आणि थिएटर शिवाय पर्याय नव्हता. एकदा तुझा नाटक व सिनेमा पाहून पोट  भरत नव्हते.  आता काय यू ट्युब वर कधीही बघता येते. तुझा "ती सध्या काय करते" मी १० वेळा तरी पहिला असेल. तुझी कुठलीही मूवी  टीव्ही वर लागली कि आमच्या घरातल्या रिमोट वर फक्त माझेच अधिराज्य असते. ऍडव्हर्टाइज च्या वेळी हि चॅनेल बदलायला देत नाही.  आणि हल्ली तर मी थिएटर मध्ये फक्त मराठी सिनेमेच पहाते . आणि तुझे जवळ जवळ ९०% सिनेमे मी थिएटर लाच पाहिलेत.  कुठल्याही चॅनेल वर जर तू आलास तरी माझी मुलगी ओरडून सांगते " मम्मी अंकुश" आणि मी हातात असेल ते काम सोडून तुला पहायला धावत बाहेर येते. इतकेच काय तर तुझ्या वाढदिवसादिवशी माझा डीपि हि तुझाच फोटो असतो.  वयाला ना सजणारी कृती असते पण काय करणार तुझी जादूच अशी आहे कि बस......... 

तुझ्यावर टीका करणारे लोक हि भेटलेत भरपूर. पण मला असे वाटते जसे एका चांगल्या डॉक्टर चे पण कुणाकुणाला वाईट अनुभव येतात. मग तुला नवे ठेवणारे लोक असणे साहजिक आहे ना. आणि माणूस जितका मोठा आणि प्रसिद्ध तितके त्याचे टीकाकार जास्त.  पण कोणी काही म्हणो तू ज्यांना आवडतो त्यांच्या वर या गोष्टीचा काडीमात्र फरक पडत नाही.  तुला गम्मत सांगू मी एकदा तुझी तुलना एका मोठ्या अभिनेत्याशी केली तर सगळे हसायला लागले मला पण काय करणार माझ्या साठी तू कुठल्याही महान अभिनेत्या पेक्षा कमी नाही ना !!!!!

सगळ्यांची असती ना तशी माझी हि एक इच्छा आहे कि एकदा तरी तुला भेटून तुझ्या सोबत सेल्फी घ्यायचा आहे. अर्थात हे काही शक्य नाही. पण झाले तर जमिनीपासून दोन इंच वर असेन  मी नक्कीच. खरेच तू माझे पहिले "क्रश" आहेस, आणि आवडता अभिनेता हि. अशीच छान छान कामे करत रहा . आणि आमच्यासारख्या तुझ्या चाहत्यांना सतत टीव्ही वर दिसत राहा. 


तुझीच एक चाहती,
मिलन 


इतके सगळे लिहून झालेय तरी  अजूनही वाटतेय " किती सांगायचंय तुला , किती सांगायचंय  तुला  ......... "