Tuesday, 16 May 2017

लेख महाराष्ट्र टाइम्स (मुंबई टाइम्स ) १५. ०५. २०१७

शाळेच्या त्या सोनेरी आठवणी 
० एप्रिल २०१७ आमच्या अ . व. स्मारक विद्यामंदिर , विरार च्या १९९१-१९९२ बॅचचा संस्मरणीय दिवस. शाळा सोडून २५ वर्षे झाली म्हणून आम्ही " टीम १९९२" ने एक छोटेसे स्नेहसंमेलन केले. या वेळी १५-२० नाही तर तब्बल ६० जणांचा यात सहभाग होता. पालघर, नाशिक, कोल्हापूर, कणकवली अशा ठिकाणाहून विद्यार्थीविद्यार्थिनी खास या कार्यक्रमासाठी आले होते. विरार कणेर फाट्याला एका  फार्म हाऊस वर हा कार्यक्रम करण्यात आला.  शाळेत लहान असताना खेळाला जाणारा चमचा लिंबू चा खेळ खेळण्यात आला त्यामुळे आपले आताचे वय विसरून सगळे शाळेच्या वेळेत शिरले. संगीत खुर्ची खेळताना सगळेच शाळेत खेळायचे तसे रडीचा डाव खेळत होते. शाळेत शिक्षक, प्रिंसिपल असणाऱ्या मुली किंवा मोठ्या  कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असणारे हे सगळे शाळेचे मित्र मैत्रिणी आपला हुद्दा , वय विसरून मजा करत होते. शाळेतल्या जुन्या आठवणींना छान उजाळा दिला जात होता. आणि गप्पांची महफिल सजली होती. काही जण शाळा सोडल्यावर प्रथमच भेटले होते त्यामुळे त्यांना किती आणि कुणाकुणाशी बोलू असे झाले होते. शाळेतल्या कटू आठवणी विसरून सगळेच एकमेकांची मस्करी करत होत .  सगळ्यांना या दिवसाची कायम आठवण राहावी म्हणून प्रत्येकाला शाळेचा फोटो आणि तारीख असलेली  एक भेटवस्तू  देण्यात आली . शाळेत आपल्याला बक्षीस मिळाल्यावर होतो तसाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते भेटवस्तू  घेताना दिसत होता. 

ह्या कार्यक्रमासाठी १०-११ जणांनी ३ महिने खूप मेहनत घेतली. हा आपला शाळेचा कार्यक्रम नसून घरचेच कार्य असल्यासारखे सगळे आपापली कामे नेमाने करत होते. सकाळी ९ वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० ला संपला. स्नेहभोजन , करमणुकीचे कार्यक्रम, मजा मस्ती आणि गप्पां यामुळे दिवस कधी सुरु झाला आणि संपला  कळलेच नाही. आणि ५० वर्षपूर्ती च्या वेळीही असेच एक स्नेहसंमेलन करू असा संकल्प आम्ही सगळ्यांनी केला. आणि खरेच तो पर्यंत सगळ्यांना निरोगी आणि सुधृढ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना म्हणजे त्याही वयात आम्ही अशीच मजा करू जशी आता केली. हा दिवस खरंच आठवणीत राहील असाच गेला. 



3 comments: