आनंदवन-एक अभूतपूर्ण हृदयस्पर्शी अनुभव
कुष्ठरोग नाव ऐकले की मनात भीतीपेक्षा आधी किळस येते अशी आपली परिस्थिती आहे. खरेतर हा रोग संसर्गजन्य आहे म्हणून यापेक्षा गेल्या जन्माच्या काहीतरी भीषण पापाची शिक्षा म्हणून झालेला हा रोग अशा लोकांना वाळीत टाकले जाते. "महारोग" हे भीती दायक नाव देऊन त्या भीतीचा पगडा आपल्या मनावर बसलाय. पण खरे तर सगळ्यात कमी संसर्गजन्य असलेला रोग आहे हा. ज्याला हा आजार झाला आहे तो औषध घेत नसेल आणि तुमची प्रतिकार शक्ती खूप कमी असेल तरच होतो हा. आणि कदाचित हा एकमेव असा आजार आहे कि त्याला एक ठराविक वेळच औषध घ्यायची जरुरी आहे. हा आजार वंशपरंपरने येणाराही आजार नाही. पण तरीही या आजाराच्या रुग्णाला वाळीत टाकले जाते. पूर्वी तर अशा रुग्णांना जिवंतपणे गाडले जायचे. अजूनही काही ठिकाणी हे घडतेच आहे. आईवडिलांना जर झाला असेल तर त्यांना आनंदवनात आणून सोडले जायचे आणि मुलांना सांगितले जायचे कि त्यांचे आईवडील वारले. लग्न मोडली जायची. पण याच सगळ्यांचे वडीलांसारखे संगोपन केले त्या वडिलांना आपण ओळखतोच स्वर्गीय. मुरलीधर आमटे अर्थात आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे "बाबा आमटे". याच रुग्णांना घेऊन एका छोट्या गावात त्यांनी नंदनवन फुलवले ते गाव म्हणजे "आनंदवन" . आपल्याकडे स्वयंभू देव असतात इथे देवासारखी स्वयंभू माणसे आहेत. आज ७० वर्षानंतर ही इथे रुग्ण कायमचे राहायला आहेत ही आपल्यातल्या माणुसकीची हार आहे तर आनंदवनातल्या प्रेमाची जीत.
बाबांनंतर ही धुरा म्हणण्यापेक्षा हा वारसा तसाच आपल्या खांद्यावर घेतला ते त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास आमटे यांनी तर हेमलकसा सारख्या दुर्गम भागातल्या आदिवासींना शिक्षण आणि आरोग्य देण्यासाठी उभारलेला प्रकल्प हाती घेतला तो त्यांचे धाकटे पुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी.
आज आपण माझ्या लेखातून फेरफटका मारणार आहोत याच आनंदवनात.
आनंदवनात प्रवेश करतानाच त्याच्या प्रसन्न वातावरणाची झुळूक आपल्याला जाणवायला लागते. जिथे आपली राहायची सोय केलेली आहे तिथे प्रवेश करतानाच छान छान फुलझाडे आहेत. आणि समोरच एक फलक आहे ज्यावर लिहिले आहे "We do not have Wi-Fi., Talk to each other and Pretend it's 1995" आणि खरेच तिथे नाहीच आहे तेच बरे नाहीतर तिथल्या वातावरणाची खरी मजा न अनुभवता आपण त्या मोबाईलच्या कृत्रिम दुनियेतच रमून जाऊ. तिथे दोन्हीबाजूला छोटी छोटी फुलझाडे आहेत. गुलाब, झेंडू, तगर, सदाफुली अशी काही परिचित झाडे हि आहेत. समोर गवताची हिरवळ आहे. पहाटेच्या दवबिंदू पडलेल्या गवतावर चालताना पायाला जो मुलायम स्पर्श होतो तो अनुभवण्यात काही वेगळीच मजा आहे.
आनंदवनात प्रवेश करतानाच त्याच्या प्रसन्न वातावरणाची झुळूक आपल्याला जाणवायला लागते. जिथे आपली राहायची सोय केलेली आहे तिथे प्रवेश करतानाच छान छान फुलझाडे आहेत. आणि समोरच एक फलक आहे ज्यावर लिहिले आहे "We do not have Wi-Fi., Talk to each other and Pretend it's 1995" आणि खरेच तिथे नाहीच आहे तेच बरे नाहीतर तिथल्या वातावरणाची खरी मजा न अनुभवता आपण त्या मोबाईलच्या कृत्रिम दुनियेतच रमून जाऊ. तिथे दोन्हीबाजूला छोटी छोटी फुलझाडे आहेत. गुलाब, झेंडू, तगर, सदाफुली अशी काही परिचित झाडे हि आहेत. समोर गवताची हिरवळ आहे. पहाटेच्या दवबिंदू पडलेल्या गवतावर चालताना पायाला जो मुलायम स्पर्श होतो तो अनुभवण्यात काही वेगळीच मजा आहे.
आनंदवनात एक विभाग आहे "काष्ठशिल्प विभाग " जिथे उन्मळून पडलेली झाडे, टाकाऊ लाकूड यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. तिथे एक लामणदिवा असतो तसे लाकडाचे शोपीस आहे ते एका अखंड लाकडापासून बनविले गेले आहे. हाताच्या पंजाच्या आकाराची एक खुर्ची आहे. तर एक म्हशीचा पुतळा हि तिथे लाकडापासून बनविला गेला आहे. काचेच्या बाटलीत बनविल्या जाणाऱ्या वस्तू हि आहेत.
त्यानंतर येतो तो हस्तकला विभाग यात भेटकार्ड , भिंतीवर लावली जाणारी चित्रे बनवली जातात. पण याचे एक वैशिष्ट्य आहे. यात रंग नाही वापरले जात बरे का !! यात वापरल्या जातात त्या वस्तू म्हणजे केळीच्या झाडाची साले, मक्याच्या कणीसाची साले, भाताचे तूस. सालांचे वेगवेगळ्या रंगछटांचे दोऱ्यासारखे गठ्ठे बनविले जातात.ते हवे त्या आकारात कापून मग ते गोंदामध्ये बुडवून जाडकापडावर असलेल्या नक्षीकामावर चिकटवले जातात. आणि त्यापासून बनविली जातात उत्तम चित्रे. त्यातच दुसरा भाग आहे , त्या भागात टाकाऊ झालेली कपड्यांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. आणि ते वरील प्रमाणेच रंगसंगतीनुसार चिकटवले जातात. त्या कापडाच्या कोलाज मधून तयार होणारी चित्रे फारच अप्रतिम असतात.
एक विभाग आहे बैठका, सतरंजी बनविण्याचा विभाग. इथे प्रथम दोऱ्याला रंग करून आणला जातो. नंतर ते आणलेले दोरे वेगवेगळे केले जातात. त्या दोऱ्यांचे छोटे छोटे रीळ बनविले जातात. मग ते दोरे ४-५ च्या प्रमाणात एकत्र करून त्याचे एकत्रीकरण केले जाते जेणेकरून सतरंजी विणताना दोरे गुंतायला नको. मग त्या मागावर सतरंजी विणली जाते.छोटी सतरंजी विणायला एक तर मोठी सतरंजी विणायला जास्त बायका एकत्र काम करतात.
अजून एक विभाग आहे तो हातमाग जिथे छोटे रुमाल, पंचे, धोतर बनविले जाते. इथे सगळे काम हे हातमागावर चालते. काही हातमाग मॅन्युअल आहेत तर मुंबईची एक मिल बंद झाल्यावर त्यांनी तिथे दिलेल्या काही ऑटोमॅटिक मशीन आहेत. इकडच्या कापडाची गुणवत्ता हि खूप चांगली आहे. हातालाच त्याचा मुलायमपणा जाणवतो.
एके ठिकाणी आपण घरी वापरतो ती पत्र्याची कपाटे बनवली जातात. त्याचा पत्रा इतका जाड असतो कि ती गुणवत्ता आता आपल्याला बाजारात मिळणे शक्य नाही. त्या कपाटाची अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे त्या कपाटाला आरश्यासमोर एक छोटासा जाळीचा खण असतो. म्हणजे आपल्याला आरशात बघताना पटकन लागणाऱ्या गोष्टी आपण तिथे ठेऊ शकतो. तिथेच आनंदवनात वापरले जाणारे हातमाग हि बनवले जातात. तसेच वापरल्या तेलाच्या डब्यांपासून चाळण्या बनविल्या जातात. अजून एक महत्वाची गोष्ट तिथे बनवली जाते ती म्हणजे तिथे लागणाऱ्या व्हील चेअर हि तिथेच बनविल्या जातात. त्यामुळे त्यांची खरी सोय जाणून त्या प्रमाणे त्याचे डिजाईन केले गेले आहे.
आनंदवनात फक्त कुष्ठ रोगीच नाहीत तर दिव्यांग लोकांनाही आश्रय दिला जातो. त्यांच्यासाठी तिथे शाळा चालवली जाते. " संधी निकेतन " मध्ये अशा मुलांना काही प्रकारचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. आणि मग तिथूनच काही जणांना नोकरी साठी संधी उपल्बध करून दिल्या जातात. यात बऱ्याच वेळा अशी मुले असतात ज्यांना त्यांच्या घरच्यांनी हा किंवा हि काही कामाचे नाहीत, खायला एक तोंड जास्त म्हणून नाकारलेले असते. अशीच मुले मग स्वतः कमावून घर हि सांभाळतात. इथे अशा मुलांना फिजिओथेरपी मिळावी म्हणून एक हॉस्पिटल बांधले जात आहे. हे अशा प्रकारचे भारतातले पहिले हॉस्पिटल असेल जे अशा दिव्यांगांना नियमित फिजिओथेरपी देण्यासाठी उभारले जाणार आहे. इतका विचार तर काही लोक आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींसाठी हि करत नाहीत.
एकदा फार पूर्वी जेव्हा या रुग्णांना सिनेमा बघावयास नेले होते तेव्हा त्यांचा सिनेमा पाहून झाल्यावर त्या सिनेमाघरवाल्यानी अख्खे सिनेमाघर धुवून काढले होते. कुष्ठरोग्यांचे गाव म्हणून इथे जास्त कुणी यायला तयार होत नसत. हि सल आमटे कुटुंबियांच्या कायम मनात होती. आणि मग याच दुःखावर उपाय म्हणून उभा राहिला तो "स्वरानंदनवन " ऑर्केस्ट्रा. इथल्या दिव्यांग लोकांमधले, रुग्णामधले कलागुण ओळखून श्री. विकासभाऊ आमटे यांनी त्यांचा स्वतःचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला. इथे वादक, गायक, नृत्य सादर करणारे सगळेच त्यांचेच. या गावात येऊन प्रयोग करायला नकार मिळणाऱ्या याच गावातल्या ऑर्केस्ट्राचे मुंबई पुणे इथे १५ च्या वर प्रयोग झालेत. यातून मिळणार सर्व निधी हा आनंदवनासाठी वापरला जातो. "लोकशाही" लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य असे म्हणतात ..... हीच लोकशाही खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते.
या आनंदवनात एकंदरीत ११ तलाव आहेत. त्यात काही मानव निर्मित आहेत. एक तलाव चिवडा खाता खाता बांधले गेले म्हणून त्याचे नाव " चिवडा तलाव " असे ठेवले आहे. या तलावांमुळे इथे शेतीमध्ये दोन वेळची पिके घेतली जातात. भात शेती सोबत इथे भाज्या, फळे हि पिकवली जातात. इथला अजून एक व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय. इथे गाई म्हशींचे पालन करून येणारे दूध हे विकले जाते. सुरवातीला कुष्ठरोग्यांच्या वसाहतीतले दूध घ्यायचे नाही म्हणून नाकारणारी लोक आता तिथले दूध घ्यायला रांग लावतात. कधी कधी दूध संपून जाते पण रांग नाही. या वरूनच तिथल्या दुधाच्या दर्जाची आपण कल्पना करू शकतो.
इथे पाणीसाठ्याची जशी मानव निर्मित तलावं आहेत. तशी इथे अजून एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. ती म्हणजे इथली डोम च्या आकाराची घरे. हि घरे बांधली जातात ती फक्त विटांनी. विटांची तिरपी चालत ठेऊन हि घरे बांधली जातात. याचे छत हे अर्धवर्तुळाकार असते. त्या वर रंगीत टाईल्स चे तुकडे बसविले जातात. जेणेकरून ऊन त्यावरून परावर्तित होऊन घरातील तापमान बाहेर पेक्षा कमी राहील. या घरामध्ये बाहेरपेक्षा साधारण ५ डिग्री तापमान कमी असते. इथे जराही लाकडाचा वापर केला जात नाही त्यामुळे या घरांमध्ये उंदीर होत नाही. हि संकप्लना आहे आदरणीय श्री. विकासभाऊ आमटे यांची. रुग्णांना उंदीर चावून त्यांना जखम होऊ नये. बाहेरच्या उकाड्याचा त्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून हि खास रचना.
या विभागात पाणी आणि वीज टंचाई आहे हे आपणा सर्वाना माहीतच आहे. त्यामुळे इथे मोठे सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. जेणेकरून फक्त सरकारी विजेवर अवलंबून राहून कामे खोळंबायला नको.
आजपर्यंत आनंदवनातून लाखो कुष्ठरोगी बरे होऊन गेले आहेत. काही जे इथे आले ज्यांना घरच्यांनी नाकारले म्हणून ते अजूनही इथेच आहेत. त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हि आनंदवनाची जबाबदारी आहे. अजूनही इथे रुग्ण येतात. काही निघून जातात काही इथेच राहतात. त्यांच्या साठी इथे एक हॉस्पिटल आहे. सकाळ दुपार इथे रुग्ण तपासले जातात. आजूबाजूच्या गावातूनही रुग्ण इथे तपासणी साठी येतात. आपल्या मुंबई पुण्याकडे सापडणार नाही इतकी स्वच्छता आहे त्या हॉस्पिटल मध्ये. इथे एक हेल्थ ए टी एम मशीन आहे ज्यात आपल्या ३३ चाचण्या करता येतात. डिजिटल एक्सरे ची हि इथे सोय आहे. इथे बरेसचे मेडिकल कॅम्प होतात. ज्यात हजारो रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातात अगदी मोफत.
इथे अजून एक खूप वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे इथले स्वयंपाकघर. इथे एकच सार्वजनिक स्वयंपाक घर आहे. सगळ्यांचा स्वयंपाक हा एकाच ठिकाणी बनतो. इथे कामावर येणाऱ्या बाईला घरच्या स्वयंपाकाची चिंता नसते. तिन्ही वेळचे जेवण हे इथे एकत्रित केले जाते. जे या प्रकल्पात थोडे लांब काम करतात त्यांना डबे पोहचविले जातात. साधारण दीड ते दोन हजार माणसांचा एकत्र स्वयंपाक किती मोठी गोष्ट. याच स्वयंपाकघरात साधारण ८०-९० सिलेंडर लागायचे. पण इथे आता बायोगॅस प्लांट हि उभारण्यात आला आहे. दररोज साधारण ५ टन शेण आणि ३ टन टाकाऊ अन्न यापासून ४०० घन मी. गॅस ची निर्मिती होते. त्यामुळे आता तिथे लागण्याच्या सिलेंडर ची संख्या आता ५ वर आली आहे.
आणि ह्या सगळ्या विभागात काम करणारी माणसे आहेत ती या आजारातून बरे झालेले रुग्ण. आता आजारी असणाऱ्या रुग्णाची सेवा करायला माणसे मिळत नाही म्हणून इथेच बरे झालेल्या रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते मग तेच या रुग्णाचे ड्रेसिंग करणे, त्यांची काळजी घेणे हि कामे करतात. इथे बरे झालेले रुग्णाचं काम करतात म्हणून त्यांच्याकडून जास्त वेळ काम करून घेतले जात नाही. त्यांच्या तब्बेतीचा पुरेपूर विचार करून त्यांचे कामाचे तास आहेत.
आनंदवनात एक जागा आहे जिथे "श्रद्धेय बाबा आमटे आणि साधना ताई " यांची समाधी आहे. आपल्या शरीराचा निसर्गाला उपयोग व्हावा म्हणून बाबांची त्यांना अग्नी देऊ नये अशी इच्छा होती . म्हणून ते गेल्यावर त्यांना एके ठिकाणी पुरले गेले. आणि मेल्यानंतर हि बाबांच्या कुशीतच राहावे म्हणून त्यांच्या शेजारी साधनाताईंनाही त्यांच्या निधनानंतर तिथेच पुरले गेले. यावर कुठलीही समाधी बांधली जाऊ नये अशी बाबांची इच्छा होती म्हणून तिथे एक चौथरा बांधून तिथे निरनिराळ्या प्रकारची फुलझाडे लावली जातात.
त्यासमोरच आहे ते अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरण शिला. सुरवातीला यांना लग्नाचा अधिकार हि नव्हता. साधनाताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो मिळवून दिला. पण त्यांना प्रजननाचा अधिकार नव्हता, का तर मुलाला हि होईल आजार. म्हणून त्यांचे कुटुंबनियोजनाचे ऑपेरेशन करून त्यांचे लग्न लावून दिले जायचे. आणि मग तिथे आलेल्या एखाद्या मुलाला हे जोडपे वाढवत असे. मुलाला पालक मिळत व त्यांची मुलाची इच्छा पूर्ण होत असे आणि एक कुटुंब पूर्णत्वास येत असे . पण पुढे जाऊन सौ. भारती ताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो अधिकार हि मिळवून दिला. यात त्यांना किती जणांशी लढा द्यावा लागला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. त्या वेळी त्या न जन्मलेल्या बाळांची म्हणजेच अनाम मूक कळ्यांची स्मरणशिला. आणि आनंदवन उभारताना नाईलाजाने थोडी वृक्षतोड करावी लागली म्हणून त्यांची आहे अनाम वृक्षांची स्मरणशीला. आपण इथे दुसऱ्याला किती दुखावले तरी माफी मागत नाही, आपला अहंकार जपून ठेवतो. आणि इथे दोष न देणाऱ्या गोष्टींचीही माफी मागितली गेली. किती मोठी गोष्ट शिकवून जातात हि माणसे.
त्या शेजारी बाबांच्या "भारत जोडो" अभियानाची (sea to snow) काही क्षण चित्रे आहेत. बाबांना पाठीचा त्रास होता, त्यामुळे ते एक तर चालत किंवा झोपून राहत. तर या अभियानात त्यांनी ज्या बस ने प्रवास केला ती बस कम अँबुलन्स तिथे उभी आहे.
आनंदवनात एक खूप चांगला नियम आहे इथे माणूस गेल्यावर त्यांच्या नावाने एक वृक्ष लावला जातो आणि त्याचे पालनपोषण केले जाते. लंडन मधल्या एका ख्रिस्ती व्यक्तीने आपल्याला मरणोत्तर आनंदवनात विसावा मिळावा म्हणून स्वतःला अग्नी द्यायची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे त्यांना अग्नी देऊन नंतर त्यांच्या अस्थी आनंदवनात आणून पुरल्या गेल्या. आज त्यांचे हि स्मरण स्थान तेथे आहे.
इथे अजून एक उपक्रम राबवला जातो ज्याचे नाव आहे आनंदवन घन वन प्रकल्प. आपण साधारण ३ फुटावर एक झाड लावतो. पण इथे एक एक फुटावर झाडे लावली जातात. जेणेकरून कमीतकमी जागेत घनदाट जंगल तयार होईल, आणि त्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळेल. जपान मधून आलेल्या मियावाकी यांनी हि कल्पना सुचवली होती. आज आनंदवनातील या प्रकल्पाचे अनुकरण बऱ्याच ठिकाणी केले जाते.
"टाकाऊ पासून टिकाऊ" हि संकल्पना पुरेपूर अनुभवली ती आनंदवनात. कुठलीही गोष्ट वाया न घालवता त्याचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे इथे येऊन बघण्यासारखे आहे. डॉ. विकास भाऊ आमटे यांना डॉक्टर म्हणावे कि इंजिनिअर हा मोठा यक्ष प्रश्न आहे. हुद्द्याने डॉक्टर असलेल्या या वल्ली ने आनंदवनात आणि सोमनाथ इथे केलेल्या वास्तू हे इंजिनीअरिंग चे उत्तम उदाहरण आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय हे अनुभवायला मिळते ते इथेच.
एक विभाग आहे बैठका, सतरंजी बनविण्याचा विभाग. इथे प्रथम दोऱ्याला रंग करून आणला जातो. नंतर ते आणलेले दोरे वेगवेगळे केले जातात. त्या दोऱ्यांचे छोटे छोटे रीळ बनविले जातात. मग ते दोरे ४-५ च्या प्रमाणात एकत्र करून त्याचे एकत्रीकरण केले जाते जेणेकरून सतरंजी विणताना दोरे गुंतायला नको. मग त्या मागावर सतरंजी विणली जाते.छोटी सतरंजी विणायला एक तर मोठी सतरंजी विणायला जास्त बायका एकत्र काम करतात.
अजून एक विभाग आहे तो हातमाग जिथे छोटे रुमाल, पंचे, धोतर बनविले जाते. इथे सगळे काम हे हातमागावर चालते. काही हातमाग मॅन्युअल आहेत तर मुंबईची एक मिल बंद झाल्यावर त्यांनी तिथे दिलेल्या काही ऑटोमॅटिक मशीन आहेत. इकडच्या कापडाची गुणवत्ता हि खूप चांगली आहे. हातालाच त्याचा मुलायमपणा जाणवतो.
एके ठिकाणी आपण घरी वापरतो ती पत्र्याची कपाटे बनवली जातात. त्याचा पत्रा इतका जाड असतो कि ती गुणवत्ता आता आपल्याला बाजारात मिळणे शक्य नाही. त्या कपाटाची अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे त्या कपाटाला आरश्यासमोर एक छोटासा जाळीचा खण असतो. म्हणजे आपल्याला आरशात बघताना पटकन लागणाऱ्या गोष्टी आपण तिथे ठेऊ शकतो. तिथेच आनंदवनात वापरले जाणारे हातमाग हि बनवले जातात. तसेच वापरल्या तेलाच्या डब्यांपासून चाळण्या बनविल्या जातात. अजून एक महत्वाची गोष्ट तिथे बनवली जाते ती म्हणजे तिथे लागणाऱ्या व्हील चेअर हि तिथेच बनविल्या जातात. त्यामुळे त्यांची खरी सोय जाणून त्या प्रमाणे त्याचे डिजाईन केले गेले आहे.
आनंदवनात फक्त कुष्ठ रोगीच नाहीत तर दिव्यांग लोकांनाही आश्रय दिला जातो. त्यांच्यासाठी तिथे शाळा चालवली जाते. " संधी निकेतन " मध्ये अशा मुलांना काही प्रकारचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. आणि मग तिथूनच काही जणांना नोकरी साठी संधी उपल्बध करून दिल्या जातात. यात बऱ्याच वेळा अशी मुले असतात ज्यांना त्यांच्या घरच्यांनी हा किंवा हि काही कामाचे नाहीत, खायला एक तोंड जास्त म्हणून नाकारलेले असते. अशीच मुले मग स्वतः कमावून घर हि सांभाळतात. इथे अशा मुलांना फिजिओथेरपी मिळावी म्हणून एक हॉस्पिटल बांधले जात आहे. हे अशा प्रकारचे भारतातले पहिले हॉस्पिटल असेल जे अशा दिव्यांगांना नियमित फिजिओथेरपी देण्यासाठी उभारले जाणार आहे. इतका विचार तर काही लोक आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींसाठी हि करत नाहीत.
एकदा फार पूर्वी जेव्हा या रुग्णांना सिनेमा बघावयास नेले होते तेव्हा त्यांचा सिनेमा पाहून झाल्यावर त्या सिनेमाघरवाल्यानी अख्खे सिनेमाघर धुवून काढले होते. कुष्ठरोग्यांचे गाव म्हणून इथे जास्त कुणी यायला तयार होत नसत. हि सल आमटे कुटुंबियांच्या कायम मनात होती. आणि मग याच दुःखावर उपाय म्हणून उभा राहिला तो "स्वरानंदनवन " ऑर्केस्ट्रा. इथल्या दिव्यांग लोकांमधले, रुग्णामधले कलागुण ओळखून श्री. विकासभाऊ आमटे यांनी त्यांचा स्वतःचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला. इथे वादक, गायक, नृत्य सादर करणारे सगळेच त्यांचेच. या गावात येऊन प्रयोग करायला नकार मिळणाऱ्या याच गावातल्या ऑर्केस्ट्राचे मुंबई पुणे इथे १५ च्या वर प्रयोग झालेत. यातून मिळणार सर्व निधी हा आनंदवनासाठी वापरला जातो. "लोकशाही" लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य असे म्हणतात ..... हीच लोकशाही खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते.
या आनंदवनात एकंदरीत ११ तलाव आहेत. त्यात काही मानव निर्मित आहेत. एक तलाव चिवडा खाता खाता बांधले गेले म्हणून त्याचे नाव " चिवडा तलाव " असे ठेवले आहे. या तलावांमुळे इथे शेतीमध्ये दोन वेळची पिके घेतली जातात. भात शेती सोबत इथे भाज्या, फळे हि पिकवली जातात. इथला अजून एक व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय. इथे गाई म्हशींचे पालन करून येणारे दूध हे विकले जाते. सुरवातीला कुष्ठरोग्यांच्या वसाहतीतले दूध घ्यायचे नाही म्हणून नाकारणारी लोक आता तिथले दूध घ्यायला रांग लावतात. कधी कधी दूध संपून जाते पण रांग नाही. या वरूनच तिथल्या दुधाच्या दर्जाची आपण कल्पना करू शकतो.
इथे पाणीसाठ्याची जशी मानव निर्मित तलावं आहेत. तशी इथे अजून एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. ती म्हणजे इथली डोम च्या आकाराची घरे. हि घरे बांधली जातात ती फक्त विटांनी. विटांची तिरपी चालत ठेऊन हि घरे बांधली जातात. याचे छत हे अर्धवर्तुळाकार असते. त्या वर रंगीत टाईल्स चे तुकडे बसविले जातात. जेणेकरून ऊन त्यावरून परावर्तित होऊन घरातील तापमान बाहेर पेक्षा कमी राहील. या घरामध्ये बाहेरपेक्षा साधारण ५ डिग्री तापमान कमी असते. इथे जराही लाकडाचा वापर केला जात नाही त्यामुळे या घरांमध्ये उंदीर होत नाही. हि संकप्लना आहे आदरणीय श्री. विकासभाऊ आमटे यांची. रुग्णांना उंदीर चावून त्यांना जखम होऊ नये. बाहेरच्या उकाड्याचा त्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून हि खास रचना.
या विभागात पाणी आणि वीज टंचाई आहे हे आपणा सर्वाना माहीतच आहे. त्यामुळे इथे मोठे सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. जेणेकरून फक्त सरकारी विजेवर अवलंबून राहून कामे खोळंबायला नको.
आजपर्यंत आनंदवनातून लाखो कुष्ठरोगी बरे होऊन गेले आहेत. काही जे इथे आले ज्यांना घरच्यांनी नाकारले म्हणून ते अजूनही इथेच आहेत. त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हि आनंदवनाची जबाबदारी आहे. अजूनही इथे रुग्ण येतात. काही निघून जातात काही इथेच राहतात. त्यांच्या साठी इथे एक हॉस्पिटल आहे. सकाळ दुपार इथे रुग्ण तपासले जातात. आजूबाजूच्या गावातूनही रुग्ण इथे तपासणी साठी येतात. आपल्या मुंबई पुण्याकडे सापडणार नाही इतकी स्वच्छता आहे त्या हॉस्पिटल मध्ये. इथे एक हेल्थ ए टी एम मशीन आहे ज्यात आपल्या ३३ चाचण्या करता येतात. डिजिटल एक्सरे ची हि इथे सोय आहे. इथे बरेसचे मेडिकल कॅम्प होतात. ज्यात हजारो रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातात अगदी मोफत.
इथे अजून एक खूप वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे इथले स्वयंपाकघर. इथे एकच सार्वजनिक स्वयंपाक घर आहे. सगळ्यांचा स्वयंपाक हा एकाच ठिकाणी बनतो. इथे कामावर येणाऱ्या बाईला घरच्या स्वयंपाकाची चिंता नसते. तिन्ही वेळचे जेवण हे इथे एकत्रित केले जाते. जे या प्रकल्पात थोडे लांब काम करतात त्यांना डबे पोहचविले जातात. साधारण दीड ते दोन हजार माणसांचा एकत्र स्वयंपाक किती मोठी गोष्ट. याच स्वयंपाकघरात साधारण ८०-९० सिलेंडर लागायचे. पण इथे आता बायोगॅस प्लांट हि उभारण्यात आला आहे. दररोज साधारण ५ टन शेण आणि ३ टन टाकाऊ अन्न यापासून ४०० घन मी. गॅस ची निर्मिती होते. त्यामुळे आता तिथे लागण्याच्या सिलेंडर ची संख्या आता ५ वर आली आहे.
आणि ह्या सगळ्या विभागात काम करणारी माणसे आहेत ती या आजारातून बरे झालेले रुग्ण. आता आजारी असणाऱ्या रुग्णाची सेवा करायला माणसे मिळत नाही म्हणून इथेच बरे झालेल्या रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते मग तेच या रुग्णाचे ड्रेसिंग करणे, त्यांची काळजी घेणे हि कामे करतात. इथे बरे झालेले रुग्णाचं काम करतात म्हणून त्यांच्याकडून जास्त वेळ काम करून घेतले जात नाही. त्यांच्या तब्बेतीचा पुरेपूर विचार करून त्यांचे कामाचे तास आहेत.
आनंदवनात एक जागा आहे जिथे "श्रद्धेय बाबा आमटे आणि साधना ताई " यांची समाधी आहे. आपल्या शरीराचा निसर्गाला उपयोग व्हावा म्हणून बाबांची त्यांना अग्नी देऊ नये अशी इच्छा होती . म्हणून ते गेल्यावर त्यांना एके ठिकाणी पुरले गेले. आणि मेल्यानंतर हि बाबांच्या कुशीतच राहावे म्हणून त्यांच्या शेजारी साधनाताईंनाही त्यांच्या निधनानंतर तिथेच पुरले गेले. यावर कुठलीही समाधी बांधली जाऊ नये अशी बाबांची इच्छा होती म्हणून तिथे एक चौथरा बांधून तिथे निरनिराळ्या प्रकारची फुलझाडे लावली जातात.
त्यासमोरच आहे ते अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरण शिला. सुरवातीला यांना लग्नाचा अधिकार हि नव्हता. साधनाताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो मिळवून दिला. पण त्यांना प्रजननाचा अधिकार नव्हता, का तर मुलाला हि होईल आजार. म्हणून त्यांचे कुटुंबनियोजनाचे ऑपेरेशन करून त्यांचे लग्न लावून दिले जायचे. आणि मग तिथे आलेल्या एखाद्या मुलाला हे जोडपे वाढवत असे. मुलाला पालक मिळत व त्यांची मुलाची इच्छा पूर्ण होत असे आणि एक कुटुंब पूर्णत्वास येत असे . पण पुढे जाऊन सौ. भारती ताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो अधिकार हि मिळवून दिला. यात त्यांना किती जणांशी लढा द्यावा लागला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. त्या वेळी त्या न जन्मलेल्या बाळांची म्हणजेच अनाम मूक कळ्यांची स्मरणशिला. आणि आनंदवन उभारताना नाईलाजाने थोडी वृक्षतोड करावी लागली म्हणून त्यांची आहे अनाम वृक्षांची स्मरणशीला. आपण इथे दुसऱ्याला किती दुखावले तरी माफी मागत नाही, आपला अहंकार जपून ठेवतो. आणि इथे दोष न देणाऱ्या गोष्टींचीही माफी मागितली गेली. किती मोठी गोष्ट शिकवून जातात हि माणसे.
त्या शेजारी बाबांच्या "भारत जोडो" अभियानाची (sea to snow) काही क्षण चित्रे आहेत. बाबांना पाठीचा त्रास होता, त्यामुळे ते एक तर चालत किंवा झोपून राहत. तर या अभियानात त्यांनी ज्या बस ने प्रवास केला ती बस कम अँबुलन्स तिथे उभी आहे.
आनंदवनात एक खूप चांगला नियम आहे इथे माणूस गेल्यावर त्यांच्या नावाने एक वृक्ष लावला जातो आणि त्याचे पालनपोषण केले जाते. लंडन मधल्या एका ख्रिस्ती व्यक्तीने आपल्याला मरणोत्तर आनंदवनात विसावा मिळावा म्हणून स्वतःला अग्नी द्यायची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे त्यांना अग्नी देऊन नंतर त्यांच्या अस्थी आनंदवनात आणून पुरल्या गेल्या. आज त्यांचे हि स्मरण स्थान तेथे आहे.
इथे अजून एक उपक्रम राबवला जातो ज्याचे नाव आहे आनंदवन घन वन प्रकल्प. आपण साधारण ३ फुटावर एक झाड लावतो. पण इथे एक एक फुटावर झाडे लावली जातात. जेणेकरून कमीतकमी जागेत घनदाट जंगल तयार होईल, आणि त्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळेल. जपान मधून आलेल्या मियावाकी यांनी हि कल्पना सुचवली होती. आज आनंदवनातील या प्रकल्पाचे अनुकरण बऱ्याच ठिकाणी केले जाते.
"टाकाऊ पासून टिकाऊ" हि संकल्पना पुरेपूर अनुभवली ती आनंदवनात. कुठलीही गोष्ट वाया न घालवता त्याचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे इथे येऊन बघण्यासारखे आहे. डॉ. विकास भाऊ आमटे यांना डॉक्टर म्हणावे कि इंजिनिअर हा मोठा यक्ष प्रश्न आहे. हुद्द्याने डॉक्टर असलेल्या या वल्ली ने आनंदवनात आणि सोमनाथ इथे केलेल्या वास्तू हे इंजिनीअरिंग चे उत्तम उदाहरण आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय हे अनुभवायला मिळते ते इथेच.
आनंदवनाला " स्मार्ट व्हिलेज " म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आपल्याला फार कौतुक आहे चीन चे कि त्यांचे उत्पादन जास्त कारण त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची सोय आहे, शाळा आहे सर्व काही आहे. मीठ आणि तेल सोडले तर इथे सगळ्याचे उत्पादन करते. पण आपल्याला आपल्याच देशात असलेल्या आनंदवनात हे असेच आहे याची पुसटशी कल्पना हि नाही (खूप जणांना नसेल). कदाचित आनंदवन हे एकमेव असे गाव असेल जिथे एका पूर्ण गावाचे एकच रेशन कार्ड आहे. ज्या नागरिकांना त्यांची बोटे वाकडी झाल्यामुळे, किंवा नसल्यामुळे सरकार आधार कार्ड देऊ शकत नाही, त्यांना त्यांची सरकारी ओळख देऊ शकत नाहीत . त्याच लोकांना आंदनवानाने त्यांच्यातले गुण जाणून त्यांना स्वतःची ओळख दिली.
आपल्याकडे आंतरजातीय विवाह असतो. पण आनंदवनात एक आगळी वेगळी कल्पना राबवली जाते इथे असतो अंतरदिव्यांग विवाह. मूक , बधिर, अंध मुलांचा. पण असे असले तरी त्यांना होणारी बाळे हि सुधृढ आणि कुठलेही व्यंग नसणारी असतात.
ज्या लोकांना आपल्याला हात लावावासा वाटत नाही अशा लोकांना घेऊन वसवलेले हे गाव. इथली स्वच्छता, शिस्त आणि मॅनॅजमेन्ट आपल्याला लाजवेल अशी आहे. रिकाम्या झोळीत आपण बरेच काही भरून घेऊन येतो. आजही ज्या लोकांना कुष्ठरोगा बद्दल गैरसमज आहेत ना त्यांनी नक्कीच भेट द्यावी इथे. जरा जराश्या गोष्टीचा आपण बाऊ करून बसतो. इथे बोटं नसलेली , किंवा वाकडी असलेली लोकं किती अप्रतिम कलाकृती तयार करतात. इथे कुणाच्या हि चेहऱ्यावर मरगळलेले भाव नाहीत. सगळेच प्रसन्न आणि टवटवीत. आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वच्छताप्रिय. इकडे काम हि एक श्रद्धा आहे. फक्त उदरभरणाची सोय नाही. इथे वृध्दाश्रमातल्या आजी हि आम्ही भेटायला गेल्यावर अगदी आनंदी झाल्या होत्या. आम्ही नुसता नमस्कार म्हटले तरी आम्हाला भरभरून आशीर्वाद देत होत्या.
आज श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई नंतर त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास भाऊ आणि त्यांच्या पत्नी (डॉ) सौ . भारतीताई आमटे यांनी त्याच श्रद्धेने आणि भक्तीने तो वारसा पुढे चालवला आहे. आपण सेलिब्रिटीज ना , किंवा पडद्यावरच्या नायक नायिकांना भेटायला खूप उत्सुक असतो . त्यांच्या जीवनात काय सुरु आहे याची हि आपल्याला फार उत्सुकता असते. पण खरे उत्सवमूर्ती तर आम्ही याची देही याची डोळा आनंदवनात पहिले. हात गगनात पोहचले असताना पाय जमिनीवर रोवलेले. आपल्याकडे विठ्ठल रखुमाई आहेत आनंदवनात " बाबा आणि साधना ताई नंतर " " डॉ. विकास भाऊ आणि सौ.(डॉ) भारती ताई " याच आनंदवनाच्या लोकांच्या विठ्ठल रखुमाई आहेत. म्हणूनच कदाचित आनंदवनात एकही देऊळ नाही. इथे जात पात नाही. धर्मभेद नाही. आरक्षण नाही. इथे आहे ती फक्त आणि फक्त माणुसकी, श्रद्धा माणसाची माणसावरची, आणि विश्वास. हल्ली शहरांमध्ये जन्मदात्यांना हि सांभाळायला मुलांना जीवावर येते. इथे तर इतके मोठे कुटुंब सांभाळायची जबाबदारी किती सहज उचलली जातेय.
आपल्याकडे आंतरजातीय विवाह असतो. पण आनंदवनात एक आगळी वेगळी कल्पना राबवली जाते इथे असतो अंतरदिव्यांग विवाह. मूक , बधिर, अंध मुलांचा. पण असे असले तरी त्यांना होणारी बाळे हि सुधृढ आणि कुठलेही व्यंग नसणारी असतात.
ज्या लोकांना आपल्याला हात लावावासा वाटत नाही अशा लोकांना घेऊन वसवलेले हे गाव. इथली स्वच्छता, शिस्त आणि मॅनॅजमेन्ट आपल्याला लाजवेल अशी आहे. रिकाम्या झोळीत आपण बरेच काही भरून घेऊन येतो. आजही ज्या लोकांना कुष्ठरोगा बद्दल गैरसमज आहेत ना त्यांनी नक्कीच भेट द्यावी इथे. जरा जराश्या गोष्टीचा आपण बाऊ करून बसतो. इथे बोटं नसलेली , किंवा वाकडी असलेली लोकं किती अप्रतिम कलाकृती तयार करतात. इथे कुणाच्या हि चेहऱ्यावर मरगळलेले भाव नाहीत. सगळेच प्रसन्न आणि टवटवीत. आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वच्छताप्रिय. इकडे काम हि एक श्रद्धा आहे. फक्त उदरभरणाची सोय नाही. इथे वृध्दाश्रमातल्या आजी हि आम्ही भेटायला गेल्यावर अगदी आनंदी झाल्या होत्या. आम्ही नुसता नमस्कार म्हटले तरी आम्हाला भरभरून आशीर्वाद देत होत्या.
आज श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई नंतर त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास भाऊ आणि त्यांच्या पत्नी (डॉ) सौ . भारतीताई आमटे यांनी त्याच श्रद्धेने आणि भक्तीने तो वारसा पुढे चालवला आहे. आपण सेलिब्रिटीज ना , किंवा पडद्यावरच्या नायक नायिकांना भेटायला खूप उत्सुक असतो . त्यांच्या जीवनात काय सुरु आहे याची हि आपल्याला फार उत्सुकता असते. पण खरे उत्सवमूर्ती तर आम्ही याची देही याची डोळा आनंदवनात पहिले. हात गगनात पोहचले असताना पाय जमिनीवर रोवलेले. आपल्याकडे विठ्ठल रखुमाई आहेत आनंदवनात " बाबा आणि साधना ताई नंतर " " डॉ. विकास भाऊ आणि सौ.(डॉ) भारती ताई " याच आनंदवनाच्या लोकांच्या विठ्ठल रखुमाई आहेत. म्हणूनच कदाचित आनंदवनात एकही देऊळ नाही. इथे जात पात नाही. धर्मभेद नाही. आरक्षण नाही. इथे आहे ती फक्त आणि फक्त माणुसकी, श्रद्धा माणसाची माणसावरची, आणि विश्वास. हल्ली शहरांमध्ये जन्मदात्यांना हि सांभाळायला मुलांना जीवावर येते. इथे तर इतके मोठे कुटुंब सांभाळायची जबाबदारी किती सहज उचलली जातेय.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कि काही थोर कर्तृत्व नसताना डॉ. विकास भाऊ आमटे आणि सौ. (डॉ)भारती ताई आमटे यांच्याशी आम्हाला संवाद साधता आला. अर्थात आम्ही सगळे निःशब्द होतो. पण त्या वेळात जे काही श्री. विकास भाऊंच्या मुखातून ऐकले ते काळीज पिळवटून टाकणारे होते. किती वेळ तरी डोळे भरून आले होते आणि मन दुःखी झाले होते.
पु.ल . देशपांडे यांनी आनंदवनाविषयी एक वाक्य म्हटलं होते " पर्यटक म्हणून जा आणि परीवर्तित होऊन या." हे वाक्य किती खरे आहे याची प्रचिती नक्कीच येते. अगदी खूप नाही पण ५% बदल तर नक्कीच होतो. आपण किती मी पणात जगतो याची लाज वाटायला लागते.
हा लेख ज्यांना आवडला त्यांनी कृपया हा आपल्या मित्रपरिवरात शेअर करा. जेणे करून थोडेसे का होईना आपल्याकडून जनजागृती होईल. आणि शक्य असल्यास आनंदवन ला भेट ही जरूर द्या. दगडी देव तर आपण नेहमीच बघतो...जिवंत देव बघितल्याची प्रचिती एकदा घ्यायलाच हवी.
हा लेख ज्यांना आवडला त्यांनी कृपया हा आपल्या मित्रपरिवरात शेअर करा. जेणे करून थोडेसे का होईना आपल्याकडून जनजागृती होईल. आणि शक्य असल्यास आनंदवन ला भेट ही जरूर द्या. दगडी देव तर आपण नेहमीच बघतो...जिवंत देव बघितल्याची प्रचिती एकदा घ्यायलाच हवी.
हा
लेख म्हणजे फक्त अडीच दिवसात मी अनुभवलेलं आनंदवन आहे. काही चुकले असेल तर
क्षमस्व. पण हा लेख अंतरंगीच्या अगदी खोलातून आलेला लेख आहे.
खरंतर अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे कारण हा विषय असा ठराविक शब्दात मांडण्याचा विषय नाही. मी फक्त १% प्रयत्न केला आहे.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती
आनंदवनातील हॉस्पिटल
भाताचे तूस, कणीसाचे साल, केळीच्या झाडाचे साल वापरून केलेली भेटकार्ड
श्रध्येय बाबा आमटे आणि साधनाताईंचे समाधी स्थळ
काष्ठशिल्प विभाग
कापडाच्या तुकड्यांपासून बनविलेले भेट कार्ड
सोलर पॅनल आणि डोम आकाराचे घर
ख्रिस्ती व्यक्तीचे स्मरण स्थान
हेल्थ ए टी एम मशीन
संधी निकेतन
आनंदवनातील स्वयंपाकघर
बायोगॅस प्लांट