Sunday, 25 November 2018

मैत्री कि आकर्षण


कुणीतरी हवे आपल्याला मनापासून समजून घेणारे. आता तुम्ही म्हणाल तसे तर खूप जण असतात कि आपल्याला समजून आपले आई बाबा आजी आजोबा नवरा बायको, मुलेहो ते हि आहेच कि. पण खरेच हे सगळे आपल्याला मनापासून समजून घेतातकितीतरी अशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्या जोडीदारासोबत हि नाही वाटून घेऊ शकत. कितीतरी गुपिते जी कुणालाही नाही सांगता येत
अशा वेळी हवे असते कुणीतरी आपले. आता त्यावर आहेच उत्तर कि आपले मित्र मैत्रिणी असतातच ना ज्यांच्या सोबत आपण सगळे काही वाटून घेऊ शकतो. हे हि खरेच आहे कि.... मग आता घोडं अडले कुठे?

आता प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा कि कोण आहे आपल्यावर अगदी मनापासून समजून घेणारे? ज्यांना ठामपणे एक नाव घेता येईल ते खरेच नशीबवान. तरीही प्रत्येकाची समजून घेण्याची व्याख्या काही वेगळीच असते

अर्थात ते मिळतेच असे नाही. पण प्रत्येकाला कुणीतरी असे हवे असते ज्या व्यतींशी आपण अगदी मोकळेपणाने काही हि बोलू शकतो. जेव्हा कधी एकटे वाटते त्या व्यक्तीशी दोन शब्द बोलल्यावर एकटेपणा कुठल्या कुठे निघून जातो. असे कुणीतरी हवे जे आपल्यातल्या लहान मुलाला सहन करणारेकितीही बालिशपणा केला तरी आपल्याला समजून घेणारकाय हा पोरकटपणा? किंवा आता काय लहान आहे का तू असे वागायला ? असा कधीही प्रश्न ना करता तुम्ही जे वागलं ते खपवून घेणारे. अर्थात आपणही समोरच्या व्यक्तीचा बालिशपणा खपवून घेतला पाहिजे. तुम्हाला कधीही गरज लागली तरी हातातली कामे सोडून तुमच्यासाठी वेळ देणारे. आता बिझी आहे मग बोलू .... म्हणजे माणूस मारतोय आणि तुम्ही पाणी पाजायला तुमच्या सवडीने जाणार असेच झाले ना ते

आता असा प्रश्न मनात आला असेलच ना कि असे फक्त प्रियकर प्रेयसी असू शकतातअसू दे ना मग ... पण दोन मैत्रिणी, दोन मित्र किंवा मित्र मैत्रीण कुणीही असू शकतो ना. पण दोन मैत्रिणी किंवा मित्र ,अगदी प्रियकर प्रेयसी हि आपण समजूच शकतो

पण कधीतरी असे होते जेव्हा एक मित्र आणि मैत्रिणी असे असतात तेव्हा? त्यांच्या भावना कितीही शुद्ध असल्या तरी लोक नवे ठेवतातच. माझा दादा म्हणाला होता मला कि मैत्रीला नात्याचे नाव दिले कि त्याला बंधने येतात. खरेच आहे

पण आपल्याकडे दुर्देव असे कि हे कुणी मानतच  नाही. इतकेच कशाला त्या मैत्रीतही बऱ्याच वेळा असे होते कि समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप मोकळेपणाने बोलते म्हणजे तिच्या मनात काहीतरी वेगळेच आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. एखाद्या व्यक्तीशी आपण अगदी नियमित बोललो कि ती व्यक्ती आपल्याला खूप जवळची वाटू लागते. जरी भेटलो नाही तरी एक आपुलकीचे नातं तयार होतेपण कधी कधी काय होते ना कि त्यातल्या एखाद्याच्या मनात काहीतरी वेगळेच विचार येतात. समोरची व्यक्ती अगदी मोकळेपाणाने बोलते म्हणजे तिला सगळेच चालू शकते असा विचार करू लागतात. एका अर्थाने गृहीत धरू शकतात

मग बोलण्यातले विषय भलतीकडे जायला लागतात. समोरच्या व्यक्तीच्या मनातही नसतात असे विषय बोलले जातात. काही वेळा वेगळे विषय म्हणून त्यावर चर्चा हि होते पण तेच विषय जेव्हा खऱ्या विषयाकडे वळतात तेव्हा त्यातली एक व्यक्ती नेहमीच दुखावली जाते कारण तिच्या भावना तशा नसतात.  

आपल्याला एखादी व्यक्ती मोकळेपणाने भेटते किंवा बोलते तेव्हा ते फक्त शारीरिक आकर्षणच असेल असे नाही ना. दोन विरुद्ध लिंगी व्यक्ती जर जवळ आल्या तर त्याची वाट एकाच ठिकाणी का धरण्याचा आग्रह केला जातो हे आता पर्यंत उलगडणारे कोडे आहेएखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याची , कामाची स्तुती करणे  हे फार स्वाभाविक असते पण कधी कधी हे काही विशिष्ट कारण समोर ठेवूनच केले जाते. तर कधी कधी एखादी व्यक्ती हि निर्मळ  मनाने कुठलीही अपेक्षा ना ठेवता फक्त आपुलकी खातर करत असेल हा विचारच केला जात नाही
एखादी व्यक्ती आपल्याशी मोकळेपणाने बोलली कि आपण त्या व्यक्तीला काही अंशी गृहीत धरायला लागतो. कदाचित ती व्यक्ती आपल्यात एक चांगला मित्र किंवा मैत्रीण शोधात असेल हा साधा विचारही मनाला शिवत नाही. आपल्या मनात असणाऱ्या भावना अतिशय उथळपणे मांडल्या जातात आणि असलेल्या मैत्रीचा हि बळी दिला जातो
फार कधीतरी हे आकर्षण दोन्ही कडून असते. पण अगदी फारच कमी वेळा. आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन मित्र किंवा मैत्रिणींमध्ये आपण तो कंफर्ट  झोन शोधत असतो जो काही वेळा आपल्याला कुणातही मिळत नाही. किंवा आपल्या अगदी जवळची दोस्त मंडळी इतकी लांब गेलेली असतात कि आपल्याला वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांना नाही सांगू शकत. आता काही व्यक्ती होतच नाहीत व्यक्त पण ९९% व्यक्तींना कुणीतरी लागतेच जवळचे
एक साधी सरळ गोष्ट कि मैत्रीचा हात पुढे करून त्याआडून काहीतरी वेगळे अपेक्षित ठेवण्यापेक्षा आणि समोरच्या व्यतीच्या भावनांना दुखावण्यापेक्षा, स्पष्ट राहून मैत्री करा म्हणजे एकतर मैत्री होणारच नाही किंवा तुमचे मत बदलेल
एख्याद्याकडे एक शरीर म्हणून बघण्याची मानसिकता बदलली ना तर बऱ्याच मैत्री या सुलभ होतील. आणि आपला हि दृष्टिकोन बदलेल







 






-