काल एका मित्राचा फेसबुक प्रोफाइल बघताना त्याची एक जुनी पोस्ट वाचली " आपली माणसे खरेच आपली असतात का ?' त्यावरचे कंमेंट काही वाचले नाहीत. पण मनात विचार आला कि हा प्रश्न तर कधी ना कधी प्रत्येक माणसाला पडत असेल ना. खूप साधा सरळ प्रश्न पण अंतर्मुख करणारा ,त्याचे उत्तर तितकेच कठीण ना !!!
मुळात या प्रश्नाच्या उत्तराची सुरवातच एका प्रति प्रश्नाने होते असे मला वाटते तो म्हणजे नक्की हि आपली माणसे कोण? आपली जी रक्ताच्या नात्याने जोडलेली आहेत ती? कि जी वैचारिक पातळीवर आपल्याला हवी असतात ती? कि काही कारण नसताना ज्यांच्याशी आपल्याला बोलावेसे वाटते भेटावेसे वाटते ती ?
आपली माणसे म्हटले कि रक्ताच्या नात्यातील, नातेवाईक, नवरा बायको, हीच लोक आपल्या डोळ्यासमोर येतात. आपला विचारांचा प्रवाहच इथून सुरु होतो. हि आपल्या माणसांची व्याख्या वेळ आणि काळ आणि गरज यानुसार बदलते बहुतेक. आपला मनुष्य स्वभावच कदाचित तसा आहे. जसे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला वेळ देत असते, आपल्यासाठी काही करत असते तेव्हा ती आपल्याला आपल्या जवळची वाटते. पण तीच व्यक्ती जर कधी आपल्याला वेळ देऊ शकली नाही कि आपण लगेच त्या व्यक्तीला परके करून टाकतो. कधी कधी हा हि विचार करत नाही कदाचित त्या हि व्यक्तीला काही अडचण असेल. कुठेतरी त्याही व्यक्तीचे हात बांधलेले असतील.
काही वेळा असेही होते कि आपण कुणाच्या तरी खूप जवळचे असतो , आपल्या नातेवाईकांपेक्षा , घरच्यांपेक्षा , मित्रमैत्रिणीपेक्षा पण हि गोष्ट आपण उघडपणे नाही बोलू शकत. कारण कधी कधी समाजाची, किंवा कोण काय म्हणेल या भीतीने , आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, आपल्याला काही माणसे जवळची असूनही त्यांच्याशी चारचौघात परकेपणाने वागावे लागते. हि गोष्ट कदाचित जास्त त्रासदायक असते प्रत्येकासाठीच.
असे म्हणतात कि हल्लीच्या जगात कुणीच कुणाचे नाही. काही अंशी हे खरे हि वाटते. हल्ली नवरा बायको सारखे पवित्र बंधनात बांधलेले नाते हि तुटते. आपण नेहमीच ज्यांना आपले म्हणतो अशी आपली मुले ती हि कधी कधी आईवडिलांना सोडून निघून जातात, मग कुणीतरी शेजारी पाजारी , वृद्धाश्रमातील त्यांच्यासारखीच एकटी पडलेली काही मंडळी त्यांना सोबत करतात त्यांना संभाळतात मग अशा वेळेला प्रश्न पडतो कि नक्की कोण आपले आणि कोण परके?
कधी वाटते कि जिथे आपण समोरच्या माणसांकडून अपेक्षा ठेवायला लागतो ना तिथेच आपल्या परक्याचा भेद सुरु होतो. एखाद वेळी जर आपण खूप आपली मानणारी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा एक तर त्या व्यक्तीची आपल्याकडची गरज संपलेली असते किंवा ती व्यक्ती खरेच कधीच आपली नसते. फक्त आपणच त्या व्यक्तीला आपले समजून गमवायला घाबरत असतो. समोरच्या व्यक्ती साठी आपण कधी त्यांच्या जवळचे नसतोच.
कधीतरी आपण एखाद्याला आपलेसे समजून त्या व्यक्ती साठी खूप काही करतो. त्याची काळजी घेतो, त्याला सर्व प्रकारे मदत करायचा प्रयत्न करतो. पण त्या व्यक्तीला फक्त आपल्या कामाशी काम असते. अशा वेळेला मग वाटते कि आपल्यासाठी जवळची असणाऱ्या व्यक्तीसाठी आपण कुणीच नाही. एकतर्फी प्रेमासारखे हा हि एकतर्फी आपलेपणाचा झाला नाही का ?
तर कधीतरी एकदा किंवा दोनदाच भेट झालेल्या व्यक्ती बद्दल आपल्याला आपले पणा वाटू लागतो आणि हीच भावना समोरच्या व्यक्तीची ही असते.
कधी वाटते कि जिथे आपण समोरच्या माणसांकडून अपेक्षा ठेवायला लागतो ना तिथेच आपल्या परक्याचा भेद सुरु होतो. एखाद वेळी जर आपण खूप आपली मानणारी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा एक तर त्या व्यक्तीची आपल्याकडची गरज संपलेली असते किंवा ती व्यक्ती खरेच कधीच आपली नसते. फक्त आपणच त्या व्यक्तीला आपले समजून गमवायला घाबरत असतो. समोरच्या व्यक्ती साठी आपण कधी त्यांच्या जवळचे नसतोच.
कधीतरी आपण एखाद्याला आपलेसे समजून त्या व्यक्ती साठी खूप काही करतो. त्याची काळजी घेतो, त्याला सर्व प्रकारे मदत करायचा प्रयत्न करतो. पण त्या व्यक्तीला फक्त आपल्या कामाशी काम असते. अशा वेळेला मग वाटते कि आपल्यासाठी जवळची असणाऱ्या व्यक्तीसाठी आपण कुणीच नाही. एकतर्फी प्रेमासारखे हा हि एकतर्फी आपलेपणाचा झाला नाही का ?
तर कधीतरी एकदा किंवा दोनदाच भेट झालेल्या व्यक्ती बद्दल आपल्याला आपले पणा वाटू लागतो आणि हीच भावना समोरच्या व्यक्तीची ही असते.
आपली माणसे हि नेहमी आपलीच असतात पण आधी आपली माणसे कोण हे ओळखता यायला हवे. जी माणसे आपला विचार न करता आपल्याला सोडून कधीही परत न येण्यासाठी निघून जातात ती कधीच आपली नसतात. जी माणसे कसलीही अपेक्षा ना करता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात, आपल्या गुणदोषांसकट आपल्याला स्वीकारतात, आपल्या दुःखात ज्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि आपल्या आनंदात ज्यांच्या ओठांवर हसू फुलते, आपल्या प्रगतीसाठी जी मनोमन प्रार्थना करतात, आपल्याला कधीही मागे ओढायचा प्रयत्न करत नाहीत, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचे ज्यांना कौतुक असते, लांब राहूनही ज्यांना आपली आठवण असते, तीच खरी आपली माणसे. आणि जर समोरची व्यक्ती जर तुम्हाला १००% आपले मानत असेल तर आपण निदान ५०% तरी त्या व्यक्तीचा विचार करावा. कारण जेव्हा आपल्याला कुणाबद्दल तरी प्रश्न पडतो कि आपली माणसे आपलीच असतात का तेव्हा हा हि विचार करावा कि आपल्याबद्दल हि कुणीतरी कुठेतरी हा विचार करत असेलच ना.
मला एक नक्की सांगावेसे वाटते मला हि अजून या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे सापडले नाहीये कि आपली माणसे खरेच आपली असतात का? पण मी मनापासून जोडलेली माणसे खरंच माझी आहेत आणि जी मला आपली वाटतात त्यांनी मला आणि मी त्यांना त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारले आहे.
आणि हो मित्रा तुझे खूप खूप आभार तुझ्या एका वाक्यावर मला इतके लिहिता आले. माझ्या आपल्या माणसांमध्ये तू हि आहेस बरं का 🙂🙂🙂
मला एक नक्की सांगावेसे वाटते मला हि अजून या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे सापडले नाहीये कि आपली माणसे खरेच आपली असतात का? पण मी मनापासून जोडलेली माणसे खरंच माझी आहेत आणि जी मला आपली वाटतात त्यांनी मला आणि मी त्यांना त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारले आहे.
आणि हो मित्रा तुझे खूप खूप आभार तुझ्या एका वाक्यावर मला इतके लिहिता आले. माझ्या आपल्या माणसांमध्ये तू हि आहेस बरं का 🙂🙂🙂