आज मला थँक यू म्हणायचे आहे माझी आई सौ. शीला राणे आणि तिची खास मैत्रीण सौ मंदाकिनी पेणकर म्हणजेच आमची मंदा मावशी. मैत्री कशी असावी हे या दोघीनकडून शिकावे. माझ्या जन्माच्या आधी म्हणजे १९७६ पासून यांची मैत्री. गोरेगावच्या कदम वाडीत या शेजारी राहायच्या, तिथे झालेली त्यांची मैत्री आज ४१ वर्षानंतर हि तशीच कायम आहे. माझी आई तशी थोडी तापट स्वभावाची पण तरीही अगदी आम्हाला कळायला लागल्यापासून मी कधी दोघींमध्ये वाद झालेले पहिले नाहीत कि एकमेकींच्या मागून काही बोलताना ऐकले नाही. एकमेकींच्या सुख दुःखात दोघी नेहमी एकमेकींना साथ देतात. आमचे बालपण जितके आमच्या सख्ख्या मावश्यांकडे गेले तेवढेच हिच्या घरी हि. दोघीनींही एकमेकांच्या मुलांना कधी परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही. तिने आम्हाला किंवा आमच्या आई ने तिच्या मुलांना आपण नातेवाईक नाही याची कधीच जाणीव होऊ दिली नाही. आम्हीही अगदी हक्काने तिच्या घरी ८-१५ दिवस मुक्काम करायचो. तिच्या मुलांशी हि आमची आमच्या इतर भावंडांसारखेच नाते होते किंवा त्यापेक्षा जास्त. सगळे सणवार आम्ही एकत्र साजरे करत असू. आजही कधी वेळे अभावी तिला फोन करता आला नाही किंवा भेटता आले नाही तर ती कधीच आमच्या वर रागवत नाही. आजही त्या दोघीना जरी तब्बेती मुळे वरचेवर भेटणं जमत नसले तरी वर्षातून २-३ वेळा तरी त्या एकमेकींना आवर्जून भेटतात. आणि आता मोबाईलमुळे संपर्कात राहणे आणखी सोपे झालेय . सगळ्या प्रतिकूल परिस्थितून खंबीरपणे वाट काढून आज वयाची ६० उलटल्यावरही दोघी एकमेकींना धरून आहेत याचे आम्हा सगळ्यांनाच खूप कौतुक आहे. या दोघीना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची मैत्री हि अशीच निखळ निर्मल राहो. प्रत्येकाच्याच हि आयुष्यात एक तरी अशी मैत्रीण असावी, जी तुम्हाला पूर्णपणे समजून घेईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.